शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
5
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
6
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
7
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
8
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
9
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
10
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
11
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
12
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
13
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
14
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
15
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
16
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
17
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
18
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
19
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
20
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!

‘इमर्जन्सी आऊटएज’च्या नावावर उपराजधानीत ‘बत्ती गुल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 12:46 IST

‘मेन्टेनन्स’च्या नावाखाली प्रत्येक आठवड्यात बुधवारी तासन्तास वीजपुरवठा बंद केल्यामुळे झालेल्या वादानंतर आता महावितरणने नवीन युक्ती शोधली आहे. आपात्कालीन स्थिती म्हणजेच ‘इमर्जन्सी आऊटएज’च्या नावाखाली वीजपुरवठा बंद करण्यात येत आहे.

ठळक मुद्देसाप्ताहिक ‘मेन्टेनन्स’ला लपविण्याचा प्रयत्न नागरिकांना कुठलीही सूचना नाही

कमल शर्मा।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘मेन्टेनन्स’च्या नावाखाली प्रत्येक आठवड्यात बुधवारी तासन्तास वीजपुरवठा बंद केल्यामुळे झालेल्या वादानंतर आता महावितरणने नवीन युक्ती शोधली आहे. आपात्कालीन स्थिती म्हणजेच ‘इमर्जन्सी आऊटएज’च्या नावाखाली वीजपुरवठा बंद करण्यात येत आहे. विशेष म्हणजे ‘इमर्जन्सी आऊटएज’ केवळ बुधवारीच होत असल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान जनता यामुळे हैराण आहे. अगोदरप्रमाणे याची कुठलीही आगाऊ माहिती देण्यात येत नसल्याचे चित्र आहे.बुधवारचा दिवस हा साप्ताहिक ‘मेन्टेनन्स’साठी आरक्षित असतो. महावितरणतर्फे नागरिकांना अगोदरच माहिती देण्यात येते. मात्र याअंतर्गत एकाच भागातील वीजपुरवठा वारंवार कापण्यात येत नाही. महावितरणने उन्हाळ्यामध्ये नियमांचे पालन केले नाही. ‘मेन्टेनन्स’ची निविदाप्रक्रिया न झाल्यामुळे ३० जूनपर्यंत मान्सूनपूर्व मोहीम पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे उन्हाळ्यात अनेकदा वीजपुरवठा खंडित झाला. या मुद्द्यावर अनेकांनी आक्षेप घेतला. ऊर्जामंत्री चंद्रशेकर बावनकुळे यांनीदेखील अधिकाऱ्यांचा ‘क्लास’ घेतला. अशा स्थितीत महावितरणने नवीन मार्ग शोधून काढला आहे. ग्राहकांना कुठलीही पूर्वकल्पना न देता बुधवारी सकाळी वीजपुरवठा बंद करण्यात येतो. वीज गेल्यानंतर ग्राहकांना ‘इमर्जन्सी आऊटएज’बद्दल ‘एसएमएस’ करण्यात येत आहेत. यात वीजपुरवठा कधी सुरळीत होईल याची वेळ सांगण्यात येते. जर वीजपुरवठा आपात्कालीन कारणांमुळे बंद करण्यात येतो, तर समस्या ठीक कधी होईल हे अगोदरपासूनच कसे कळते, असा प्रश्न ग्राहकांकडूनउपस्थित होत आहे.

पावसामुळेदेखील अडचणदरम्यान, दिवसभर येत असलेल्या पावसामुळेदेखील काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित राहिला. यातील बहुतांश प्रकरणे व्यक्तिगत तक्रारींची होती. वर्धा मार्ग स्थित एका अपार्टमेन्टचा एक ‘फेज’ गेला होता. तक्रार केल्यानंतर काही तासांनी महावितरणचे कर्मचारी पोहोचले.

अनेक भागांमध्ये संकटमहावितरणच्या अंतर्गत येणाºया अनेक भागात बुधवारी वीजसंकट राहिले. वर्धा मार्ग, स्नेहनगर यासारख्या भागात सकाळी सकाळी वीजपुरवठा खंडित झाला. नागरिकांना नंतर ‘इमर्जन्सी आऊटएज’चा ‘एसएमएस’ आला. ‘मॅसेज’मध्ये नमूद वेळेच्या तासानंतर वीज आली. ‘मेन्टेनन्स’चे काम पूर्ण झाल्यानंतर तांत्रिक अडथळ्यामुळे वीजपुरवठा आणखी वेळ खंडित राहिला, असे महावितरणतर्फे स्पष्ट करण्यात आले.

टॅग्स :electricityवीज