शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मनपा विरोधी पक्षनेत्यांची पत्रे प्रशासनाकडून बेदखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 23:14 IST

महापालिकेत महापौर,स्थायी समिती अध्यक्ष, सत्तापक्षनेता व विरोधीपक्ष नेता अशी संवैधानिक पदे आहेत. महापालिके च्या कारभारावर अंकूश ठेवण्यात या सर्वांची भूमिका महत्त्वाची असते. संसद असो वा विधिमंडळात विरोधी पक्षनेत्यांना महत्त्वाचे स्थान असते. त्याच धर्तीवर महापालिकेतही विरोधी पक्षनेत्यांना महत्त्वाचे स्थान आहे. मात्र विरोधी पक्षनेत्यांनी पाठविलेल्या पत्रांची प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. एवढेच नव्हे तर विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयाने मागितलेली माहिती पाठविली जात नाही.

ठळक मुद्देसभागृहात जाब विचारणार : जनहिताच्या प्रश्नाबाबत प्रशासन उदासीन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेत महापौर,स्थायी समिती अध्यक्ष, सत्तापक्षनेता व विरोधीपक्ष नेता अशी संवैधानिक पदे आहेत. महापालिके च्या कारभारावर अंकूश ठेवण्यात या सर्वांची भूमिका महत्त्वाची असते. संसद असो वा विधिमंडळात विरोधी पक्षनेत्यांना महत्त्वाचे स्थान असते. त्याच धर्तीवर महापालिकेतही विरोधी पक्षनेत्यांना महत्त्वाचे स्थान आहे. मात्र विरोधी पक्षनेत्यांनी पाठविलेल्या पत्रांची प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. एवढेच नव्हे तर विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयाने मागितलेली माहिती पाठविली जात नाही.गेल्या महिन्यात सत्तापक्षाच्या सूचनेनुसार महापालिका प्रशासनाने एक कोर कमिटी गठित केली होती. यात सत्तापक्षातील पदाधिकारी व अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला. मात्र विरोधी पक्षनेत्यांचा प्रशासनाला विसर पडला. यावर विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी पत्र लिहून प्रशासनाकडे नाराजी व्यक्त केली होती.विरोधी पक्षातील नगरसेवकांच्या प्रभागातील विकास कामे मार्गी लागावी, यासाठी विरोधी पक्षातील नगरसेवक विरोधी पक्षनेत्यांकडे तक्रारी करतात. त्यानुसार त्यांच्या कार्यालयाकडून प्रशासनाला पत्र पाठवून विचारणा केली जाते. मात्र अनेक विभागांना दोन ते तीनदा पत्र पाठवूनही प्रशासनाकडून माहिती दिली जात नाही. अनेकदा औपचारिकता म्हणून अर्धवट माहिती उपलब्ध करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातो.वनवे यांनी प्रवर्तन विभागाकडे शहरातील जीर्ण इमारती व पाडण्यात आलेल्या जीर्ण इमारतीची माहिती विरोधी पक्षनेते यांच्या कार्यालयाने मागितली होती. मात्र विभागाने फक्त २०१७-१८ या वर्षात पाडण्यात आलेल्या जीर्ण इमारतींची माहिती दिली. वास्तविक शहरातील जीर्ण इमारतीमुळे नागरिकांच्या जीविताला धोका असल्याने शहरात किती जीर्ण इमारती आहेत, याची माहिती विचारून शिल्लक असलेल्या जीर्ण इमारती पाडण्यासंदर्भात प्रशासनाने कोणते नियोजन केले आहे, याची विचारणा विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयाकडून केली जाणार होती.अग्निशमन विभागाला पत्र लिहून वनवे यांनी सन् २०१६ सालापासून आजवर किती इमारतींना अस्थायी व स्थायी स्वरूपाचे प्रमाणपत्र दिले याची माहिती मागितली होती. मात्र विभागाने १९८९ सालापासून आॅगस्ट २०१८ पर्यंतची आकडेवारी दिली. अशीच स्थिती महापालिकेच्या इतर विभागांना पाठविलेल्या पत्राबाबत आहे. विरोधी पक्षनेत्यांच्या पत्राला उत्तर न देणाºया अधिकाºयांवर कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.अग्निशमन विभागाला पत्र लिहून वनवे यांनी सन २०१६ सालापासून आजवर किती इमारतींना अस्थायी व स्थायी स्वरुपाचे प्रमाणपत्र दिले याची माहिती मागितली होती. मात्र विभागाने १९८९ सालापासून आॅगस्ट २०१८ पर्यंतची फक्त आकडेवारी दिली. अशीच स्थिती महापालिकेच्या इतर विभागांना पाठविलेल्या पत्राबाबत आहे. विरोधी पक्षनेत्यांच्या पत्राला उत्तर न देणाºया अधिकाºयांवर कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे.स्मरणपत्र पाठविणारशहरातील नागरिकांच्या समस्या मार्गी लागाव्या यासाठी विविध विभागाला पत्रे द्यावी लागतात. परंतु माहिती देण्यास टाळाटाळ करण्याचा प्रकार सुरू आहे. यासंदर्भात स्मरणपत्र पाठविणार आहे. त्यानंतरही प्रशसानाने दखल न घेतल्यास सभागृहात संबंधितांना जाब विचारला जाईल.तानाजी वनवे, विरोधी पक्षनेते महापालिका

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाTanaji Vanweतानाजी वनवे