शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

पीक कर्जासाठी बँकांकडून एनओसीची गरज नाही : उपविभागीय अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 20:19 IST

शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यासाठी कुठल्याही बँकांकडून नाहरकत प्रमाणपत्र मिळविण्याची व ते सादर करण्याची आवश्यकता नाही. शेतकऱ्यांचे पीक कर्ज यादीत नाव आहे एवढेच पुरेसे असून बँकांनी शेतकºयांना एनओसी मागू नये, असे उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी यांनी कळविले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यासाठी कुठल्याही बँकांकडून नाहरकत प्रमाणपत्र मिळविण्याची व ते सादर करण्याची आवश्यकता नाही. शेतकऱ्यांचे पीक कर्ज यादीत नाव आहे एवढेच पुरेसे असून बँकांनी शेतकºयांना एनओसी मागू नये, असे उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी यांनी कळविले आहे.पीक कर्ज मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी विविध बँकांकडे जात असून, तेथे शेतकऱ्यांना त्यांची जमीन असणाऱ्या कार्यक्षेत्रात जेवढ्या काही बँका असतील त्यांच्याकडून ‘नो ड्यू सर्टिफिकेट’ मागविले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना नाहरकत प्रमाणपत्रासाठी मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रास होत आहे. त्याचप्रमाणे सद्यस्थितीत कोव्हिड-१९ साथरोग काळात बँक शाखेसमोर मोठ्या रांगा लागलेल्या असून, त्या ठिकाणी सामाजिक अंतरही पाळले जात नाही. ही बाब अत्यंत गंभीर असून भारतीय रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकान्वये ‘नाहरकत प्रमाणपत्रा’ची गरज नसतानाही असे दाखले सर्व शाखांकडून मागविले जात आहेत.भारतीय रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकान्वये यापुढे शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी कोणत्याही प्रकारे ‘नाहरकत प्रमाणपत्र’ सर्रास मागण्याची कार्यपद्धती बँकेने बंद करावी, याबाबत कळविण्यात आलेले आहे. शेतकरी बांधवांनी आवश्यक कागदपत्रांसह आपले पीक कर्ज प्रकरण संबंधित बँक शाखेत जमा करावे. कोणत्याही प्रकारे बँकेने इतर शाखांचे नाहरकत प्रमाणपत्र मागितल्यास ते देऊ नये, याची संबंधित शेतकऱ्यांनी नोंद घेऊन आपले श्रम, वेळ व पैसा याची बचत करावी, असे आवाहन उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी यांनी केले आहे.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जnagpurनागपूर