शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

विदर्भात पावसाची दडी, शेतकरी चिंतातूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2021 10:53 IST

Nagpur News मागील तीन ते चार दिवसांपासून विदर्भात पावसाने दडी मारल्यासारखी परिस्थिती आहे. यामुळे शेतकरी चिंतातूर झाले असून सर्वांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मागील तीन ते चार दिवसांपासून विदर्भात पावसाने दडी मारल्यासारखी परिस्थिती आहे. यामुळे शेतकरी चिंतातूर झाले असून सर्वांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.

मागील २४ तासांत विदर्भात केवळ चंद्रपूर वगळता कुठेही पावसाची नोंद नाही. रविवारी चंद्रपूर जिल्ह्यातील एकदोन ठिकाणी फक्त ५.४ मिमी तुरळक पावसाची नोंद आहे. विदर्भात पेरणी मोठ्या प्रमाणावर झाली असली, तरी दमदार पाऊस न झाल्याने पिके सुकण्याच्या बेतात आहेत. येत्या ४ ते ५ दिवसांत पाऊस झाला नाही, तर शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागू शकते, अशी अवस्था आहे.

दरम्यान, हवामान विभागाने या आठवड्यात नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये ९ तारखेपर्यंत पावसाची शक्यता वर्तविली आहे. तर अखेरच्या टप्प्यात अकोला, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज आहे. यंदा दमदार पावसाची अपेक्षा असल्याने शेतकऱ्यांनी उत्साहाने पेरण्या केल्या. मात्र, अपुऱ्या पावसाने शेतकऱ्यांपुढे संकट उभे ठाकण्याची शक्यता आहे.नागपूर जिल्ह्यातही पावसाने दडी मारली आहे. मागील तीन दिवसांपासून पावसाचा पत्ता नाही. धान पऱ्हे तयार असले, तरी रोवणीलायक पाऊस झाला नसल्याने आता पऱ्ह्यांना जगविणे सुरू आहे. धान रोवण्या अडचणीत आल्या आहेत. अन्य पिके चांगली उगवली असली, तरी जमिनीच्या ओलाव्यावर तग धरून आहेत.

नागपूरचे तापमान कालच्यापेक्षा एक अंशाने कमी म्हणजे ३६.३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. सकाळपासूनच आकाश निरभ्र होते. उकाडाही चांगलाच वाढलेला होता. सकाळची आर्द्रता ६७ टक्के नोंदविली गेली. सायंकाळीही ६८ टक्के नोंद झाल्याने फारसा फरक नव्हता. ...

विदर्भातील तापमान

जिल्हा : कमाल : किमान

अकोला : ३८.८ : २६.०

अमरावती : ३७.२ : २५.३

बुलडाणा : ३४.४ : २३.५

चंद्रपूर : ३३.४ : २४.४

गडचिरोली : २९.४ : २६.४

गोंदिया : ३५.० : २५.२

नागपूर : ३६.३ : २६.८

वर्धा : ३७.५ : २७.५

वाशिम : ३६.० : २४.०

यवतमाळ : ३७.२ : २१.५

...

टॅग्स :agricultureशेती