शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

‘इमर्जन्सी आऊटएज’च्या नावावर उपराजधानीत ‘बत्ती गुल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 12:46 IST

‘मेन्टेनन्स’च्या नावाखाली प्रत्येक आठवड्यात बुधवारी तासन्तास वीजपुरवठा बंद केल्यामुळे झालेल्या वादानंतर आता महावितरणने नवीन युक्ती शोधली आहे. आपात्कालीन स्थिती म्हणजेच ‘इमर्जन्सी आऊटएज’च्या नावाखाली वीजपुरवठा बंद करण्यात येत आहे.

ठळक मुद्देसाप्ताहिक ‘मेन्टेनन्स’ला लपविण्याचा प्रयत्न नागरिकांना कुठलीही सूचना नाही

कमल शर्मा।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘मेन्टेनन्स’च्या नावाखाली प्रत्येक आठवड्यात बुधवारी तासन्तास वीजपुरवठा बंद केल्यामुळे झालेल्या वादानंतर आता महावितरणने नवीन युक्ती शोधली आहे. आपात्कालीन स्थिती म्हणजेच ‘इमर्जन्सी आऊटएज’च्या नावाखाली वीजपुरवठा बंद करण्यात येत आहे. विशेष म्हणजे ‘इमर्जन्सी आऊटएज’ केवळ बुधवारीच होत असल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान जनता यामुळे हैराण आहे. अगोदरप्रमाणे याची कुठलीही आगाऊ माहिती देण्यात येत नसल्याचे चित्र आहे.बुधवारचा दिवस हा साप्ताहिक ‘मेन्टेनन्स’साठी आरक्षित असतो. महावितरणतर्फे नागरिकांना अगोदरच माहिती देण्यात येते. मात्र याअंतर्गत एकाच भागातील वीजपुरवठा वारंवार कापण्यात येत नाही. महावितरणने उन्हाळ्यामध्ये नियमांचे पालन केले नाही. ‘मेन्टेनन्स’ची निविदाप्रक्रिया न झाल्यामुळे ३० जूनपर्यंत मान्सूनपूर्व मोहीम पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे उन्हाळ्यात अनेकदा वीजपुरवठा खंडित झाला. या मुद्द्यावर अनेकांनी आक्षेप घेतला. ऊर्जामंत्री चंद्रशेकर बावनकुळे यांनीदेखील अधिकाऱ्यांचा ‘क्लास’ घेतला. अशा स्थितीत महावितरणने नवीन मार्ग शोधून काढला आहे. ग्राहकांना कुठलीही पूर्वकल्पना न देता बुधवारी सकाळी वीजपुरवठा बंद करण्यात येतो. वीज गेल्यानंतर ग्राहकांना ‘इमर्जन्सी आऊटएज’बद्दल ‘एसएमएस’ करण्यात येत आहेत. यात वीजपुरवठा कधी सुरळीत होईल याची वेळ सांगण्यात येते. जर वीजपुरवठा आपात्कालीन कारणांमुळे बंद करण्यात येतो, तर समस्या ठीक कधी होईल हे अगोदरपासूनच कसे कळते, असा प्रश्न ग्राहकांकडूनउपस्थित होत आहे.

पावसामुळेदेखील अडचणदरम्यान, दिवसभर येत असलेल्या पावसामुळेदेखील काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित राहिला. यातील बहुतांश प्रकरणे व्यक्तिगत तक्रारींची होती. वर्धा मार्ग स्थित एका अपार्टमेन्टचा एक ‘फेज’ गेला होता. तक्रार केल्यानंतर काही तासांनी महावितरणचे कर्मचारी पोहोचले.

अनेक भागांमध्ये संकटमहावितरणच्या अंतर्गत येणाºया अनेक भागात बुधवारी वीजसंकट राहिले. वर्धा मार्ग, स्नेहनगर यासारख्या भागात सकाळी सकाळी वीजपुरवठा खंडित झाला. नागरिकांना नंतर ‘इमर्जन्सी आऊटएज’चा ‘एसएमएस’ आला. ‘मॅसेज’मध्ये नमूद वेळेच्या तासानंतर वीज आली. ‘मेन्टेनन्स’चे काम पूर्ण झाल्यानंतर तांत्रिक अडथळ्यामुळे वीजपुरवठा आणखी वेळ खंडित राहिला, असे महावितरणतर्फे स्पष्ट करण्यात आले.

टॅग्स :electricityवीज