शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

एकही विद्यार्थी काेराेनाबाधित नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:10 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कळमेश्वर : राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने नववी ते बारावीपर्यंत शाळा-महाविद्यालय २३ नाेव्हेंबरपासून तसेच पाचवी ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कळमेश्वर : राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने नववी ते बारावीपर्यंत शाळा-महाविद्यालय २३ नाेव्हेंबरपासून तसेच पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा २७ जानेवारीपासून सुरू करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार शहर व ग्रामीण भागातील शाळा-महाविद्यालय काेराेनाच्या नियमावली व उपाययाेजनांचे काटेकाेरपणे पालन करीत सुरू झाले आहे. आता १४ दिवसाचा कालावधी उलटल्यानंतर शाळांमधून एकही विद्यार्थी काेराेना पाॅझिटिव्ह आढळून आलेला नाही, अशी माहिती गटशिक्षणाधिकारी मंगला गजभिये यांनी दिली.

काेराेनाच्या प्रादुर्भावामुळे तब्बल १० महिन्यानंतर शाळा उघडण्यात आल्या. पहिल्या टप्प्यात नववी ते बारावीचे वर्ग व त्यानंतर पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यात आले आहे. तालुक्यात ९ ते १२ वर्गापर्यंत ६,०७१ विद्यार्थी असून, २,९१८ विद्यार्थी नियमित शाळेत येत आहेत. तसेच पाचवी ते आठवीपर्यंतच्या ८२ शाळेत एकूण ७,१६७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी ३,७०६ विद्यार्थ्यांनी शाळेत नियमित हजेरी दर्शविली आहे. काेराेनाचा संसर्ग कमी झाल्याने शासनाने शाळांची दारे उघडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शहरी व ग्रामीण भागातील शाळा नियमित सुरू झाल्या आहेत. यात शासनाने वेळोवेळी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करीत आवश्यक साेईसुविधांसह शाळा-महाविद्यालय सुरू करण्यात आले आहेत. सध्या तालुक्यात कोरोनाची भीती कमी झाली असली तरी विद्यार्थ्यांची १०० टक्के उपस्थिती दिसून येत नाही.

विद्यार्थ्यांची दरराेज थर्मल स्क्रीनिंग व ऑक्सिजन तपासणी प्राधान्याने हाेत असल्याने शिक्षक काेराेनाला राेखण्यात यशस्वी ठरले आहेत. वर्गखाेल्यात ठराविक अंतर ठेवून बैठक व्यवस्था केली जात आहे. एकत्रित जेवण व खेळण्यास मनाई आहे. पहिल्या दिवसापासून काेराेना नियमावलीचे पालन करण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात असून, मास्कचा वापर व इतर बाबी काेराेनाला हरविण्यास समर्थ ठरत आहेत.