शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

नागपूर शहरातील १२ मोठ्या हॉटेलांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 21:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : घराघरातील कचरा विलगीकरण करून संकलित झाला तर स्वच्छतेची समस्याच राहणार नाही. याचा विचार करता ...

ठळक मुद्देमनपाच्या आरोग्य विभागाची कारवाईओल्या कचऱ्यावर प्रक्रिया बंधनकारक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घराघरातील कचरा विलगीकरण करून संकलित झाला तर स्वच्छतेची समस्याच राहणार नाही. याचा विचार करता कचरा संकलनाचा नवा पॅटर्न राबविला जात आहे. १०० किलोहून अधिक कचरा निघणाऱ्या हॉटेल चालकांना ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवावयाचा आहे. तसेच ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची आहे. परंतु वारंवार सूचना दिल्यानंतरही ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया न करणाऱ्या शहरातील मोठ्या १२ हॉटेलांना महापालिकेच्या आरोग्य विभागाने नोटीस बजावली आहे.यात हॉटेल प्राईड, हॉटेल तुली इम्पेरियल, हॉटेल मॅजेस्टीक मनोर, हॉटेल सेंटर पॉईंट, हॉटेल अशोक (लक्ष्मीनगर), हॉटेल अशोका माऊं ट रोड, हॉटेल रेडिसन ब्ल्यू, सी.पी.क्लब, गोंडवाना क्लब, वर्धा रोडवरील हॉटेल आदे , हॉटेल तुली इंटरनॅशनल व हॉटेल ट्रॅव्होटेल आदींचा समावेश असल्याची माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सुनील कांबळे यांनी मंगळवारी दिली.शहरात विविध ठिकाणी सुरू असलेल्या बांधकामावरील मजुरांनी उघड्यावर शौचाला जाऊ नये यासाठी मोठ्या बांधकाम व्यावसायिकांनी मजुरांसाठी शौचालयाची व्यवस्था करावयाची आहे. अन्यथा कारवाई केली जाणार आहे. तसेच बांधकाम करताना रस्त्यावर रेती, विटा व अन्य सामुग्री ठेवणाऱ्यांच्या विरोधात कारवाई केली जाणार आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत होणाऱ्या सर्वेक्षणासोबतच आरोग्य विभागाची स्वच्छता यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत.शासनाने याबाबतचा घनकचरा व्यवस्थापनाबाबतचा नवीन कायदा केला आहे. त्यानुसार नागरिकांना व व्यावसायिकांना ओला आणि सुका कचऱ्याची वर्गवारी करावी लागणार आहे. यासाठी दोन डस्टबिन ठेवावयाचे आहेत. १०० किलोहून अधिक कचरा संकलित होणाऱ्या हॉटेल व संस्थांना ओल्या कचऱ्याची स्वत: विल्हेवाट लावावयाची आहे.कंटेनरची संख्या वाढविणारशहरातील कचरा संकलनाची व्यवस्था अधिक बळकट करण्यात येईल. वर्षभरात नागरिकांना उत्तम सुविधा देण्याचा प्रयत्न आहे. शहरात १७ संकलन पॉईंट आहेत. येथील अवस्था बिकट आहे. यामुळे कंटेनरची संख्या वाढविण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले आहेत. त्यानुसार दोन -तीन दिवसात कंटेनरची संख्या वाढविण्यात येणार आहे. बाजारभागात अधिक कचरा निघतो. अशा ठिकाणी कॉम्पेक्टर लावण्यात येतील. कचरा संकलनाची नवीन यंत्रणा उभारली जात आहे.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाhotelहॉटेल