शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

‘बिल नाही तर वीज नाही’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 23:48 IST

‘महावितरण’च्या नागपूर परिक्षेत्रातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांकडून थकबाकी वसूल करण्यासाठी ‘शून्य थकबाकी’ मोहीम मंगळवारी २१ नोव्हेंबरपासून सर्वत्र मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात येत आहे.

ठळक मुद्देमहावितरणकडून थकबाकीदारांची ‘वीजतोड’ मोहीमनागपूर परिक्षेत्रात २०९ कोटी ६५ लाख रुपयांची थकबाकी

आॅनलाईन लोकमतनागपूर : ‘महावितरण’च्या नागपूर परिक्षेत्रातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांकडून थकबाकी वसूल करण्यासाठी ‘शून्य थकबाकी’ मोहीम मंगळवारी २१ नोव्हेंबरपासून सर्वत्र मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याने ग्राहकांनी त्यांच्याकडील थकीत वीजबिलाचा लगेच भरणा करून कारवाई टाळावी, असे महावितरणने म्हटले आहे.महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रातील नागपूर, अकोला, अमरावती, चंद्रपूर आणि गोंदिया या पाचही परिमंडळातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांकडे तब्बल २०९ कोटी ६५ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्याच्या वसुलीसाठी महावितरणने जोरदार तयारी सुरू केली आहे. ‘बिल नाही तर वीज नाही’ हा संदेश देत थकबाकीदारांवर कारवाई करण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्याची पथके निर्माण करून वसुली मोहीम राबविली जाणार आहे. ज्यांनी वीज बिल भरलेले नाही, त्यांचे कनेक्शन तोडण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहे.सप्टेंबर २०१७ अखेरीस महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रांतर्गत ३९ लाखांहून अधिक घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहक असून त्यांच्याकडील जिल्हावार थकबाकी - अकोला (३२.३७ कोटी), बुलडाणा (२९.०६ कोटी), वाशिम (२१.५१ कोटी), अमरावती (३२.४७ कोटी), यवतमाळ (२७.६६ कोटी), चंद्रपूर (१०.९६ कोटी), गडचिरोली (५.९४ कोटी), भंडारा (६.४३ कोटी), गोंदिया (१२.९९ कोटी), नागपूर (२७.३९ कोटी) तर वर्धा (९.४ कोटी) अशी एकूण २०९ कोटी ६५ लाख रुपयांवर थकबाकी असून, ग्राहकांनी त्यांच्याकडील थकबाकी त्वरित भरून वीजपुरवठा खंडित होण्याची कारवाई टाळावी.थकीत वीज बिल भरण्यासाठी स्थानिक वीज बिल भरणा केंद्रांसह घरबसल्या ‘आॅनलाईन’ पेमेंटसाठी ‘महावितरण’च्या  वेबसाईट तसेच मोबाईल अ‍ॅपचा पर्याय उपलब्ध आहे.१९,५४४ थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडितमागील आठवड्यात महावितरणने थकबाकीदारांविरोधात राबविलेल्या मोहिमेत थकीत वीज बिलांचा भरणा न करणाऱ्या नागपूर परिक्षेत्रातील १९ हजार ५४४ ग्राहकांचा वीजपुरवठा ८ कोटी ९१ लाखांच्या थकबाकीपोटी खंडित केला होता. यात नागपूर परिमंडळ - ५ हजार ८४६ (१ कोटी ७२ लाख), अकोला परिमंडळ- ४ हजार ९८५ (३ कोटी), अमरावती परिमंडळ - ५ हजार ६२१ (३ कोटी १३ लाख), चंद्रपूर परिमंडळ - १ हजार ५९३ ( ६३ लाख) तर गोंदिया परिमंडळात १ हजार ४३३ ग्राहकांचा (५४ लाख) वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.

टॅग्स :civic issueनागरी समस्या