शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
12
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
13
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
14
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
15
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
16
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
17
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
18
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
19
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
Daily Top 2Weekly Top 5

वित्तीय तूट ५ टक्के झाली तरीही काळजी नको : सुनील अलघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 21:56 IST

मंदावलेली अर्थव्यवस्था पुन्हा जिवंत करायची असेल तर मागणी निर्माण करून ३०० ते ४०० दशलक्ष सशक्त मध्यमवर्गीय लोकांना खर्च करण्यास प्रोत्साहित केले पाहिजे. त्यामुळे वस्तूंची मागणी वाढेल आणि परिणामी उत्पादनात वाढ होईल आणि नोकऱ्या निर्माण होतील

ठळक मुद्देदेशांतर्गत वस्तूंच्या मागणीत वाढ आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आम्ही विकसनशील अर्थव्यवस्था आहोत आणि मंदावलेली अर्थव्यवस्था पुन्हा जिवंत करायची असेल तर मागणी निर्माण करून ३०० ते ४०० दशलक्ष सशक्त मध्यमवर्गीय लोकांना खर्च करण्यास प्रोत्साहित केले पाहिजे. त्यामुळे वस्तूंची मागणी वाढेल आणि परिणामी उत्पादनात वाढ होईल आणि नोकऱ्या निर्माण होतील, असे मत ब्रिटानिया इंडस्ट्रीजचे माजी सीईओ व एमडी आणि एसकेए अ‍ॅडव्हायझर्सचे प्रवर्तक सुनील अलघ यांनी मंगळवारी येथे व्यक्त केले.लोकमत भवनात लोकमत समूहाच्या ज्येष्ठ संपादकीय सहकाऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन आणि राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा प्रामुख्याने उपस्थित होते.आगामी केंद्रीय अर्थसंकल्पावरील प्रश्नाला उत्तर देताना अलघ म्हणाले, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारने पहिल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात गरीब लोकांवर लक्ष केंद्रित केले. त्यात लोकांना स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वयंपाक गॅस व विजेची जोडणी, एलईडी बल्ब, आरोग्य विमा आणि शौचालयांची सुविधा मिळाली. विदेशातही भारताची प्रतिमा उंचावली आणि आकाशात झेप घेतली. हा जगातील सर्वात वेगवान विकसनशील अर्थव्यवस्था म्हणून ओळखला जाणारा प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण होता. याचा सकारात्मक परिणाम म्हणून एनडीए पुढील निवडणुकीत मोठ्या बहुमताने सत्तेत परतली.अलघ म्हणाले, गेल्या जुलै महिन्यात अर्थमंत्र्यांनी सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प अत्युत्तम होता. त्यात पुरवठा करणाऱ्या बाजूची काळजी घेतली होती. त्यामुळे मागणीच्या बाजूकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे उत्पादने व वस्तूंची मागणी वाढविण्यात सरकार अपयशी ठरले. त्याचाच परिणाम बघता अर्थव्यवस्थेला आता खाली वळण लागले आहे. या परिस्थितीत संतुलन साधण्यासाठी आगामी बजेटमध्ये वस्तूंच्या मागणीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि मध्यमवर्गीयांना खर्चास प्रोत्साहित केले पाहिजे. त्यासाठी सरकारने उद्योग, पायाभूत सुविधा क्षेत्रात पैसे गुंतवायला हवेत. आवश्यक असल्यास सरकारने वित्तीय तुटीच्या किरकोळ वाढीकडे दुर्लक्ष केले पाहिजे.सुनील अलघ म्हणाले, आम्हाला एफआरबीएम लक्ष्य स्तराखाली वित्तीय तूट ठेवण्याचे खूप वेड लागले आहे. परंतु वित्तीय तूट ५ टक्क्यांपर्यंत गेली तरीही त्यातून अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन होण्यास काहीच हरकत नाही. त्याची काळजी नको. महागाईमुळे आरबीआय मनोग्रहित झाली आहे. विकसनशील अर्थव्यवस्थेत सुमारे ५ ते ६ टक्के महागाई अपेक्षित असल्याचे जॉन मेनार्ड केनिज म्हणतात, असे अलघ यांनी सांगितले.हाऊसिंगमध्ये ४ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली, पण त्या प्रमाणात घरांची मागणी वाढली नाही. यावर दर्डा यांनी लक्ष वेधले असता अलघ म्हणाले, लोकांनी कमी किमतीच्या आणि परवडणाऱ्या घरांमध्ये पैसे गुंतविले, पण प्रकल्प अर्धेच पूर्ण झाले आणि लोक अपूर्ण प्रकल्पात अडकले आहेत. नोटाबंदीबद्दल बोलताना अलघ म्हणाले, सरकारचा नोटाबंदीचा हेतू चांगला होता, पण अंमलबजावणी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. मेक इन इंडिया अपयशी ठरली नाही. अ‍ॅपल आणि अ‍ॅमेझॉनसारख्या कंपन्यांनी भारतात अब्ज डॉलर गुंतवणुकीची घोषणा केली. मेक इन इंडियानंतरही सरकार फ्रान्स, रशिया आणि इतर देशांकडून संरक्षण उपकरणे खरेदी करीत असल्याचे अलघ यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर ते म्हणाले, भारतात निर्मिती होत नसलेल्या उपकरणांची भारत खरेदी करीत आहेत यात काहीही चूक नाही.७० वर्षीय अलघ परिपूर्णतेसाठी प्रचलित आहेत. त्यांच्या एसकेए अ‍ॅडव्हायझर्सचे बायोकॉन, जीएसके, लोकमत आणि अनेक विदेशी कंपन्या ग्राहक आहेत. ते दरमहा दोनपेक्षा जास्त ग्राहक स्वीकारत नाहीत. चर्चेदरम्यान अलघ यांच्यासोबत त्यांच्या अभिनेत्री पत्नी डॉ. माया अलघ उपस्थित होत्या.

टॅग्स :Economyअर्थव्यवस्थाnagpurनागपूर