शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

‘इमर्जन्सी’साठी नाही एकही ‘एक्स्ट्रा कोच’

By admin | Updated: February 7, 2015 02:00 IST

रेल्वे गाडीतील एसी नादुरुस्त झाल्यानंतर प्रवाशांची गैरसोय होते. तक्रार करूनही त्याचा काहीच फायदा होत नाही. प्रवाशी चेनपुलींग करून गोंधळ घालतात.

दयानंद पाईकराव नागपूर रेल्वे गाडीतील एसी नादुरुस्त झाल्यानंतर प्रवाशांची गैरसोय होते. तक्रार करूनही त्याचा काहीच फायदा होत नाही. प्रवाशी चेनपुलींग करून गोंधळ घालतात. एखाद्या कोचमध्ये तांत्रीक बिघाड होतो. तर काही कोचमधील पंखे बंद पडतात. नागपूर रेल्वेस्थानकावर ही स्थिती नेहमीच उद्भवते. नागपुरात एकही ‘एक्स्ट्रा कोच’ नसल्याची धक्कादायक माहिती असून यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊन त्यांनी गोंधळ घालण्याच्या घटनात सातत्याने वाढ होत आहे.नागपूर रेल्वेस्थानकावरून दररोज १०० ते ११० रेल्वेगाड्या आणि ४० ते ५० हजार प्रवासी ये-जा करतात. अनेकदा रेल्वेगाड्यांच्या कोचमध्ये बिघाड झाल्यामुळे प्रवासी गाडीतील टीसीला त्याची तक्रार करतात. परंतु त्यांना दुरुस्तीच्या आश्वासनाशिवाय काहीच मिळत नाही. यामुळे नागपूर रेल्वेस्थानकावर अनेकदा प्रवाशांनी गोंधळ घातल्याच्या घटना घडल्या आहेत. बिघाड दुरुस्त झाल्याशिवाय गाडी पुढे जाऊ देणार नाही, अशी भूमिका घेऊन प्रवासी वारंवार चेन पुलींग करतात. उन्हाळ्यात एसी नादुरुस्त होण्याच्या अनेक घटना घडतात. यात इतर प्रवाश्यांनाही मनस्ताप होतो. वेळ निभावून नेण्यासाठी संबंधित बिघाड दुरुस्त करून गाडी पुढील प्रवासाला रवाना करण्यात येते. परंतु या पासून कायमचा तोडगा काढण्याचा प्रयत्न आजपर्यंत झाला नाही. नागपूर रेल्वेस्थानकावर अशी आपातकालीन परिस्थिती हाताळण्यासाठी काही अतिरिक्त कोच ठेवण्याची गरज आहे. परंतु नागपूर रेल्वेस्थानकावर असा एकही अतिरिक्त कोच ठेवण्यात येत नाही. मुंबईला मात्र अशा प्रकारची परिस्थिती उद्भवल्यास अतिरिक्त कोचची व्यवस्था आहे. त्यामुळे नागपुरातही अतिरिक्त कोच ठेऊन प्रवाशांना दिलासा देण्याची गरज आहे.(प्रतिनिधी)