शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

‘एनएमआरडीए’चे गावांना जोडणाऱ्या रस्त्यांकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 10:35 IST

नागपूर महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (एनएमआरडीए) अस्तित्वात येऊन दोन वर्ष झाले, परंतु नागपूर शहरापासून जवळच असलेल्या व मेट्रो रिजनमध्ये येणाऱ्या अनेक गावांना ये-जा करण्यासाठी पक्के रस्ते मिळू शकलेले नाहीत.

ठळक मुद्देअपघाताचा धोका वाढला वळणाच्या रस्त्यामुळे रुही, वरोडातील गावकरी त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (एनएमआरडीए) अस्तित्वात येऊन दोन वर्ष झाले, परंतु नागपूर शहरापासून जवळच असलेल्या व मेट्रो रिजनमध्ये येणाऱ्या अनेक गावांना ये-जा करण्यासाठी पक्के रस्ते मिळू शकलेले नाहीत. वर्धा मार्गावरील मौजा रुही, शंकरपूर, वरोडा येथील गावकरी ग्रामस्थांना रस्ता नसल्याने महामार्गाच्या विरुद्ध दिशेने वाहने चालवत ये-जा करावी लागते. यामुळे कोणत्याही क्षणी अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे.एनएमआरडीएची स्थापना ४ मार्च २०१७ ला झाली. या यंत्रणेच्या कार्यक्षेत्रात जिल्ह्यातील साडेतीन हजार चौरस मीटर परिसरातील ७१९ गावांचा समावेश करण्यात आला. या भागाच्या नियोजनबद्ध विकासाची जबाबदारी आता विकास प्राधिकरण म्हणून एनएमआरडीएची आहे. परंतु दोन वर्षांपासून गावांना मुख्य मार्गावर येण्यासाठी रस्ते उपलब्ध नाहीत. वर्धा मार्गावरील मौजा जामठा, गौसी, पांजरी, रुही, शंकरपूर, वरोडा भागात मोठ्या प्रमाणात खासगी गृहनिर्माण योजना, अभिन्यास विक्री सुरू आहे. या भागातून आऊटर रिंग रोड देखील विकसित केला आहे. परंतु या भागातील ही जुनी गावे अजूनही राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ (नागपूर ते हैदराबाद)वर येण्यासाठी कच्च्या रस्त्यांचा आणि धोका पत्करून उलट दिशेने वाहने चालवत आहेत. विशेषत: रुही या गवातील नागरिक आऊट रिंग रोडवरील टोल नाक्यापासून ‘यू टर्न’ घेऊन विरुद्ध दिशेने वर्धा मार्गावर येतात. या मार्गावर जड वाहनांची वर्दळ असल्याने अनेकदा अपघात घडतात. नवीन वसाहती पूर्ण झाल्यानंतर या भागातील वर्दळ वाढणार असल्याने परिस्थिती गंभीर होणार आहे.वास्तविक मेट्रो रिजनच्या विकास आराखड्यानुसार मौजा जामठा येथील छोट्या पुलापासून १८ मीटरचा पांदण रस्ता प्रस्तावित आहे. परंतु या रस्त्यांच्यामध्ये सहारा ग्रुपने संरक्षक भिंत टाकून पांदण रस्ता अडवला आहे. त्यामुळे रुहीच्या गावकऱ्यांना दीड ते दोन कि.मी. वळण घेऊन ये-जा करावी लागत आहे. जबलपूरकडे जाणाºया आऊटर रिंग रोडला दोन्ही बाजूने सर्व्हिस रोड देण्यात आलेला नाही. त्यामुळे या भागातील लोकांना विरुद्ध दिशेने जावे लागत आहे. सध्या या भागातील टोल नाक्यापासून ‘यू टर्न’ घेत आहेत. येथून जवळच असलेल्या आश्रम ढाब्याच्या दोन्ही बाजूला विकास आराखड्यानुसार १८ मीटरचा रस्ता दाखवण्यात आला आहे, परंतु एनएमआरडीचे पांदण रस्ते विकासाकडे दुर्लक्ष झाले आहे. या भागात गृहनिर्माण प्रकल्प धारकांनी एनएमआरडीएकडे विकास शुल्क भरले आहेत. त्यांनाही जोड रस्ता मिळत नसल्याने त्यांनाही विरुद्ध दिशेने जाण्याशिवाय पर्याय नाही.प्रस्तावित रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्याची मागणीमौजा जामठाच्या (खसरा क्रमांक १३/१) बाजूला पांदण रस्ता प्रस्तावित आहे. तो गौसी व पांजरीपर्यंत प्रस्तावित आहे. हा रस्ता १८ मीटर असून तो पूर्ण झाल्यास येथील नागरिकांचा प्रश्न सुटू शकतो. परंतु प्रस्तावित रस्त्यावर सहारा ग्रुपने संरक्षक भिंत उभारली आहे. ही भिंत हटवण्याची मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक