शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

सोयाबीन नाही घरी अन् दर गेले गगनावरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:07 IST

आठ हजार झाले पार, अल्प उत्पादन, आयात बंद : फूड उत्पादनात वाढला वापर उमरेड : तेलबियांमध्ये गणले जाणारे आशिया ...

आठ हजार झाले पार, अल्प उत्पादन, आयात बंद : फूड उत्पादनात वाढला वापर

उमरेड : तेलबियांमध्ये गणले जाणारे आशिया खंडातील कडधान्य गटातील वनस्पती असलेल्या सोयाबीनचे दर गगनावरी पोहोचले आहेत. गुरुवारी उमरेडच्या बाजार समितीमध्ये तब्बल ८,२६० रुपये प्रती क्विंटल अशी सोयाबीनची विक्रमी नोंद झाली. सोयाबीन उत्पादकांसाठी ही आनंदाची बातमी असली तरी मागील हंगामातील सोयाबीन फारसे कुणाजवळ उरले नाही आणि नवीन उत्पादन बाजारपेठेत धडकण्यास तब्बल दोन ते अडीच महिन्याचा कालावधी आहे. सध्या ‘सोयाबीन नाही घरी अन् दर गेले गगनावरी’ अशी परिस्थिती आहे. यामुळे सध्यातरी हे विक्रमी दर शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण टाकणारेच ठरले आहे.

अमेरिका, अर्जेंटिना आणि ब्राझील हे सोयाबीनचे मुख्य उत्पादक देश मानले जातात. भारतासह आशिया खंडातील अन्य देश सुद्धा सोयाबीन उत्पादनाबाबत आघाडीवर आहेत. मागील हंगामात अमेरिका, अर्जेंटिना आणि ब्राझील येथे सोयाबीनचे उत्पादन अत्यल्प झाले. भारतात सुद्धा उत्पादन कमालीचे घटले. दुसरीकडे सोयाबीनच्या डीओसीची (ढेप) मागणी प्रचंड वाढली. उत्पादनास फटका बसल्याने सोयाबीन तेलाचे दर सुद्धा चांगलेच पेटले. शिवाय भारताने सोयाबीनचे तेल आयात न केल्यानेही तेलाच्या दरात वाढ झाली.

साधारणत: सप्टेंबर अखेरीस सोयाबीन बाजारपेठेत धडकतो. मागील हंगामात अगदी सुरुवातीला ३,८०० रुपये प्रती क्विंटल दर सोयाबीनला मिळाले. त्यानंतर लगेच ४ हजार आणि काही काळ पाच हजारावर सुद्धा स्थिरावले. अशातच पेरणीचा हंगाम लागला. शेतकऱ्यांकडील उरलेसुरले बियाणे सुद्धा संपले. आता सोयाबीन संपल्यात जमा असतानाच अभूतपूर्व ८,२६० रुपयांचा भाव ‘सोन्याहून पिवळे’ असाच आहे. तूर्त शेतकऱ्यांच्या नशिबी हा भाव नसला तरी सोयाबीनच्या दरात अशीच तेजी कायम राहो, अशी प्रार्थना केली जात आहे.

फूड उत्पादनात अग्रेसर

सोयाबीनचे अन्नपदार्थ शरीरामधील फायबर आणि प्रथिनांची कमतरता भरून काढतात. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सोयाबीन उत्तम असल्याचे भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण यांनीही स्पष्ट केले आहे. शिवाय कोरोना काळात सोयाबीनकडे अनेकांचे लक्ष वेधल्या गेले. भरपूर प्रोटीनयुक्त असलेल्या सोयाबीनपासून केवळ तेलच नव्हे तर डिओसी आणि आता अलीकडे मोठ्या प्रमाणावर फूडमध्ये सुद्धा वापर वाढला. फूड उत्पादनात सोयाबीन अग्रेसर असल्याने निश्चितच ‘उत्पादन कमी आणि दर गगनावरी’ असा प्रकार बघावयास मिळत आहे, असे मत महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाचे उपाध्यक्ष अ‍ॅड. विजय खवास यांनी व्यक्त केले.

सहा हजाराच्या आसपास

सध्या हिरवाकंच सोयाबीनचा मळा शेतात डोलत आहे. सप्टेंबर अखेरीस सोयाबीन बाजारपेठेत पोहोचेल. अशावेळी सहा हजार रुपये प्रती क्विंटलच्या आसपास दर राहतील, असा अंदाज वर्तविला जात आहे. सोयाबीन कारखानदारांनी १५ ऑक्टोबर २०२१ पर्यंत ६,८०० रुपये प्रती क्विंटल असे दर निर्धारित केले आहे. वायदा बाजार ६,८०० रुपये दाखवित असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आता शेतातून घरापर्यंत सोयाबीन कसा पोहोचतो यावर आणि निसर्गावरही सारेकाही अवलंबून आहे.

--

उमरेड येथील सतीश चकोले यांच्या शेतातील हिरवेकंच बहरलेले सोयाबीन.