शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

‘बिल नाही तर वीज नाही’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 23:48 IST

‘महावितरण’च्या नागपूर परिक्षेत्रातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांकडून थकबाकी वसूल करण्यासाठी ‘शून्य थकबाकी’ मोहीम मंगळवारी २१ नोव्हेंबरपासून सर्वत्र मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात येत आहे.

ठळक मुद्देमहावितरणकडून थकबाकीदारांची ‘वीजतोड’ मोहीमनागपूर परिक्षेत्रात २०९ कोटी ६५ लाख रुपयांची थकबाकी

आॅनलाईन लोकमतनागपूर : ‘महावितरण’च्या नागपूर परिक्षेत्रातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांकडून थकबाकी वसूल करण्यासाठी ‘शून्य थकबाकी’ मोहीम मंगळवारी २१ नोव्हेंबरपासून सर्वत्र मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याने ग्राहकांनी त्यांच्याकडील थकीत वीजबिलाचा लगेच भरणा करून कारवाई टाळावी, असे महावितरणने म्हटले आहे.महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रातील नागपूर, अकोला, अमरावती, चंद्रपूर आणि गोंदिया या पाचही परिमंडळातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांकडे तब्बल २०९ कोटी ६५ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्याच्या वसुलीसाठी महावितरणने जोरदार तयारी सुरू केली आहे. ‘बिल नाही तर वीज नाही’ हा संदेश देत थकबाकीदारांवर कारवाई करण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्याची पथके निर्माण करून वसुली मोहीम राबविली जाणार आहे. ज्यांनी वीज बिल भरलेले नाही, त्यांचे कनेक्शन तोडण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहे.सप्टेंबर २०१७ अखेरीस महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रांतर्गत ३९ लाखांहून अधिक घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहक असून त्यांच्याकडील जिल्हावार थकबाकी - अकोला (३२.३७ कोटी), बुलडाणा (२९.०६ कोटी), वाशिम (२१.५१ कोटी), अमरावती (३२.४७ कोटी), यवतमाळ (२७.६६ कोटी), चंद्रपूर (१०.९६ कोटी), गडचिरोली (५.९४ कोटी), भंडारा (६.४३ कोटी), गोंदिया (१२.९९ कोटी), नागपूर (२७.३९ कोटी) तर वर्धा (९.४ कोटी) अशी एकूण २०९ कोटी ६५ लाख रुपयांवर थकबाकी असून, ग्राहकांनी त्यांच्याकडील थकबाकी त्वरित भरून वीजपुरवठा खंडित होण्याची कारवाई टाळावी.थकीत वीज बिल भरण्यासाठी स्थानिक वीज बिल भरणा केंद्रांसह घरबसल्या ‘आॅनलाईन’ पेमेंटसाठी ‘महावितरण’च्या  वेबसाईट तसेच मोबाईल अ‍ॅपचा पर्याय उपलब्ध आहे.१९,५४४ थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडितमागील आठवड्यात महावितरणने थकबाकीदारांविरोधात राबविलेल्या मोहिमेत थकीत वीज बिलांचा भरणा न करणाऱ्या नागपूर परिक्षेत्रातील १९ हजार ५४४ ग्राहकांचा वीजपुरवठा ८ कोटी ९१ लाखांच्या थकबाकीपोटी खंडित केला होता. यात नागपूर परिमंडळ - ५ हजार ८४६ (१ कोटी ७२ लाख), अकोला परिमंडळ- ४ हजार ९८५ (३ कोटी), अमरावती परिमंडळ - ५ हजार ६२१ (३ कोटी १३ लाख), चंद्रपूर परिमंडळ - १ हजार ५९३ ( ६३ लाख) तर गोंदिया परिमंडळात १ हजार ४३३ ग्राहकांचा (५४ लाख) वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.

टॅग्स :civic issueनागरी समस्या