शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
2
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
3
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
4
Robert Kiyosaki Alert: 'लाखो लोक उद्ध्वस्त होतील, एक मोठा विनाश येणार...' ‘या’ दिग्गजाचा भयानक इशारा, सुटण्याचा मार्ग काय?
5
माजी क्रिकेट प्रशिक्षकाची हत्या, हल्लेखोरांनी पत्नी आणि सुनेसमोरच झाडल्या गोळ्या  
6
प्रियकरासमोरच गाडीतून खेचत नेलं, विमानतळाजवळ सामूहिक अत्याचार; पोलिसांकडून आरोपींचा एन्काऊंटर
7
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
8
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
9
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
10
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
11
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
12
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
13
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
14
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
15
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
16
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
17
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
18
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
19
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
20
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी

ही महामारी नव्हे, व्यापारमारी : ‘एनव्हीसीसी’चा टाळेबंदीला कडाडून विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 00:32 IST

NVCC strongly opposes the lockdown महाराष्ट्र सरकारने कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी सोमवारी रात्रीपासून ३० एप्रिलपर्यंत टाळेबंदी घोषित करून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारची दुकाने बंद करण्याचा आदेश निर्गमित केला आहे. या निर्णयाला नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांच्या नेतृत्वात व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून कडाडून विरोध दर्शवला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महाराष्ट्र सरकारने कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी सोमवारी रात्रीपासून ३० एप्रिलपर्यंत टाळेबंदी घोषित करून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारची दुकाने बंद करण्याचा आदेश निर्गमित केला आहे. या निर्णयाला नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांच्या नेतृत्वात व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून कडाडून विरोध दर्शवला आहे.

नागपूर शहरात फेब्रुवारी २०२१ पासून टाळेबंदी सुरू आहे. त्यात राज्य सरकारने संपूर्ण महाराष्ट्रासह नागपुरातही टाळेबंदी वाढवली आहे. यामुळे व्यापाऱ्यांची अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळणार असल्याची भीती मेहाडिया यांनी व्यक्त केली आहे. गेल्यावर्षी टाळेबंदीचा सर्वाधिक फटका लहान व मध्यम व्यापाऱ्यांना बसला आहे. सरकारने अर्थसंकल्पात लहान व मध्यम व्यापाऱ्यांसाठी कोणतेच विशेष पॅकेज जाहीर केले नाही. व्यापारी वर्गाला कर सवलतही दिली गेली नाही. मात्र, कर प्रक्रियेची अंमलबजावणी करण्यासाठी कठोर नियम लागू केले आणि दंडवृद्धी केली आहे. सोबतच टाळेबंदीत वीज बिल, टेलिफोन बिल आणि अन्य बिले भरावी लागली. टाळेबंदीच्या नावाने दुकाने बंद असतील, तर व्यापारी वर्ग कर आणि बिल भरणार कसे, असा सवाल मेहाडिया यांनी उपस्थित केला आहे.

व्यापारी वर्ग कर भरत असल्यानेच शासकीय कोषागार भरलेला असतो. त्यावरच सरकारचा कारभार चालतो. व्यापारच बंद असेल तर व्यापारी कर कुठून भरणार, असा सवाल चेंबरचे सचिव रामअवतार तोतला यांनी केला आहे. सरकारने टाळेबंदीत उद्योग जगताला आंशिक निर्बंधांसह सवलत प्रदान केली आहे. मात्र, सगळे निर्बंध केवळ व्यापारी वर्गालाच का लागू होतात? उद्योग जगतातून वस्तू निर्माण होत राहतील आणि त्याउलट ठोक व किरकोळ बाजार बंद असेल, तर वस्तूंची विक्री कशी होईल? विशेष म्हणजे, टाळेबंदीत बांधकामे सुरू ठेवण्यास परवानगी दिली गेली आहे. परंतु, निर्माणासंबंधीत दुकानेच बंद असतील, तर निर्माण कार्य कसे होईल, याकडे सरकारने लक्ष देण्याची मागणी तोतला यांनी केली आहे.

या सगळ्या स्थितीचा विचार करताना पूर्णत: टाळेबंदीचा निर्णय परत घ्यावा आणि नागरिकांवर कठोर निर्बंध लावून व नियमांची अवहेलना करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नाग विदर्भ चेंबर ऑफ काॅमर्सने केली आहे. बाजार आणि व्यापार बंद असेल, तर व्यापारी कोरोना महामारीने नाही, तर टाळेबंदीमुळे आर्थिक संकटाने मरणार आहे. त्यामुळे, टाळेबंदी न करता नियमांतर्गत व्यापार सुरू ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजार