शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
2
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
3
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
4
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
5
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
6
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
7
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
8
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
9
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
10
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
11
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
12
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
13
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
14
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
15
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
16
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
17
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
18
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
19
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
20
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
Daily Top 2Weekly Top 5

मानोरा ग्रा.पं.च्या सरपंचाविरोधात अविश्वास ठराव पारित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:23 IST

भिवापूर : तालुक्यातील मानोरा ग्रामपंचायतीच्या सरपंचा नूतन वसंता काळे यांच्या विरुद्ध ग्रामपंचायत सदस्यांनी आणलेला अविश्वास ठराव मंग‌ळवारी (दि. ५) ...

भिवापूर : तालुक्यातील मानोरा ग्रामपंचायतीच्या सरपंचा नूतन वसंता काळे यांच्या विरुद्ध ग्रामपंचायत सदस्यांनी आणलेला अविश्वास ठराव मंग‌ळवारी (दि. ५) पारित झाला आहे. यासंदर्भात नायब तहसीलदार दिनेश पवार यांच्या उपस्थितीत आयोजित विशेष सभेत सातही सदस्यांनी एकत्र येत सरपंच नुूतन काळे यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव पारित केला.

सप्टेंबर २०१८ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत नूतन वसंता काळे या थेट जनतेतून सरपंच म्हणून निवडून आल्या. मात्र सदस्यांना विश्वासात न घेता कामे होत असल्यामुळे सुरुवातीपासूनच मानोरा ग्रामपंचायतीचा कारभार वादग्रस्त राहिला. त्यामुळे गत ३० डिसेंबर रोजी सात सदस्य संख्या असलेल्या मानोरा‌ ग्रामपंचायतीच्या सातही सदस्यांनी एकत्र येत सरपंच नूतन काळेविरुद्ध अविश्वास ठराव घेतला. यात नियोजित वेळेत काम न करणे, सदस्यांना विश्वासात न घेता परस्पर काम करणे, ग्रामपंचायतस्तरावर विषय समिती तयार न करणे, ग्रामपंचायत सदस्यांना अपमानास्पद बोलणे व त्यांच्याशी गैरवर्तणूक करणे आदी आरोप करण्यात आले. उपसरपंच मिथून माटे, सदस्य करण लुटे, प्रमोद गोमकर, मनोरमा वासनिक, सुनंदा गजभिये, छाया मलवंडे, नीता गोमकर यांनी या अविश्वास ठरावावर स्वाक्षरी केली होती. गत ३० डिसेंबर रोजी सदर अविश्वासाची प्रत नायब तहसीलदार दिनेश पवार यांना देण्यात आली. त्या आधारावर तहसील कार्यालयाने मंगळवारी मानोरा ग्रामपंचायतमध्ये अविश्वासाबाबत विशेष सभेचे आयोजन केले होते. नायब तहसीलदार दिनेश पवार यांच्या उपस्थितीत आयोजित या सभेत सातही सदस्यांनी नूतन काळे यांच्या विरोधात अविश्वास आणला. शांतता कायम राहण्यासाठी यावेळी पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चंगोले यांच्यासह पोलीस कर्मचारीसुद्धा उपस्थित होते.

ग्रामसभा ठरविणार सरपंचाचे भविष्य?

यापूर्वी सदस्यातून सरपंचाची निवड होत असल्यामुळे विविध कारणास्तव सदस्यांना सरपंचावर अविश्वास आणून थेट पायउतार करता यायचे. मात्र राज्यात भाजप-सेनेचे सरकार येताच जनतेतून सरपंच निवडण्याची पद्धत अवलंबिल्या गेली.‌‌ त्यानुसार मानोरा ग्रामपंचायतच्या सरपंच नूतन काळे या थेट जनतेतून सरपंचपदी निवडून आल्या आहेत. त्यामुळे त्या सदस्यांच्या अविश्वासाने थेट पायउतार होणार नाही तर, या अविश्वासाच्या आधारावर आता विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात येईल. त्यात ग्रामस्थांचे मतदान होईल. एकप्रकारे येथे पदारूढ सरपंचाविरुद्ध ग्रामसभेच्या माध्यमातून ‌मिनी निवडणूक होईल. जनतेचा कौल ज्या बाजूने असेल तसा निकाल हाती येईल. आता मात्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून थेट जनतेतून सरपंच निवडण्याची पद्धत बंद झाली आहे.