शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
2
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
3
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
4
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव
5
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
6
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
7
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
8
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
9
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
10
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
11
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
12
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
13
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
14
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
15
Mahadev Munde Case: महादेव मुंडेंसोबत भांडण करणारी 'ती' व्यक्ती कोण? हत्या प्रकरणाला नवी कलाटणी
16
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
17
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
18
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
19
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
20
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय

जागावाटपाचा अधिकार राज्यातील कुठल्याही नेत्याला नाही

By योगेश पांडे | Updated: June 12, 2023 19:09 IST

Nagpur News राज्यातील जागावाटप हे केंद्रीय संसदीय मंडळ तसेच मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्या समन्वयातून होईल. जागावाटपाचा अधिकार राज्यातील कुठल्याही नेत्याला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. सोमवारी ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

योगेश पांडे

नागपूर : आगामी निवडणूकांच्या जागांवरून भाजप व शिवसेना (बाळासाहेब ठाकरे गट) यांच्यातील लोकप्रतिनिधींमध्ये असंतोष निर्माण झाल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहेत. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. पुढील १५ वर्षे राज्यात भाजप-सेना युतीचेच सरकार असेल. जागांवरील दाव्यावरून कुठलीही नाराजी नाही. राज्यातील जागावाटप हे केंद्रीय संसदीय मंडळ तसेच मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्या समन्वयातून होईल. जागावाटपाचा अधिकार राज्यातील कुठल्याही नेत्याला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. सोमवारी ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

भाजपला शिवसेनेतील काही मंत्री नको आहेत, अशा चर्चा रंगल्या आहेत. मात्र भाजपा कुणाच्याही अधिकारांमध्ये हस्तक्षेप करत नाही. शिवसेनेतील कुणाला मंत्री करायचे, काढायचे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अधिकार आहे. आम्ही त्यात नाक खुपसणार नाही. विरोधकांकडून भाजप-सेना युतीच्या आमदारांमध्ये असंतोष व अस्वस्थता निर्माण व्हावा यासाठी ही गाजराची पुंगी सोडली असल्याचा दावा बावनकुळे यांनी केला. 

वारीवरून विरोधकांनी राजकारण टाळावेमहाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व राजकीय पक्षांना वारीतील घटनेचे राजकारण करू नये असे आवाहन केले होते. त्यांनी तेथील तथ्यदेखील मांडले होते. विरोधकांनी या विषयावर राजकारण करू नये. वारकरी जनता ही सर्वात महत्त्वाची आहे याचे भान राजकीय पक्षांनी ठेवावे व राजकारणाची परंपरा कायम ठेवावी, विरोधकांना राजकारण करायचे असेल तर आम्ही काय म्हणणार, असे बावनकुळे म्हणाले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना याहून भयंकर प्रकार झाले होते. सर्व पक्षांनी त्यावेळी सहकार्य केले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये नवनवीन जबाबदाऱ्या मिळाल्याने ते उत्साहात आहे. मात्र त्यांनी सरकारच्या आवाहनाचा मान राखला पाहिजे, असे त्यांनी आवाहन केले.

विरोधी बाकांवर आल्यावर राष्ट्रवादीला मुस्लिम, ओबीसी दिसतातकॉंग्रेस-राष्ट्रवादी सत्तेबाहेर गेल्यावर ते समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. शरद पवार, बंटी पाटील यांचे वक्तव्य आले आणि संभाजीनगर, कोल्हापुरात तणाव निर्माण झाला. सत्तेत असताना कॉंग्रेस-राष्ट्रवादीला केवळ व्यापारी व उद्योगपती दिसतात. मात्र विरोधी पक्षात गेल्यावर मात्र मुस्लिम, ओबीसी, मागासवर्गीय समाजाची आठवण येते व समाजात कलह निर्माण करण्याचा प्रयत्न होतो, असा आरोप बावनकुळे यांनी लावला.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे