शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

मनपाच्या अतिक्रमण विरोधी अभियानाची कुणालाच नाही भीती ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 01:03 IST

अतिक्रमण हटवण्याच्या दुसऱ्या दिवशीच पुन्हा नव्याने अतिक्रमण होत असल्याने या कारवाईचा धाक उरला आहे की नाही, अशी शंका घेण्यासारखे वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देपथक परतताच उभारले जाते अतिक्रमण : कायमस्वरूपी नियोजनाचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापौर संदीप जोशी यांनी पत्रकार परिषदेत महानगराला अतिक्रमणमुक्तकरण्यावर भर दिला. त्यानंतर मनपाने नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून झोन स्तरावर अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू केली. मात्र ही कारवाई नावापुरतीच ठरली आहे. अतिक्रमणच्या दुसऱ्या दिवशीच पुन्हा नव्याने अतिक्रमण होत असल्याने या कारवाईचा धाक उरला आहे की नाही, अशी शंका घेण्यासारखे वातावरण निर्माण झाले आहे.मनपाचे अतिक्रमण विरोधी पथक कारवाई करते. मात्र दुसऱ्याच दिवशी पुन्हा अतिक्रमण होते. नंतर महिनाभर त्याचा पथकाला पत्ताही नसतो. कारण एकदा कारवाई केल्यावर दुसऱ्यांदा हे पथक महिनोंमहिने फिरकतच नाही. मागील अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्याने कारवाईचा धाक कुणालाच वाटत नाही. आसीनगर, गड्डीगोदाम, कस्तूरचंद पार्क, मोमिनपुरा, बेसा बेलतरोडी यासह अनेक भागात अतिक्रमण उठवून परिसर मोकळा करण्यात आला होता. मात्र पुन्हा परिस्थिती जैसे थे झाली आहे.पथकाने आसीनगर झोनपर्यंतचे अतिक्रमण उठविले होते. मात्र ही कारवाई बिनकामाची ठरली. परिसरात सिमेंटीकरण करून मार्ग उत्तम बनविले आहेत. तरीही अतिक्रमणामुळे येथे वाहतूक कोंडीचा अनुभव नेहमीच येतो.२२ जानेवारीला धंतोली झोनमधील बेलतरोडी चौक ते मनीषनगर रेल्वे क्रॉसिंगपर्यंतचे अतिक्रमण हटविले होते. साहित्यही जप्त केले होते. मात्र दुसºया दिवशी पुन्हा दुकाने बसली.मंगळवारी गिट्टीखदान चौक व परिसरात सहायक आयुक्त अशोक पाटील यांच्या नेतृत्वात कारवाई झाली. मात्र पथक जाताच पुन्हा अतिक्रमण उभारणे सुरू झाले. महाल झोनअंतर्गत गांधी गेटसह मनपा झोनल कार्यालयाला लागून असलेले अतिक्रमणही हटविण्यात आले होते. मात्र दुसºयाच दिवशी परिस्थिती जुन्यासारखीच झाली.मोमिनपुरामध्ये काहीच फरक नाहीमोमिनपुरामध्ये अतिक्रमण विरोधी पथकाने दोन दिवसांपूर्वी कारवाई केली. ८० अतिक्रमणे हटविली. दिवसभर कारवाई चालली. मात्र दुसऱ्याच दिवशी पुन्हा परिस्थिती जैसे थे झाली. रस्ते पूर्वीसारखेच अरुंद झाले. बोरियापुरा रोड, टिमकी रोड, जामा मस्जिद रोडवर तर अतिक्रमणाची कारवाई झाल्यासारखे दुसºया दिवशी वाटतच नव्हते.कस्तूरचंद पार्कजवळ उभारले शेडकस्तूरचंद पार्कच्या सुरक्षा भिंतीला लागूनच अतिक्रमण उभारण्यात आले होते. पथकाने ते हटविलेही. पथक परत जाताच काही वेळातच पुन्हा अतिक्रमण बसले. कस्तूरचंद पार्कच्या भिंतीला लागूनच सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. फूटपाथही करण्यात आले असले तरी त्यावरही अतिक्रमण पसरले आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका