शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

विदर्भात पावसाची दडी, शेतकरी चिंतातूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2021 10:53 IST

Nagpur News मागील तीन ते चार दिवसांपासून विदर्भात पावसाने दडी मारल्यासारखी परिस्थिती आहे. यामुळे शेतकरी चिंतातूर झाले असून सर्वांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मागील तीन ते चार दिवसांपासून विदर्भात पावसाने दडी मारल्यासारखी परिस्थिती आहे. यामुळे शेतकरी चिंतातूर झाले असून सर्वांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.

मागील २४ तासांत विदर्भात केवळ चंद्रपूर वगळता कुठेही पावसाची नोंद नाही. रविवारी चंद्रपूर जिल्ह्यातील एकदोन ठिकाणी फक्त ५.४ मिमी तुरळक पावसाची नोंद आहे. विदर्भात पेरणी मोठ्या प्रमाणावर झाली असली, तरी दमदार पाऊस न झाल्याने पिके सुकण्याच्या बेतात आहेत. येत्या ४ ते ५ दिवसांत पाऊस झाला नाही, तर शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागू शकते, अशी अवस्था आहे.

दरम्यान, हवामान विभागाने या आठवड्यात नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये ९ तारखेपर्यंत पावसाची शक्यता वर्तविली आहे. तर अखेरच्या टप्प्यात अकोला, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज आहे. यंदा दमदार पावसाची अपेक्षा असल्याने शेतकऱ्यांनी उत्साहाने पेरण्या केल्या. मात्र, अपुऱ्या पावसाने शेतकऱ्यांपुढे संकट उभे ठाकण्याची शक्यता आहे.नागपूर जिल्ह्यातही पावसाने दडी मारली आहे. मागील तीन दिवसांपासून पावसाचा पत्ता नाही. धान पऱ्हे तयार असले, तरी रोवणीलायक पाऊस झाला नसल्याने आता पऱ्ह्यांना जगविणे सुरू आहे. धान रोवण्या अडचणीत आल्या आहेत. अन्य पिके चांगली उगवली असली, तरी जमिनीच्या ओलाव्यावर तग धरून आहेत.

नागपूरचे तापमान कालच्यापेक्षा एक अंशाने कमी म्हणजे ३६.३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. सकाळपासूनच आकाश निरभ्र होते. उकाडाही चांगलाच वाढलेला होता. सकाळची आर्द्रता ६७ टक्के नोंदविली गेली. सायंकाळीही ६८ टक्के नोंद झाल्याने फारसा फरक नव्हता. ...

विदर्भातील तापमान

जिल्हा : कमाल : किमान

अकोला : ३८.८ : २६.०

अमरावती : ३७.२ : २५.३

बुलडाणा : ३४.४ : २३.५

चंद्रपूर : ३३.४ : २४.४

गडचिरोली : २९.४ : २६.४

गोंदिया : ३५.० : २५.२

नागपूर : ३६.३ : २६.८

वर्धा : ३७.५ : २७.५

वाशिम : ३६.० : २४.०

यवतमाळ : ३७.२ : २१.५

...

टॅग्स :agricultureशेती