शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

दुष्काळावर राजकारण नको

By admin | Updated: September 14, 2015 03:18 IST

संपूर्ण राज्य दुष्काळाच्या छायेत असताना सर्व राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांसाठी एकत्र येण्याची गरज आहे.

चंद्रशेखर बावनकुळे : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ‘जेलभरो’वर टीकानागपूर : संपूर्ण राज्य दुष्काळाच्या छायेत असताना सर्व राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांसाठी एकत्र येण्याची गरज आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसकडून दुष्काळाच्या नावावर राजकारण करण्याचा प्रयत्न होत असून जेलभरो आंदोलन हा त्याचाच भाग असल्याची टीका राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. १४ सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न न सुटल्यास राज्यातील प्रत्येक तालुक्यात जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला होता. या भूमिकेवर ऊर्जामंत्र्यांनी टीका केल्यामुळे दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापण्याची चिन्हे आहेत.चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर भाजपा कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधत असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टीका केली. राज्यभरातील दुष्काळी स्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाने उपाययोजना सुरू केल्या असून दुष्काळासाठी ९६० कोटी रुपयांची तरतूददेखील केली आहे. स्वत: मुख्यमंत्र्यांनीदेखील मराठवाड्याचा दौरा करून स्थिती जाणून घेतली आहे. शेतकरी संकटात आहे व त्याला मदतीसोबत धीर देण्याची गरज आहे. परंतु पक्षविस्तारासाठी जेलभरो आंदोलन करुन जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रयत्न आहे, असे बावनकुळे म्हणाले. राज्यातील शेतकऱ्यांची दैनावस्था आघाडी शासनामुळेच झाली असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांना केंद्राकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.(प्रतिनिधी)सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत कराआम्ही विरोधी पक्षात असताना दुष्काळाच्या प्रश्नावर तत्कालीन शासनाला नेहमीच सहकार्य केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी राजकारण न करता शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा. सहकार क्षेत्रात राष्ट्रवादीच्या नेत्यांचा दबदबा आहे. त्याचा उपयोग करुन शेतकऱ्यांना ते मदत का करत नाहीत, असा प्रश्न बावनकुळे यांनी उपस्थित केला.दोन महिन्यात ‘एनडीसीसी’ बँकेबाबत निर्णयनागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजेच ‘एनडीसीसी’ बँकेच्या अडचणीमुळे शेतकऱ्यांचे हाल होतील, असे अंदाज व्यक्त करण्यात येत होते. परंतु खासगी बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना यंदा ६८० कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. तसेच येत्या २ महिन्यात ‘एनडीसीसी’ बँकेबद्दल अंतिम निर्णय होईल असेदेखील बावनकुळे म्हणाले. २०१६ पर्यंत वीज कनेक्शन देणारराज्यातील अनेक ठिकाणी पाणी असूनदेखील वीजपंप नसल्यामुळे शेतकरी पाणी शेतात आणू शकत नसल्याची स्थिती आहे. जून २०१६ पर्यंत प्रलंबित वीज कनेक्शन देण्यात येतील, असे आश्वासन ऊर्जामंत्र्यांनी दिले. शिवाय आणेवारीच्या नव्या फॉर्म्युल्यामुळे यंदा शेतकऱ्यांना न्याय मिळेल असेदेखील ते म्हणाले.ऊर्जामंत्री करणार लंडनमधील कंपन्यांशी चर्चादरम्यान, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे लंडनमधील अपारंपरिक ऊर्जाक्षेत्रात कार्यरत असलेल्या चार कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. सौर उत्पादक कंपनीचे युनिट राज्यात सुरू करण्यासंदर्भात ही चर्चा महत्त्वाची ठरणार आहे. बावनकुळे यासाठी रविवारी रात्री लंडनसाठी रवाना झाले. त्यांचा हा दौरा तीन महिन्यांअगोदरच ठरला होता. त्यामुळे ते राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या दौऱ्यातील कार्यक्रमांना उपस्थित राहू शकणार नाहीत.