शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

पदवी प्रवेशासाठी ‘ऑनलाईन’ नोंदणीची अट नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 23:49 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील पदवीच्या प्रवेशप्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पदवी प्रवेशासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला विद्यापीठ संकेतस्थळावर ‘ऑनलाईन’ नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

ठळक मुद्देविधिसभा सदस्यांचा सूर : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा विचार करावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील पदवीच्या प्रवेशप्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पदवी प्रवेशासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला विद्यापीठ संकेतस्थळावर ‘ऑनलाईन’ नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातील असून, गरीब विद्यार्थ्यांना ‘ऑनलाईन’ सुविधादेखील उपलब्ध नाहीत. अशास्थितीत ‘ऑनलाईन’ नोंदणीची अट रद्द करण्यात यावी, अशी मागणी विद्यापीठ वर्तुळासह विधिसभा सदस्यांकडूनदेखील करण्यात येत आहे. यासंदर्भात विधिसभेचे सदस्य अ‍ॅड. मनमोहन बाजपेयी यांनी यासंदर्भात प्रभारी कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांना पत्रदेखील पाठविले आहे.सद्यस्थितीत ‘कोरोना’मुळे अनेकांसमोर आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. पदवीला प्रवेश घेऊ इच्छिणारे अनेक विद्यार्थी हे ग्रामीण भागातील आहेत. अशास्थितीत त्यांना ‘इंटरनेट कॅफे’ची सुविधा उपलब्ध असेलच की नाही, हे सांगता येत नाही. भौगोलिक स्थिती लक्षात घेता अनेकांसाठी तर ‘ऑनलाईन’ अर्ज भरायला जाणे ही देखील एक परीक्षाच ठरणार आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू शकतात. या अटीचा त्यांना कुठलाही फायदा होणार नाही.महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना ‘ऑनलाईन’ अर्ज भरण्यासाठी सहकार्य करावे, असे विद्यापीठाने सांगितले आहे. परंतु अनेक महाविद्यालयातदेखील ‘नेट कनेक्टिव्हिटी’ अतिशय संथ आहे. मग ते विद्यार्थ्यांना कसे मदत करू शकणार, असा प्रश्न अ‍ॅड. मनमोहन बाजपेयी यांनी उपस्थित केला आहे. काही विधिसभा सदस्यांनीदेखील विद्यापीठाच्या ‘आॅनलाईन’ भूमिकेला विरोध करत ‘ऑफलाईन’ नोंदणीचीदेखील संधी देण्याची मागणी केली आहे.बाहेरील विद्यार्थ्यांचे काय?बारावीनंतर अनेक विद्यार्थ्यांना नागपूर किंवा इतर जिल्ह्यातील महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असेल. मात्र दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी वाहतुकीचे साधन उपलब्ध नाही. अशास्थितीत विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयात जाऊन कागदपत्रे देऊन प्रवेश कसा घ्यायचा, हा मोठा प्रश्न आहे. शिवाय महाविद्यालयात गर्दी झाल्यानंतर ‘कोरोना’चा प्रकोप होण्याचा धोका आहे. अशास्थितीत कुलगुरू याची जबाबदारी घेणार का, असा प्रश्न पत्रकारिता अभ्यास मंडळाचे माजी अध्यक्ष सुनील मिश्रा यांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठonlineऑनलाइन