शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

मानोरा ग्रा.पं.च्या सरपंचाविरोधात अविश्वास ठराव पारित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:23 IST

भिवापूर : तालुक्यातील मानोरा ग्रामपंचायतीच्या सरपंचा नूतन वसंता काळे यांच्या विरुद्ध ग्रामपंचायत सदस्यांनी आणलेला अविश्वास ठराव मंग‌ळवारी (दि. ५) ...

भिवापूर : तालुक्यातील मानोरा ग्रामपंचायतीच्या सरपंचा नूतन वसंता काळे यांच्या विरुद्ध ग्रामपंचायत सदस्यांनी आणलेला अविश्वास ठराव मंग‌ळवारी (दि. ५) पारित झाला आहे. यासंदर्भात नायब तहसीलदार दिनेश पवार यांच्या उपस्थितीत आयोजित विशेष सभेत सातही सदस्यांनी एकत्र येत सरपंच नुूतन काळे यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव पारित केला.

सप्टेंबर २०१८ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत नूतन वसंता काळे या थेट जनतेतून सरपंच म्हणून निवडून आल्या. मात्र सदस्यांना विश्वासात न घेता कामे होत असल्यामुळे सुरुवातीपासूनच मानोरा ग्रामपंचायतीचा कारभार वादग्रस्त राहिला. त्यामुळे गत ३० डिसेंबर रोजी सात सदस्य संख्या असलेल्या मानोरा‌ ग्रामपंचायतीच्या सातही सदस्यांनी एकत्र येत सरपंच नूतन काळेविरुद्ध अविश्वास ठराव घेतला. यात नियोजित वेळेत काम न करणे, सदस्यांना विश्वासात न घेता परस्पर काम करणे, ग्रामपंचायतस्तरावर विषय समिती तयार न करणे, ग्रामपंचायत सदस्यांना अपमानास्पद बोलणे व त्यांच्याशी गैरवर्तणूक करणे आदी आरोप करण्यात आले. उपसरपंच मिथून माटे, सदस्य करण लुटे, प्रमोद गोमकर, मनोरमा वासनिक, सुनंदा गजभिये, छाया मलवंडे, नीता गोमकर यांनी या अविश्वास ठरावावर स्वाक्षरी केली होती. गत ३० डिसेंबर रोजी सदर अविश्वासाची प्रत नायब तहसीलदार दिनेश पवार यांना देण्यात आली. त्या आधारावर तहसील कार्यालयाने मंगळवारी मानोरा ग्रामपंचायतमध्ये अविश्वासाबाबत विशेष सभेचे आयोजन केले होते. नायब तहसीलदार दिनेश पवार यांच्या उपस्थितीत आयोजित या सभेत सातही सदस्यांनी नूतन काळे यांच्या विरोधात अविश्वास आणला. शांतता कायम राहण्यासाठी यावेळी पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चंगोले यांच्यासह पोलीस कर्मचारीसुद्धा उपस्थित होते.

ग्रामसभा ठरविणार सरपंचाचे भविष्य?

यापूर्वी सदस्यातून सरपंचाची निवड होत असल्यामुळे विविध कारणास्तव सदस्यांना सरपंचावर अविश्वास आणून थेट पायउतार करता यायचे. मात्र राज्यात भाजप-सेनेचे सरकार येताच जनतेतून सरपंच निवडण्याची पद्धत अवलंबिल्या गेली.‌‌ त्यानुसार मानोरा ग्रामपंचायतच्या सरपंच नूतन काळे या थेट जनतेतून सरपंचपदी निवडून आल्या आहेत. त्यामुळे त्या सदस्यांच्या अविश्वासाने थेट पायउतार होणार नाही तर, या अविश्वासाच्या आधारावर आता विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात येईल. त्यात ग्रामस्थांचे मतदान होईल. एकप्रकारे येथे पदारूढ सरपंचाविरुद्ध ग्रामसभेच्या माध्यमातून ‌मिनी निवडणूक होईल. जनतेचा कौल ज्या बाजूने असेल तसा निकाल हाती येईल. आता मात्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून थेट जनतेतून सरपंच निवडण्याची पद्धत बंद झाली आहे.