शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

जागावाटपाचा अधिकार राज्यातील कुठल्याही नेत्याला नाही

By योगेश पांडे | Updated: June 12, 2023 19:09 IST

Nagpur News राज्यातील जागावाटप हे केंद्रीय संसदीय मंडळ तसेच मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्या समन्वयातून होईल. जागावाटपाचा अधिकार राज्यातील कुठल्याही नेत्याला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. सोमवारी ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

योगेश पांडे

नागपूर : आगामी निवडणूकांच्या जागांवरून भाजप व शिवसेना (बाळासाहेब ठाकरे गट) यांच्यातील लोकप्रतिनिधींमध्ये असंतोष निर्माण झाल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहेत. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. पुढील १५ वर्षे राज्यात भाजप-सेना युतीचेच सरकार असेल. जागांवरील दाव्यावरून कुठलीही नाराजी नाही. राज्यातील जागावाटप हे केंद्रीय संसदीय मंडळ तसेच मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्या समन्वयातून होईल. जागावाटपाचा अधिकार राज्यातील कुठल्याही नेत्याला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. सोमवारी ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

भाजपला शिवसेनेतील काही मंत्री नको आहेत, अशा चर्चा रंगल्या आहेत. मात्र भाजपा कुणाच्याही अधिकारांमध्ये हस्तक्षेप करत नाही. शिवसेनेतील कुणाला मंत्री करायचे, काढायचे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अधिकार आहे. आम्ही त्यात नाक खुपसणार नाही. विरोधकांकडून भाजप-सेना युतीच्या आमदारांमध्ये असंतोष व अस्वस्थता निर्माण व्हावा यासाठी ही गाजराची पुंगी सोडली असल्याचा दावा बावनकुळे यांनी केला. 

वारीवरून विरोधकांनी राजकारण टाळावेमहाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व राजकीय पक्षांना वारीतील घटनेचे राजकारण करू नये असे आवाहन केले होते. त्यांनी तेथील तथ्यदेखील मांडले होते. विरोधकांनी या विषयावर राजकारण करू नये. वारकरी जनता ही सर्वात महत्त्वाची आहे याचे भान राजकीय पक्षांनी ठेवावे व राजकारणाची परंपरा कायम ठेवावी, विरोधकांना राजकारण करायचे असेल तर आम्ही काय म्हणणार, असे बावनकुळे म्हणाले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना याहून भयंकर प्रकार झाले होते. सर्व पक्षांनी त्यावेळी सहकार्य केले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये नवनवीन जबाबदाऱ्या मिळाल्याने ते उत्साहात आहे. मात्र त्यांनी सरकारच्या आवाहनाचा मान राखला पाहिजे, असे त्यांनी आवाहन केले.

विरोधी बाकांवर आल्यावर राष्ट्रवादीला मुस्लिम, ओबीसी दिसतातकॉंग्रेस-राष्ट्रवादी सत्तेबाहेर गेल्यावर ते समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. शरद पवार, बंटी पाटील यांचे वक्तव्य आले आणि संभाजीनगर, कोल्हापुरात तणाव निर्माण झाला. सत्तेत असताना कॉंग्रेस-राष्ट्रवादीला केवळ व्यापारी व उद्योगपती दिसतात. मात्र विरोधी पक्षात गेल्यावर मात्र मुस्लिम, ओबीसी, मागासवर्गीय समाजाची आठवण येते व समाजात कलह निर्माण करण्याचा प्रयत्न होतो, असा आरोप बावनकुळे यांनी लावला.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे