शहरं
Join us  
Trending Stories
1
Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
2
काँग्रेस-उद्धवसेनेचे फाटले! उद्धव ठाकरेंनी 'मविआ'च्या शक्यतांना दिला पूर्ण विराम, पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल काय बोलले?
3
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
4
Vijay Hazare Trophy: कॅप्टनची वैभवपेक्षा जलद सेंच्युरी! बिहारनं ५७४ धावांसह सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
5
H-1B व्हिसा आता 'मेरिट'वर! १ लाख डॉलर अतिरिक्त फी अन् पगाराची अट; पाहा काय आहे नवीन नियम
6
Eclipse 2026: २०२६ मध्ये ४ ग्रहणांची मालिका, विशेषतः होळीला चंद्रग्रहण वेधणार जगाचं लक्ष?
7
"नेमके कशासाठी आज घालताय एकमेकांच्या गळ्यात गळे?"; युती होताच भाजपाचा खोचक सवाल
8
...म्हणून उद्धव आणि राज ठाकरेंनी जागावाटप, उमेदवार याबाबत काहीच घोषणा केली नाही; कारण सांगताच सगळे हसले
9
२६ डिसेंबरपासून आणखी एका कंपनीचा IPO उघडणार; आतापासून GMP ₹१२५ वर, कोणती आहे कंपनी?
10
Shiv Sena UBT & MNS Alliance: 'शिवतीर्थ'वर राज-उद्धव! बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर संपूर्ण ठाकरे कुटुंबाचं अभिवादन
11
शिवसेनेनं 'करून दाखवलं', मनसेचं 'इंजिन' घसरलं! पाहा, मागील दोन निवडणुकांमध्ये नेमकं काय घडलं?
12
अतिश्रीमंतांचा 'आक्रमक' गुंतवणुकीवर भर! 'या' क्षेत्रात लावतात ७०% पैसे; सोन्याकडे मात्र पाठ
13
IND W vs SL W: भारताच्या 'लेडी सेहवाग'चा मोठा पराक्रम; स्मृती मानधना, दिप्ती शर्मा, जेमिमालाही टाकलं मागं!
14
'आम्ही भारतातील सर्वात मोठे फरार', ललित मोदी आणि विजय मल्ल्या यांचा सरकारवर हल्लाबोल; व्हिडीओ व्हायरल
15
सोने-चांदी-हिरे काही कमी नाही, राममूर्ती घडवायला दिले ३० कोटी; अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली
16
कुणीही एकत्र आले तरी मुंबईत भाजपाचा महापौर बसेल; मंत्री बावनकुळेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा
17
फास्ट फूडमुळे खरंच झाला विद्यार्थिनीचा मृत्यू? डॉक्टर आणि कुटुंबीयांनी सांगितलं धक्कादायक 'सत्य'
18
DCM शिंदे पोहोचले बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर; ठाकरे बंधूंच्या यूतीपूर्वी घडामोडींना वेग
19
बांग्लादेशात हिंदूंवरील अत्याचार वाढले; चिटगावमध्ये कट्टरतावाद्यांनी हिंदूंची घरे जाळली
20
Vijay Hazare Trophy स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात वैभव सूर्यवंशीचा धमाका! वादळी शतकासह रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

केवळ घोषणा नको, संघटनबांधणीत ध्येय आणि उद्दिष्ट हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:52 IST

नागपूर : संघटनात्मक कार्य करताना केवळ घोषणा देऊन चालत नाही; तर ध्येय, उद्दिष्ट, अंमलबजावणी आणि यशस्विता हवी, असे प्रतिपादन ...

नागपूर : संघटनात्मक कार्य करताना केवळ घोषणा देऊन चालत नाही; तर ध्येय, उद्दिष्ट, अंमलबजावणी आणि यशस्विता हवी, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र कोंडरे यांनी केले. गुरुदेव सेवाभवनात रविवारी सायंकाळी झालेल्या कार्यकर्ता बैठकीत ते बोलत होते.

यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष विनायक पवार, राष्ट्रीय महिला प्रतिनिधी कविता भोसले, जिल्हाध्यक्ष सतीश साळुंखे, महानगर अध्यक्ष दिलीप धंदरे, माजी कार्याध्यक्ष जयसिंग चव्हाण उपस्थित होते. मेळाव्यात राजेंद्र कोंगरे म्हणाले, कार्यकर्त्यांनी संघटनेचे काम करताना ध्येयधोरणे समजून घ्यावीत. संघटनेचा लाभ समाजाला अधिक मिळावा यासाठी एक कार्यशाळा आयोजित करण्याचा सल्ला त्यांनी दिला. कार्यकर्त्यांचा सूर लक्षात घेऊन ते म्हणाले, सभेला येणे म्हणजे समाजाचे काम करणे नव्हे; तर विचारांवर विश्वास ठेवून काम करणे महत्त्वाचे असते. आजच्या काळात जात, धर्म, पंथाला महत्त्व नाही. गुणवत्ता महत्त्वाची आहे. त्याचा विकास करावा लागेल. काळासोबत चाललो नाही तर मागे पडण्याचा धोका असतो, असा इशारा त्यांनी दिला.

संघटना किती जुनी हे महत्त्वाचे नसून किती कृतिशिल आहे, हे महत्त्वाचे असते. तलवारीच्या टोकावर जमीन जिंकलेल्या आपल्याला आज आरक्षण मागण्याची वेळ आली आहे. पूर्वजांनी लढून जिंकलेल्या जमिनी आपणच ५० रुपयांत विकल्या, त्यामुळे काल कुठे होतो, आज कुठे आहोत व उद्या कुठे असू याचा विचार समाजाने करावा. मराठा मोर्चातून जगाच्या पाठीवर झेंडा रोवण्याची संधी होती. मात्र आपणच झेंड्याचे बांबू कापले, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. संपर्क अभियानाची तयारी करा, तालुके व गावपातळीवरील संघटनात्मक बांधणीचे उद्दिष्ट १० फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करा, महिलांसाठी बनविलेल्या ॲपचा वापर करा, असे आवाहन त्यांनी केले.

विनायक पवार यांनीही संघटनात्मक बांधणीबद्दल मार्गदर्शन केले. तालुका, महानगर स्तरावर समिती स्थापन करा, प्रत्येक विधानसभा मतदार संघात समन्वयकाच्या नियुक्त्या करा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी अन्य पाहुण्यांचीही भाषणे झाली. विजय काळे यांनी अहवाल वाचन आणि संचालन केले. कविता भोसले यांनी प्रास्ताविक केले, तर गजानन काळे यांनी आभार मानले.