शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

‘इमर्जन्सी आऊटएज’च्या नावावर उपराजधानीत ‘बत्ती गुल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 12:46 IST

‘मेन्टेनन्स’च्या नावाखाली प्रत्येक आठवड्यात बुधवारी तासन्तास वीजपुरवठा बंद केल्यामुळे झालेल्या वादानंतर आता महावितरणने नवीन युक्ती शोधली आहे. आपात्कालीन स्थिती म्हणजेच ‘इमर्जन्सी आऊटएज’च्या नावाखाली वीजपुरवठा बंद करण्यात येत आहे.

ठळक मुद्देसाप्ताहिक ‘मेन्टेनन्स’ला लपविण्याचा प्रयत्न नागरिकांना कुठलीही सूचना नाही

कमल शर्मा।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘मेन्टेनन्स’च्या नावाखाली प्रत्येक आठवड्यात बुधवारी तासन्तास वीजपुरवठा बंद केल्यामुळे झालेल्या वादानंतर आता महावितरणने नवीन युक्ती शोधली आहे. आपात्कालीन स्थिती म्हणजेच ‘इमर्जन्सी आऊटएज’च्या नावाखाली वीजपुरवठा बंद करण्यात येत आहे. विशेष म्हणजे ‘इमर्जन्सी आऊटएज’ केवळ बुधवारीच होत असल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान जनता यामुळे हैराण आहे. अगोदरप्रमाणे याची कुठलीही आगाऊ माहिती देण्यात येत नसल्याचे चित्र आहे.बुधवारचा दिवस हा साप्ताहिक ‘मेन्टेनन्स’साठी आरक्षित असतो. महावितरणतर्फे नागरिकांना अगोदरच माहिती देण्यात येते. मात्र याअंतर्गत एकाच भागातील वीजपुरवठा वारंवार कापण्यात येत नाही. महावितरणने उन्हाळ्यामध्ये नियमांचे पालन केले नाही. ‘मेन्टेनन्स’ची निविदाप्रक्रिया न झाल्यामुळे ३० जूनपर्यंत मान्सूनपूर्व मोहीम पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे उन्हाळ्यात अनेकदा वीजपुरवठा खंडित झाला. या मुद्द्यावर अनेकांनी आक्षेप घेतला. ऊर्जामंत्री चंद्रशेकर बावनकुळे यांनीदेखील अधिकाऱ्यांचा ‘क्लास’ घेतला. अशा स्थितीत महावितरणने नवीन मार्ग शोधून काढला आहे. ग्राहकांना कुठलीही पूर्वकल्पना न देता बुधवारी सकाळी वीजपुरवठा बंद करण्यात येतो. वीज गेल्यानंतर ग्राहकांना ‘इमर्जन्सी आऊटएज’बद्दल ‘एसएमएस’ करण्यात येत आहेत. यात वीजपुरवठा कधी सुरळीत होईल याची वेळ सांगण्यात येते. जर वीजपुरवठा आपात्कालीन कारणांमुळे बंद करण्यात येतो, तर समस्या ठीक कधी होईल हे अगोदरपासूनच कसे कळते, असा प्रश्न ग्राहकांकडूनउपस्थित होत आहे.

पावसामुळेदेखील अडचणदरम्यान, दिवसभर येत असलेल्या पावसामुळेदेखील काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित राहिला. यातील बहुतांश प्रकरणे व्यक्तिगत तक्रारींची होती. वर्धा मार्ग स्थित एका अपार्टमेन्टचा एक ‘फेज’ गेला होता. तक्रार केल्यानंतर काही तासांनी महावितरणचे कर्मचारी पोहोचले.

अनेक भागांमध्ये संकटमहावितरणच्या अंतर्गत येणाºया अनेक भागात बुधवारी वीजसंकट राहिले. वर्धा मार्ग, स्नेहनगर यासारख्या भागात सकाळी सकाळी वीजपुरवठा खंडित झाला. नागरिकांना नंतर ‘इमर्जन्सी आऊटएज’चा ‘एसएमएस’ आला. ‘मॅसेज’मध्ये नमूद वेळेच्या तासानंतर वीज आली. ‘मेन्टेनन्स’चे काम पूर्ण झाल्यानंतर तांत्रिक अडथळ्यामुळे वीजपुरवठा आणखी वेळ खंडित राहिला, असे महावितरणतर्फे स्पष्ट करण्यात आले.

टॅग्स :electricityवीज