शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
3
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
4
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
5
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
6
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
7
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
8
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
9
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
10
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
11
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
12
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
13
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
14
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
15
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
16
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
17
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
18
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
19
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
20
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

‘महाज्योती’च्या पायलट ट्रेनिंगसाठी नॉनक्रीमी लेअरची अट कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:07 IST

संचालक मंडळाच्या बैठकीत झाला निर्णय आनंद इंगोले वर्धा: ‘महाज्योती’द्वारे देण्यात येणाऱ्या वैमानिकाच्या प्रशिक्षणासाठी नॉनक्रीमी लेअरची अट असतानाही, ही अट ...

संचालक मंडळाच्या बैठकीत झाला निर्णय

आनंद इंगोले

वर्धा: ‘महाज्योती’द्वारे देण्यात येणाऱ्या वैमानिकाच्या प्रशिक्षणासाठी नॉनक्रीमी लेअरची अट असतानाही, ही अट वगळण्यात आली होती. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करीत गरीब विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली होती. यासंदर्भात सोमवारी पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत नॉनक्रीमी लेअरची अट कायम ठेवली आहे.

महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती)तर्फे ओबीसी व भटक्या विमुक्त जाती-जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी विविध योजना राबविण्यात येतात. या सर्व योजनांचा लाभ घेण्याकरिता विद्यार्थ्यांना नॉनक्रीमी लेअरची अट अनिवार्य केलेली आहे. महाज्योती २० विद्यार्थ्यांना वैमानिकाचे प्रशिक्षण देणार आहे. त्यासाठी २.५ कोटी रुपये फ्लाइंग क्लबला दिले आहेत. नागपूरचे विभागीय आयुक्त यांच्याकडे त्याची जबाबदारी दिली आहे. परंतु या योजनेसाठी नॉनक्रीमी लेअरची अट वगळण्यात आली असल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांनी केला होता. शासकीय निधीतून श्रीमंतांच्या मुलांना प्रशिक्षण देण्यात येईल, अशी ओरड विद्यार्थ्यांची होती. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून ३१ मे रोजी होणाऱ्या बैठकीत निर्णयावर फेरविचार होण्याची गरज व्यक्त केली होती. सोमवारी महाज्योतीच्या कार्यालयात झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत इतर प्रशिक्षणाप्रमाणेच पायलट ट्रेनिंगकरिताही नॉनक्रीमी लेअरची अट कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

- ओबीसी, भटक्या जाती-जमाती व विशेष मागास प्रवर्गातील गरीब पाल्यांना उच्चशिक्षण मिळावे याकरिताच महाज्योतीची स्थापना करण्यात आली. याचा लाभ घेण्याकरिता विद्यार्थ्यांना नॉनक्रीमी लेअरची अट घालण्यात आली आहे; पण पायलट ट्रेनिंगकरिताच नॉनक्रीमी लेअरची अट वगळण्यात आली होती. त्यामुळे गरीब विद्यार्थ्यांच्या हक्कावर गदा येणार होती. संचालक मंडळाच्या बैठकीत विषय मांडण्यात आल्याने नॉनक्रीमी लेअरची अट कायम ठेवण्यात आली.

प्रा. दिवाकर गमे, संचालक महाज्योती

- २० विद्यार्थ्यांना बनविणार वैमानिक

महाज्योती २० विद्यार्थ्यांना वैमानिकाचे प्रशिक्षण देणार आहे. त्यासाठी फ्लाइंग क्लबला २.५ कोटी दिले आहेत. विभागीय आयुक्तांना त्याची जबाबदारी दिली आहे. या २० विद्यार्थ्यांमध्ये दोन विद्यार्थी शहिदाच्या कुटुंबातील, दोन विद्यार्थी शेतकरी आत्महत्या केलेल्या कुटुंबातील, व्हीजे-एनटीच्या चार विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

कोरोनामुळे महाज्योतीसाठी काम करण्यास वेळच मिळाला नाही

(निर्णयार्थ)

संचालक मंडळाच्या बैठकीत व्यक्त केली खंत

नागपूर : ऑगस्ट २०२०मध्ये ‘महाज्योती’च्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. याच महिन्यात संचालकांची निवड झाली. दोन महिने पदभरतीत गेले. डिसेंबरला कामाला सुरुवातच केली असताना कोरोना वाढला, लॉकडाऊन लागले. त्यामुळे महाज्योतीसाठी काम करण्यास वेळ मिळाला नाही. संचालकांच्या बैठकी होऊ शकल्या नाही. त्यामुळे योजना राबविता आल्या नाही, प्रशिक्षण घेता आले नाही, परिणामी निधीही खर्च झाला नाही, अशी खंत महाज्योतीचे अध्यक्ष व मदत व पुनर्वसन आणि बहुजन विकासमंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. महाज्योतीच्या संचालक मंडळाची तिसरी बैठक सोमवारी सामाजिक न्याय भवनात पार पडली. या बैठकीला वडेट्टीवार उपस्थित होते. बैठकीत प्राचार्य बबनराव तायवाडे, प्रा. दिवाकर गमे व लक्ष्मण वडले यांच्यासह व्यवस्थापकीय संचालक प्रदीप डांगे उपस्थित होते. पत्रकार परिषदेत त्यांनी महाज्योतीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.

- ३५ कोटीच मिळाले महाज्योतीला

महाज्योतीला आतापर्यंत ३५ कोटी मिळाले आहेत. १५० कोटी रुपयांची तरतूद केली असून, अजूनही निधी मिळालेला नाही. ३५ कोटींपैकी ३.५ कोटी रुपये खर्च झाले आहे. मिळालेला निधी परत जाणार नाही, तो योग्यवेळी खर्च होईल, असे वडेट्टीवार म्हणाले.

- संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय

१) पीएच.डी.ची फेलोशिप ५०० विद्यार्थ्यांना देणार. २०१७ पासून नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांचा समावेश करणार. पाच वर्षासाठी २१ हजार रुपये विद्यावेतन देणार.

२) एम.फीलसाठी २०० विद्यार्थ्यांची निवड.

३) बँकिंग परीक्षेसाठी प्रशिक्षण.

४) भटक्या जातींच्या संशोधनासाठी दिल्लीच्या संस्थेला काम देणार.

५) यूपीएससीसाठी १००० व एमपीएससीसाठी २००० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण.

६) कौशल्य विकास योजनेचा लाभ ४० हजार विद्यार्थ्यांना देणार.

७) पोलीस भरतीपूर्वी प्रशिक्षण व उच्चशिक्षणासाठी प्रवेशपूर्व परीक्षेच्या कोचिंगचे टार्गेट पूर्ण करणार.

८) शाळा-महाविद्यालयात महाज्योतीच्या योजनांचे फलक लावणार.

९) प्रत्येक जिल्ह्यात चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती करणार.

१०) शेतकऱ्यांसाठी तेल बियाणांचे क्लस्टर तयार करणार.

- ओबीसीच्या तीन विद्यार्थ्यांना घेतले ताब्यात

नागपूर : महाज्योतीकडून असलेल्या अपेक्षांची पूर्ती होऊ न शकल्याने मंत्र्यांना जाब विचारण्यासाठी औरंगाबाद विद्यापीठातून काही विद्यार्थी नागपुरात आले होते. या विद्यार्थ्यांना बजाजनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये विठ्ठल नागरे, अंकुश राठोड व वाकोडे नावाच्या विद्यार्थ्यांच्या समावेश आहे.