शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
2
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
3
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
4
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
5
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
6
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
7
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
8
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
9
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
10
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
11
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
12
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
13
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
14
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
15
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
16
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
17
Crime: घरात एकटीच होती प्रेयसी, प्रियकर भेटायला गेला, तेवढ्यात आला भाऊ अन्...शेवट भयंकर!
18
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!
19
गौरी खानचं 'टोरी' रेस्टॉरंट : ₹१५०० चे मोमोज, ₹११०० चं सॅलड; मॅश बटाट्याची किंमत ऐकून अवाक् व्हाल
20
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहाची तयारी कशी करावी? वाचा तारीख, मुहूर्त, आरती आणि पूजाविधी 

जागावाटपाचा अधिकार राज्यातील कुठल्याही नेत्याला नाही

By योगेश पांडे | Updated: June 12, 2023 19:09 IST

Nagpur News राज्यातील जागावाटप हे केंद्रीय संसदीय मंडळ तसेच मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्या समन्वयातून होईल. जागावाटपाचा अधिकार राज्यातील कुठल्याही नेत्याला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. सोमवारी ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

योगेश पांडे

नागपूर : आगामी निवडणूकांच्या जागांवरून भाजप व शिवसेना (बाळासाहेब ठाकरे गट) यांच्यातील लोकप्रतिनिधींमध्ये असंतोष निर्माण झाल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहेत. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. पुढील १५ वर्षे राज्यात भाजप-सेना युतीचेच सरकार असेल. जागांवरील दाव्यावरून कुठलीही नाराजी नाही. राज्यातील जागावाटप हे केंद्रीय संसदीय मंडळ तसेच मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्या समन्वयातून होईल. जागावाटपाचा अधिकार राज्यातील कुठल्याही नेत्याला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. सोमवारी ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

भाजपला शिवसेनेतील काही मंत्री नको आहेत, अशा चर्चा रंगल्या आहेत. मात्र भाजपा कुणाच्याही अधिकारांमध्ये हस्तक्षेप करत नाही. शिवसेनेतील कुणाला मंत्री करायचे, काढायचे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अधिकार आहे. आम्ही त्यात नाक खुपसणार नाही. विरोधकांकडून भाजप-सेना युतीच्या आमदारांमध्ये असंतोष व अस्वस्थता निर्माण व्हावा यासाठी ही गाजराची पुंगी सोडली असल्याचा दावा बावनकुळे यांनी केला. 

वारीवरून विरोधकांनी राजकारण टाळावेमहाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व राजकीय पक्षांना वारीतील घटनेचे राजकारण करू नये असे आवाहन केले होते. त्यांनी तेथील तथ्यदेखील मांडले होते. विरोधकांनी या विषयावर राजकारण करू नये. वारकरी जनता ही सर्वात महत्त्वाची आहे याचे भान राजकीय पक्षांनी ठेवावे व राजकारणाची परंपरा कायम ठेवावी, विरोधकांना राजकारण करायचे असेल तर आम्ही काय म्हणणार, असे बावनकुळे म्हणाले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना याहून भयंकर प्रकार झाले होते. सर्व पक्षांनी त्यावेळी सहकार्य केले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये नवनवीन जबाबदाऱ्या मिळाल्याने ते उत्साहात आहे. मात्र त्यांनी सरकारच्या आवाहनाचा मान राखला पाहिजे, असे त्यांनी आवाहन केले.

विरोधी बाकांवर आल्यावर राष्ट्रवादीला मुस्लिम, ओबीसी दिसतातकॉंग्रेस-राष्ट्रवादी सत्तेबाहेर गेल्यावर ते समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. शरद पवार, बंटी पाटील यांचे वक्तव्य आले आणि संभाजीनगर, कोल्हापुरात तणाव निर्माण झाला. सत्तेत असताना कॉंग्रेस-राष्ट्रवादीला केवळ व्यापारी व उद्योगपती दिसतात. मात्र विरोधी पक्षात गेल्यावर मात्र मुस्लिम, ओबीसी, मागासवर्गीय समाजाची आठवण येते व समाजात कलह निर्माण करण्याचा प्रयत्न होतो, असा आरोप बावनकुळे यांनी लावला.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे