शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
2
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
3
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
4
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
5
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
6
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
7
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
8
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
9
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
10
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
11
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
12
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
13
मोहम्मद युनूस यांचा तो एक निर्णय, ज्यामुळे बांगलादेश आज हिंसाचाराच्या आगीत होरपळतोय...
14
कोणती सरकारी बँक देतेय सर्वात स्वस्त पर्सनल लोन? कोणत्याही बँकेतून कर्ज घेण्यापूर्वी पाहा डिटेल्स
15
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
16
कोकण रेल्वेची प्रवाशांना मोठी भेट; मुंबईतून सुटणाऱ्या ‘या’ ट्रेनचे कोच कायमस्वरुपी वाढले
17
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
19
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
20
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील शासकीय वसतीगृहाला चार वर्षात एकही चादर मिळाली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 12:20 IST

युती सरकारला चार वर्षे पूर्ण झाली, मात्र सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहातील विद्यार्थी अन्याय सहन करीत आहेत. अनेक वसतिगृहातील चादरी, गाद्या, ब्लँकेट खराब झाल्या आहेत.

ठळक मुद्देसामाजिक न्याय विभागाचा मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर अन्याय

मंगेश व्यवहारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सामाजिक न्याय विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थांकडून मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह चालविण्यात येते. या वसतिगृहांना प्रति विद्यार्थी ९०० रुपये यासह वसतिगृहात लागणारे साहित्य शासनाकडून पुरविण्यात येते. परंतु गेल्या चार वर्षापासून एकाही वसतिगृहांना साहित्य पुरविण्यात आले नाही. अधिकाऱ्यांच्या धाकामुळे वसतिगृह संचालकसुद्धा त्याची तक्रार करीत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना आहे त्याच अवस्थेत निवारा करावा लागतो आहे.छत्रपती शाहू महाराज यांच्या संकल्पनेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना स्वतंत्र वसतिगृह असावे यातून महाराष्ट्र राज्यात समाज कल्याण विभागंतर्गत स्वयंसेवी संस्थांद्वारे अनुदानित वसतिगृह सुरू करण्यात आले. यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या विमुक्त जाती, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागासवर्गीय, दिव्यांग प्रवर्गातील वर्ग ५ ते १२ पर्यंत दुर्गम ग्रामीण भागातील विद्यार्थी निवास, भोजनसह शालेय शिक्षण घेत आहेत. महाराष्टात २३८८ अनुदानित वसतिगृह असून, त्यात हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहे. या वसतिगृहांना सामाजिक न्याय विभागांतर्गत चादर, ब्लँकेट, गादी, ताट, ग्लास, वाचनालयासाठी पुस्तके, सूक्ष्म अन्नद्रव्य, पूरक आहार, नाईट ड्रेस, कॉम्प्युटर, प्रिंटर, युपीएस, बॅटरी, कपाट, सतरंजी, बेडशिट या वस्तू पुरविण्यात येतात. २०१४ पर्यंत दरवर्षी काहीतरी साहित्य मिळत होते. पण त्यानंतर आजपर्यंत एकाही वसतिगृहाला साहित्याचा पुरवठा झाला नाही. युती सरकारला चार वर्षे पूर्ण झाली, मात्र सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहातील विद्यार्थी अन्याय सहन करीत आहे. अनेक वसतिगृहातील चादरी, गाद्या, ब्लँकेट खराब झाल्या आहे. वाचनालयासाठी पुस्तके सुद्धा आली नाही. त्यामुळे आहे त्याच अवस्थेत विद्यार्थी निवारा करीत आहे.कर्मचारीही घोषणा पूर्ण होण्याच्या प्रतीक्षेतविद्यार्थ्याप्रमाणे कर्मचारीसुद्धा अन्यायग्रस्त आहेत. राज्यभरात ८१०४ अधीक्षक, स्वयंपाकी, चौकीदार, मदतनीस २४ तास वसतिगृहात काम करीत आहेत. ८०००, ६०००, ५००० रुपये एवढे तुटपुंजे मानधन त्यांना मिळते आहे. सरकारने ५० टक्के मानधन वाढीची घोषणा करून चार वर्षे लोटले आहेत.

टॅग्स :Studentविद्यार्थी