शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
3
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
4
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
5
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
6
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
7
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
8
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
9
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
10
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
11
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
12
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
13
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
14
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
15
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
16
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
17
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
18
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
19
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
20
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...

‘महाज्योती’च्या पायलट ट्रेनिंगसाठी नॉनक्रीमी लेअरची अट कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:07 IST

संचालक मंडळाच्या बैठकीत झाला निर्णय आनंद इंगोले वर्धा: ‘महाज्योती’द्वारे देण्यात येणाऱ्या वैमानिकाच्या प्रशिक्षणासाठी नॉनक्रीमी लेअरची अट असतानाही, ही अट ...

संचालक मंडळाच्या बैठकीत झाला निर्णय

आनंद इंगोले

वर्धा: ‘महाज्योती’द्वारे देण्यात येणाऱ्या वैमानिकाच्या प्रशिक्षणासाठी नॉनक्रीमी लेअरची अट असतानाही, ही अट वगळण्यात आली होती. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करीत गरीब विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली होती. यासंदर्भात सोमवारी पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत नॉनक्रीमी लेअरची अट कायम ठेवली आहे.

महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती)तर्फे ओबीसी व भटक्या विमुक्त जाती-जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी विविध योजना राबविण्यात येतात. या सर्व योजनांचा लाभ घेण्याकरिता विद्यार्थ्यांना नॉनक्रीमी लेअरची अट अनिवार्य केलेली आहे. महाज्योती २० विद्यार्थ्यांना वैमानिकाचे प्रशिक्षण देणार आहे. त्यासाठी २.५ कोटी रुपये फ्लाइंग क्लबला दिले आहेत. नागपूरचे विभागीय आयुक्त यांच्याकडे त्याची जबाबदारी दिली आहे. परंतु या योजनेसाठी नॉनक्रीमी लेअरची अट वगळण्यात आली असल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांनी केला होता. शासकीय निधीतून श्रीमंतांच्या मुलांना प्रशिक्षण देण्यात येईल, अशी ओरड विद्यार्थ्यांची होती. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून ३१ मे रोजी होणाऱ्या बैठकीत निर्णयावर फेरविचार होण्याची गरज व्यक्त केली होती. सोमवारी महाज्योतीच्या कार्यालयात झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत इतर प्रशिक्षणाप्रमाणेच पायलट ट्रेनिंगकरिताही नॉनक्रीमी लेअरची अट कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

- ओबीसी, भटक्या जाती-जमाती व विशेष मागास प्रवर्गातील गरीब पाल्यांना उच्चशिक्षण मिळावे याकरिताच महाज्योतीची स्थापना करण्यात आली. याचा लाभ घेण्याकरिता विद्यार्थ्यांना नॉनक्रीमी लेअरची अट घालण्यात आली आहे; पण पायलट ट्रेनिंगकरिताच नॉनक्रीमी लेअरची अट वगळण्यात आली होती. त्यामुळे गरीब विद्यार्थ्यांच्या हक्कावर गदा येणार होती. संचालक मंडळाच्या बैठकीत विषय मांडण्यात आल्याने नॉनक्रीमी लेअरची अट कायम ठेवण्यात आली.

प्रा. दिवाकर गमे, संचालक महाज्योती

- २० विद्यार्थ्यांना बनविणार वैमानिक

महाज्योती २० विद्यार्थ्यांना वैमानिकाचे प्रशिक्षण देणार आहे. त्यासाठी फ्लाइंग क्लबला २.५ कोटी दिले आहेत. विभागीय आयुक्तांना त्याची जबाबदारी दिली आहे. या २० विद्यार्थ्यांमध्ये दोन विद्यार्थी शहिदाच्या कुटुंबातील, दोन विद्यार्थी शेतकरी आत्महत्या केलेल्या कुटुंबातील, व्हीजे-एनटीच्या चार विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

कोरोनामुळे महाज्योतीसाठी काम करण्यास वेळच मिळाला नाही

(निर्णयार्थ)

संचालक मंडळाच्या बैठकीत व्यक्त केली खंत

नागपूर : ऑगस्ट २०२०मध्ये ‘महाज्योती’च्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. याच महिन्यात संचालकांची निवड झाली. दोन महिने पदभरतीत गेले. डिसेंबरला कामाला सुरुवातच केली असताना कोरोना वाढला, लॉकडाऊन लागले. त्यामुळे महाज्योतीसाठी काम करण्यास वेळ मिळाला नाही. संचालकांच्या बैठकी होऊ शकल्या नाही. त्यामुळे योजना राबविता आल्या नाही, प्रशिक्षण घेता आले नाही, परिणामी निधीही खर्च झाला नाही, अशी खंत महाज्योतीचे अध्यक्ष व मदत व पुनर्वसन आणि बहुजन विकासमंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. महाज्योतीच्या संचालक मंडळाची तिसरी बैठक सोमवारी सामाजिक न्याय भवनात पार पडली. या बैठकीला वडेट्टीवार उपस्थित होते. बैठकीत प्राचार्य बबनराव तायवाडे, प्रा. दिवाकर गमे व लक्ष्मण वडले यांच्यासह व्यवस्थापकीय संचालक प्रदीप डांगे उपस्थित होते. पत्रकार परिषदेत त्यांनी महाज्योतीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.

- ३५ कोटीच मिळाले महाज्योतीला

महाज्योतीला आतापर्यंत ३५ कोटी मिळाले आहेत. १५० कोटी रुपयांची तरतूद केली असून, अजूनही निधी मिळालेला नाही. ३५ कोटींपैकी ३.५ कोटी रुपये खर्च झाले आहे. मिळालेला निधी परत जाणार नाही, तो योग्यवेळी खर्च होईल, असे वडेट्टीवार म्हणाले.

- संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय

१) पीएच.डी.ची फेलोशिप ५०० विद्यार्थ्यांना देणार. २०१७ पासून नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांचा समावेश करणार. पाच वर्षासाठी २१ हजार रुपये विद्यावेतन देणार.

२) एम.फीलसाठी २०० विद्यार्थ्यांची निवड.

३) बँकिंग परीक्षेसाठी प्रशिक्षण.

४) भटक्या जातींच्या संशोधनासाठी दिल्लीच्या संस्थेला काम देणार.

५) यूपीएससीसाठी १००० व एमपीएससीसाठी २००० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण.

६) कौशल्य विकास योजनेचा लाभ ४० हजार विद्यार्थ्यांना देणार.

७) पोलीस भरतीपूर्वी प्रशिक्षण व उच्चशिक्षणासाठी प्रवेशपूर्व परीक्षेच्या कोचिंगचे टार्गेट पूर्ण करणार.

८) शाळा-महाविद्यालयात महाज्योतीच्या योजनांचे फलक लावणार.

९) प्रत्येक जिल्ह्यात चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती करणार.

१०) शेतकऱ्यांसाठी तेल बियाणांचे क्लस्टर तयार करणार.

- ओबीसीच्या तीन विद्यार्थ्यांना घेतले ताब्यात

नागपूर : महाज्योतीकडून असलेल्या अपेक्षांची पूर्ती होऊ न शकल्याने मंत्र्यांना जाब विचारण्यासाठी औरंगाबाद विद्यापीठातून काही विद्यार्थी नागपुरात आले होते. या विद्यार्थ्यांना बजाजनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये विठ्ठल नागरे, अंकुश राठोड व वाकोडे नावाच्या विद्यार्थ्यांच्या समावेश आहे.