शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

एकही विद्यार्थी काेराेनाबाधित नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:10 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कळमेश्वर : राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने नववी ते बारावीपर्यंत शाळा-महाविद्यालय २३ नाेव्हेंबरपासून तसेच पाचवी ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कळमेश्वर : राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने नववी ते बारावीपर्यंत शाळा-महाविद्यालय २३ नाेव्हेंबरपासून तसेच पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा २७ जानेवारीपासून सुरू करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार शहर व ग्रामीण भागातील शाळा-महाविद्यालय काेराेनाच्या नियमावली व उपाययाेजनांचे काटेकाेरपणे पालन करीत सुरू झाले आहे. आता १४ दिवसाचा कालावधी उलटल्यानंतर शाळांमधून एकही विद्यार्थी काेराेना पाॅझिटिव्ह आढळून आलेला नाही, अशी माहिती गटशिक्षणाधिकारी मंगला गजभिये यांनी दिली.

काेराेनाच्या प्रादुर्भावामुळे तब्बल १० महिन्यानंतर शाळा उघडण्यात आल्या. पहिल्या टप्प्यात नववी ते बारावीचे वर्ग व त्यानंतर पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यात आले आहे. तालुक्यात ९ ते १२ वर्गापर्यंत ६,०७१ विद्यार्थी असून, २,९१८ विद्यार्थी नियमित शाळेत येत आहेत. तसेच पाचवी ते आठवीपर्यंतच्या ८२ शाळेत एकूण ७,१६७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी ३,७०६ विद्यार्थ्यांनी शाळेत नियमित हजेरी दर्शविली आहे. काेराेनाचा संसर्ग कमी झाल्याने शासनाने शाळांची दारे उघडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शहरी व ग्रामीण भागातील शाळा नियमित सुरू झाल्या आहेत. यात शासनाने वेळोवेळी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करीत आवश्यक साेईसुविधांसह शाळा-महाविद्यालय सुरू करण्यात आले आहेत. सध्या तालुक्यात कोरोनाची भीती कमी झाली असली तरी विद्यार्थ्यांची १०० टक्के उपस्थिती दिसून येत नाही.

विद्यार्थ्यांची दरराेज थर्मल स्क्रीनिंग व ऑक्सिजन तपासणी प्राधान्याने हाेत असल्याने शिक्षक काेराेनाला राेखण्यात यशस्वी ठरले आहेत. वर्गखाेल्यात ठराविक अंतर ठेवून बैठक व्यवस्था केली जात आहे. एकत्रित जेवण व खेळण्यास मनाई आहे. पहिल्या दिवसापासून काेराेना नियमावलीचे पालन करण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात असून, मास्कचा वापर व इतर बाबी काेराेनाला हरविण्यास समर्थ ठरत आहेत.