शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
4
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
5
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
6
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
7
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
8
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
9
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
11
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
12
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
13
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
14
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
15
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
16
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
17
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
18
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
19
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
20
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन

शेतकरी संघटनांशी भेटीचे कोणतेही रेकॉर्ड नाही ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:08 IST

मुंबई : शेतकरी संघटनांनी आंदोलन पुकारलेल्या तीन कृषी कायद्याबाबत मुंबईतील माहिती अधिकार कार्यकर्ते जतीन देसाई यांनी कृषी, सहकार आणि ...

मुंबई : शेतकरी संघटनांनी आंदोलन पुकारलेल्या तीन कृषी कायद्याबाबत मुंबईतील माहिती अधिकार कार्यकर्ते जतीन देसाई यांनी कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण विभागाकडे माहितीच्या अधिकारात अर्ज करीत अध्यादेश जारी होण्यापूर्वी शेतकरी संघटनांशी किती बैठका घेतल्या गेल्या, तसेच अध्यादेश काढणे व बिले मंजूर करणे यामध्ये त्यांच्यासोबत किती बैठका झाल्यात, बैठकांना कोण उपस्थित होते, आदि माहिती मागितली होती. मात्र, त्यांच्या या अर्जावर सीपीआयओकडून मिळालेले उत्तर समाधानकारक नाही. त्यामुळे शेतकरी संघटनांशी भेटीचे कोणतेही रेकॉर्ड सरकारकडे नाही का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण विभागाच्या सीपीआयओने देसाई यांच्या माहिती अधिकार अर्जाला उत्तर देताना म्हटले की, सीपीआयओ या प्रकरणात कोणताही रेकॉर्ड ठेवत नाही व थेट अर्जच निकाली काढला. यावर देसाई यांनी अपील दाखल केले. त्यानंतर गुरुवारी दुपारी त्यांना संबंधित सीपीआयओकडून दुसरा मेल पाठविण्यात आला. त्यात म्हटले आहे की, सीपीआयओ मार्केटिंग १ प्रशासकीय कामाशी संबंधित आहे.

आपण मागितलेली माहितीचा अर्ज सीपीआयओ मार्केटिंग २ कडे पाठविण्यात आला आहे.

माहिती देण्यात होत असलेल्या टाळाटाळीवर देसाई यांनी नाराजी व्यक्त केली. सीपीआयओकडून मिळालेला प्रतिसाद दिशाभूल करणारा असून सीपीआयओने योग्य माहिती पुरविली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.