शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
3
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
4
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
5
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
6
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
7
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
8
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
9
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
10
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
11
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला
12
२.९५ लाखांपर्यंतचा बंपर डिस्काउंट, Mahindra च्या 'या' ५ गाड्यांवर जबरदस्त ऑफर्स
13
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
14
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
15
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाला मोदक आवडतात; पण उकडीचे की तळणीचे? पद्म पुराणात सापडते उत्तर!
16
Vinod Kambli: बोलायला त्रास होतोय, चालताही येईना; विनोद कांबळींच्या प्रकृतीबद्दल चिंताजनक माहिती
17
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
18
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
19
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
20
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार

‘एनएमआरडीए’चे गावांना जोडणाऱ्या रस्त्यांकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 10:35 IST

नागपूर महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (एनएमआरडीए) अस्तित्वात येऊन दोन वर्ष झाले, परंतु नागपूर शहरापासून जवळच असलेल्या व मेट्रो रिजनमध्ये येणाऱ्या अनेक गावांना ये-जा करण्यासाठी पक्के रस्ते मिळू शकलेले नाहीत.

ठळक मुद्देअपघाताचा धोका वाढला वळणाच्या रस्त्यामुळे रुही, वरोडातील गावकरी त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (एनएमआरडीए) अस्तित्वात येऊन दोन वर्ष झाले, परंतु नागपूर शहरापासून जवळच असलेल्या व मेट्रो रिजनमध्ये येणाऱ्या अनेक गावांना ये-जा करण्यासाठी पक्के रस्ते मिळू शकलेले नाहीत. वर्धा मार्गावरील मौजा रुही, शंकरपूर, वरोडा येथील गावकरी ग्रामस्थांना रस्ता नसल्याने महामार्गाच्या विरुद्ध दिशेने वाहने चालवत ये-जा करावी लागते. यामुळे कोणत्याही क्षणी अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे.एनएमआरडीएची स्थापना ४ मार्च २०१७ ला झाली. या यंत्रणेच्या कार्यक्षेत्रात जिल्ह्यातील साडेतीन हजार चौरस मीटर परिसरातील ७१९ गावांचा समावेश करण्यात आला. या भागाच्या नियोजनबद्ध विकासाची जबाबदारी आता विकास प्राधिकरण म्हणून एनएमआरडीएची आहे. परंतु दोन वर्षांपासून गावांना मुख्य मार्गावर येण्यासाठी रस्ते उपलब्ध नाहीत. वर्धा मार्गावरील मौजा जामठा, गौसी, पांजरी, रुही, शंकरपूर, वरोडा भागात मोठ्या प्रमाणात खासगी गृहनिर्माण योजना, अभिन्यास विक्री सुरू आहे. या भागातून आऊटर रिंग रोड देखील विकसित केला आहे. परंतु या भागातील ही जुनी गावे अजूनही राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ (नागपूर ते हैदराबाद)वर येण्यासाठी कच्च्या रस्त्यांचा आणि धोका पत्करून उलट दिशेने वाहने चालवत आहेत. विशेषत: रुही या गवातील नागरिक आऊट रिंग रोडवरील टोल नाक्यापासून ‘यू टर्न’ घेऊन विरुद्ध दिशेने वर्धा मार्गावर येतात. या मार्गावर जड वाहनांची वर्दळ असल्याने अनेकदा अपघात घडतात. नवीन वसाहती पूर्ण झाल्यानंतर या भागातील वर्दळ वाढणार असल्याने परिस्थिती गंभीर होणार आहे.वास्तविक मेट्रो रिजनच्या विकास आराखड्यानुसार मौजा जामठा येथील छोट्या पुलापासून १८ मीटरचा पांदण रस्ता प्रस्तावित आहे. परंतु या रस्त्यांच्यामध्ये सहारा ग्रुपने संरक्षक भिंत टाकून पांदण रस्ता अडवला आहे. त्यामुळे रुहीच्या गावकऱ्यांना दीड ते दोन कि.मी. वळण घेऊन ये-जा करावी लागत आहे. जबलपूरकडे जाणाºया आऊटर रिंग रोडला दोन्ही बाजूने सर्व्हिस रोड देण्यात आलेला नाही. त्यामुळे या भागातील लोकांना विरुद्ध दिशेने जावे लागत आहे. सध्या या भागातील टोल नाक्यापासून ‘यू टर्न’ घेत आहेत. येथून जवळच असलेल्या आश्रम ढाब्याच्या दोन्ही बाजूला विकास आराखड्यानुसार १८ मीटरचा रस्ता दाखवण्यात आला आहे, परंतु एनएमआरडीचे पांदण रस्ते विकासाकडे दुर्लक्ष झाले आहे. या भागात गृहनिर्माण प्रकल्प धारकांनी एनएमआरडीएकडे विकास शुल्क भरले आहेत. त्यांनाही जोड रस्ता मिळत नसल्याने त्यांनाही विरुद्ध दिशेने जाण्याशिवाय पर्याय नाही.प्रस्तावित रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्याची मागणीमौजा जामठाच्या (खसरा क्रमांक १३/१) बाजूला पांदण रस्ता प्रस्तावित आहे. तो गौसी व पांजरीपर्यंत प्रस्तावित आहे. हा रस्ता १८ मीटर असून तो पूर्ण झाल्यास येथील नागरिकांचा प्रश्न सुटू शकतो. परंतु प्रस्तावित रस्त्यावर सहारा ग्रुपने संरक्षक भिंत उभारली आहे. ही भिंत हटवण्याची मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक