शहरं
Join us  
Trending Stories
1
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
2
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
3
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
4
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
5
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
6
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
9
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
10
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
11
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
12
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
13
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
14
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
15
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
16
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
17
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
18
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
19
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
20
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी

दुष्काळावर राजकारण नको

By admin | Updated: September 14, 2015 03:18 IST

संपूर्ण राज्य दुष्काळाच्या छायेत असताना सर्व राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांसाठी एकत्र येण्याची गरज आहे.

चंद्रशेखर बावनकुळे : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ‘जेलभरो’वर टीकानागपूर : संपूर्ण राज्य दुष्काळाच्या छायेत असताना सर्व राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांसाठी एकत्र येण्याची गरज आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसकडून दुष्काळाच्या नावावर राजकारण करण्याचा प्रयत्न होत असून जेलभरो आंदोलन हा त्याचाच भाग असल्याची टीका राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. १४ सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न न सुटल्यास राज्यातील प्रत्येक तालुक्यात जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला होता. या भूमिकेवर ऊर्जामंत्र्यांनी टीका केल्यामुळे दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापण्याची चिन्हे आहेत.चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर भाजपा कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधत असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टीका केली. राज्यभरातील दुष्काळी स्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाने उपाययोजना सुरू केल्या असून दुष्काळासाठी ९६० कोटी रुपयांची तरतूददेखील केली आहे. स्वत: मुख्यमंत्र्यांनीदेखील मराठवाड्याचा दौरा करून स्थिती जाणून घेतली आहे. शेतकरी संकटात आहे व त्याला मदतीसोबत धीर देण्याची गरज आहे. परंतु पक्षविस्तारासाठी जेलभरो आंदोलन करुन जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रयत्न आहे, असे बावनकुळे म्हणाले. राज्यातील शेतकऱ्यांची दैनावस्था आघाडी शासनामुळेच झाली असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांना केंद्राकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.(प्रतिनिधी)सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत कराआम्ही विरोधी पक्षात असताना दुष्काळाच्या प्रश्नावर तत्कालीन शासनाला नेहमीच सहकार्य केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी राजकारण न करता शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा. सहकार क्षेत्रात राष्ट्रवादीच्या नेत्यांचा दबदबा आहे. त्याचा उपयोग करुन शेतकऱ्यांना ते मदत का करत नाहीत, असा प्रश्न बावनकुळे यांनी उपस्थित केला.दोन महिन्यात ‘एनडीसीसी’ बँकेबाबत निर्णयनागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजेच ‘एनडीसीसी’ बँकेच्या अडचणीमुळे शेतकऱ्यांचे हाल होतील, असे अंदाज व्यक्त करण्यात येत होते. परंतु खासगी बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना यंदा ६८० कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. तसेच येत्या २ महिन्यात ‘एनडीसीसी’ बँकेबद्दल अंतिम निर्णय होईल असेदेखील बावनकुळे म्हणाले. २०१६ पर्यंत वीज कनेक्शन देणारराज्यातील अनेक ठिकाणी पाणी असूनदेखील वीजपंप नसल्यामुळे शेतकरी पाणी शेतात आणू शकत नसल्याची स्थिती आहे. जून २०१६ पर्यंत प्रलंबित वीज कनेक्शन देण्यात येतील, असे आश्वासन ऊर्जामंत्र्यांनी दिले. शिवाय आणेवारीच्या नव्या फॉर्म्युल्यामुळे यंदा शेतकऱ्यांना न्याय मिळेल असेदेखील ते म्हणाले.ऊर्जामंत्री करणार लंडनमधील कंपन्यांशी चर्चादरम्यान, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे लंडनमधील अपारंपरिक ऊर्जाक्षेत्रात कार्यरत असलेल्या चार कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. सौर उत्पादक कंपनीचे युनिट राज्यात सुरू करण्यासंदर्भात ही चर्चा महत्त्वाची ठरणार आहे. बावनकुळे यासाठी रविवारी रात्री लंडनसाठी रवाना झाले. त्यांचा हा दौरा तीन महिन्यांअगोदरच ठरला होता. त्यामुळे ते राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या दौऱ्यातील कार्यक्रमांना उपस्थित राहू शकणार नाहीत.