शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

परीक्षेची चिंता नाही, शाळा बंद झाल्याने काळजी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:07 IST

दहावी, बारावीच्या पालकांनी व्यक्त केली खंत नागपूर : दहावी आणि बारावीची परीक्षा एप्रिल महिन्यात ऑफलाईन होणार आहे. कोरोनामुळे यंदा ...

दहावी, बारावीच्या पालकांनी व्यक्त केली खंत

नागपूर : दहावी आणि बारावीची परीक्षा एप्रिल महिन्यात ऑफलाईन होणार आहे. कोरोनामुळे यंदा दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही. नोव्हेंबरमध्ये कशातरी शाळा सुरू झाल्या. पण कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता, प्रशासनाने ७ मार्चपर्यंत शाळा बंद केल्या. शाळा, ज्युनिअर कॉलेज सुरू झाल्याने विद्यार्थ्यांची अभ्यासाची लिंक लागली होती. आता शाळा बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण कसा होईल? याची चिंता पालकांना सतावत आहे.

कोरोना संक्रमणात परीक्षेचे नियोजन बोर्डासाठी डोकेदुखी ठरणार आहे. ऑफलाईन परीक्षा असल्याने पालकांनाही परीक्षा देण्यासाठी पाठविण्याबाबत काहीसी भीती आहे. पण या भीतीपेक्षा शाळा बंद झाल्याने पालक पुन्हा चिंतेत आहे. नागपूर जिल्ह्यातील काही पालकांशी यासंदर्भात विचारणा केली असता ते म्हणाले की, परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी बोर्डाची आहे. कोरोना असल्याने बोर्ड त्या दृष्टीकोनातून सुरक्षात्मक उपाययोजना करणारच आहे. पालक म्हणून आम्हीसुद्धा विद्यार्थ्यांना योग्य सुरक्षात्मक उपाययोजना करूनच पाठविणार आहोत. पण खरा प्रश्न आहे, की शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही. शाळा सुरू झाल्यामुळे विद्यार्थी अभ्यास करायला लागले होते. सराव परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची उजळणी होणार होती. किमान त्या माध्यमातून परीक्षेची तयारी होणार होती. मात्र, शाळा बंद झाल्याने विद्यार्थ्यांची अभ्यासाची लिंक तुटणार आहे. कोरोनाचे संकट पुढे किती दिवस राहाते, शाळा पुन्हा सुरू होतील की नाही, हा प्रश्न आहे.

- माझी मुलगी दहावीची परीक्षा देणार आहे. परीक्षा ऑफलाईनच व्हायला पाहिजे. त्यामुळे मुलांचे योग्य मूल्यांकन व त्याला गुणवत्ता सिद्ध करता येईल. बोर्ड करेल ना सुरक्षात्मक नियोजन.

राजेश भागवतकर, पालक

- परीक्षेच्या दरम्यान विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची बोर्ड घेईल ना काळजी. पण, खरी काळजी आता शाळा ज्या बंद झाल्यात ना, त्याची आहे. मुले कशीतरी अभ्यासाला लागली होती. शालेय परीक्षेच्या माध्यमातून त्यांची उजळणी होणार होती. शाळा बंद झाल्याने पुन्हा विद्यार्थ्यांची लिंक तुटेल.

दिलीप आडे, पालक

- प्रशासनाने केवळ दहावी व बारावीचे वर्गच सुरू करायला हवे होते. उगाच पाचव्या वर्गापासून शाळा सुरू केली. त्यामुळे शाळेत गर्दी झाली आणि विद्यार्थी संक्रमित झाले. परिणामी शाळा बंद कराव्या लागल्या. पण, शाळा बंद केल्याने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे नुकसान होणार आहे. सर्वच मुलांकडे ऑनलाईनची साधने नाहीत आणि विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणाला गांभीर्यानेही घेत नाहीत. शाळा सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षेची तयारी होत होती.

- रिना चवरे, पालक

- कोरोनाच्या भीतीमुळे मुलांना वर्षभर शाळेत पाठविले नाही. परंतु परीक्षेसाठी त्यांना शाळेत पाठवून अनेक विद्यार्थ्यांच्या संपर्कात येऊ देणे म्हणजे एकप्रकारे कोरोनाला निमंत्रण देणे होय. मुलांमध्ये भीती असल्याने ते परीक्षेत एकाग्रपणे राहून पेपर सोडवू शकणार नाहीत. यासाठी परीक्षा ऑनलाईन घेणेच संयुक्तिक आहे.

बाळा आगलावे, पालक

- दहावी आणि बारावीच्या मुलांना कोरोना कळतोय. खबरदारी घ्यावी हेसुद्धा त्यांना माहिती आहे. शाळा सुरू झाल्यानंतर मुले खबरदारी घेतच होती. शाळांनीही मुलांच्या आरोग्याची काळजी घेतली होती. शिक्षण चांगले सुरू होते. मुलेही परीक्षेच्या तयारीत व्यस्त झाली होती. त्यामुळे दहावी आणि बारावीचे वर्ग किमान बंद करायला नको होते.

रामचंद्र उमाठे, पालक

- विद्यार्थ्यांचा अभ्यास पूर्ण झाला नाही. शाळेत कसातरी अभ्यासक्रम पूर्ण झाला असता, सराव परीक्षेच्या माध्यमातून त्यांचा सराव झाला असता. अभ्यासक्रमच पूर्ण होणार नाही, तर परीक्षा कशी देणार, याची काळजी आहे.

विलास कांबळे, पालक