शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

अनेक रुग्णालयांचा २४ तास पोस्टमार्टेमला ‘ना’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 23:16 IST

२४ तास शवविच्छेदनगृह सुरू ठेवण्याचा निर्णय सहा वर्षांपूर्वी वैद्यकीय शिक्षण विभागाने घेतला. परंतु अपुरे मनुष्यबळ आणि तांत्रिक कारणे देत आजही राज्यातील काही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सायंकाळचे ७ वाजताच शवविच्छेदन होत नाही.

ठळक मुद्देरात्री ७ वाजताच शवविच्छेदनाची दारे होतात बंद

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : सूर्योदय ते सूर्यास्त या कालावधीतच मृताच्या पार्थिवाचे ‘पोस्टमार्टेम’ (शवविच्छेदन) करण्याचा ब्रिटिशकालीन कायदा बदलून २४ तास शवविच्छेदनगृह सुरू ठेवण्याचा निर्णय सहा वर्षांपूर्वी वैद्यकीय शिक्षण विभागाने घेतला. परंतु अपुरे मनुष्यबळ आणि तांत्रिक कारणे देत आजही राज्यातील काही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सायंकाळचे ७ वाजताच शवविच्छेदन होत नाही. याला एखादे प्रकरण अपवाद राहू शकते. परंतु रात्री येणारे मृतदेह हे शीतपेटीत ठेवले जात असून दुसऱ्या दिवशीच शवविच्छेदन केले जात आहे.पूर्वी पुरेशा सोईसुविधा उपलब्ध नव्हत्या. अपुऱ्या उजेडात शवविच्छेदनाच्या नियमांचे काटेकोर पालन होणे अशक्य होते. या जुन्या कायद्यामुळे आधीच दु:खात बुडालेल्या मृतांच्या नातेवाईक व आप्तस्वकीयांना या कायद्यामुळे त्रास व्हायचा. तो कमी व्हावा या उद्देशाने तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विधिमंडळात खुनाचे, हुंडाबळी व इतर काही महत्त्वाची प्रकरणे वगळता इतर प्रकरणांमध्ये चौविसही तास शवविच्छेदनगृह सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. या संदर्भातील सूचना सर्वच शासकीय रुग्णालयांना देण्यात आल्या. सुरुवातीला काही रुग्णालयांनी पुढाकारही घेतला. परंतु मंत्री बदलताच मनुष्यबळ, आवश्यक सोई व तांत्रिकदृष्ट्या रात्री शवविच्छेदन करणे शक्य नसल्याची कारणे देत काही रुग्णालयांनी सायंकाळी ७ वाजतानंतर शवविच्छेदन करणेच बंद केले. विशेषत: विदर्भातील शासकीय रुग्णालयांमध्ये हा प्रकार होत आहे.यासंदर्भात काही न्यायवैद्यकशास्त्र तज्ज्ञाने नाव न लिहिण्याच्या अटीवर सांगितले, तांत्रिकदृष्ट्या दिवसाच्या लख्ख प्रकाशातच शवविच्छेदन करण्याचा नियम आहे. कारण, शवविच्छेदन करताना अनेक छोट्या-छोट्याबाबींचे निरीक्षण केले जाते. यासाठी भरपूर प्रकाशाची आवश्यकता असते. रात्रीच्यावेळी कितीही मोठा व्हॅटचा दिवा लावल्यास अनेक अडचणी येण्याची शक्यता असते. फारच गरज असल्यास विशेषत: कायदा व सुव्यवस्थेच्यावेळी व पोलिसांच्या मागणीला घेऊन रात्री शवविच्छेदन केले जाते. शिवाय, दिवसाच्या तुलनेत रात्रीच्यावेळी फार कमी मृतदेह शवविच्छेदनासाठी येतात. जे रात्री येतात तेच सकाळीच ‘पोस्टमॉर्टेम’ करून देण्याचा आग्रह करतात. महत्त्वाचे म्हणजे, चौविस तास शवविच्छेदनगृह सुरू ठेवण्यासाठी एका पाळीमध्ये एक डॉक्टर दोन अटेंडन्स आणि एक तंत्रज्ञ अशा चार लोकांची टीम हवी असते. परंतु काही रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची संख्या फार कमी आहे. ही समस्या निवासी डॉक्टरांना हाताशी धरून सोडविता येत असली तरी अटेंडन्स आणि तंत्रज्ञामुळे अडचण येत असल्याचे या डॉक्टरांनी सांगितले.

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय