शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

राजभवनच्या अतिक्रमणावर मनपाचा हातोडा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 01:09 IST

उशिरा का होईना महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाने राजभवनच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरलेल्या अतिक्रमणाचा सफाया करण्यास सुरुवात केली. बुधवारी विभागाच्या पथकाने राजभवनला लागून असलेले प्रसाधनगृह पाडले तसेच सुरक्षा भिंतीला लागून असलेल्या अस्थायी झोपड्याही काढण्यात आल्या.

ठळक मुद्देप्रभाव लोकमतचा : प्रसाधनगृह व अस्थायी झोपड्या काढल्या

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : उशिरा का होईना महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाने राजभवनच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरलेल्या अतिक्रमणाचा सफाया करण्यास सुरुवात केली. बुधवारी विभागाच्या पथकाने राजभवनला लागून असलेले प्रसाधनगृह पाडले तसेच सुरक्षा भिंतीला लागून असलेल्या अस्थायी झोपड्याही काढण्यात आल्या.विशेष म्हणजे लोकमतने राजभवनच्या सुरक्षेस बाधा पोहचविणाऱ्या अतिक्रमणाबाबत विस्तारीत वृत्त प्रकाशित केले होते. देशाचे   राष्ट्रपती, उप राष्ट्रपती, पंतप्रधान व इतर अतिविशेष व्यक्तींचे निवासस्थान असलेल्या राजभवनची सुरक्षा या अतिक्रमणामुळे धोक्यात आली होती. मनपाच्या सभागृहात तर ३० जून २००९ मध्येच यातील प्रसाधनगृह पाडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र कारवाईसाठी मनपाला तब्बल नऊ वर्षे लागली. लोकमतच्या वृत्तामुळे जाग आलेल्या महापालिकेने अखेर बुधवारी जेसीबीने प्रसाधनगृहाचे अतिक्रमण पाडले. यासाठी सुरक्षा भिंतीला लागून निर्माण केलेल्या १२ अस्थायी झोपड्यांचे अतिक्रमण काढण्यात आले. कारवाईदरम्यान परिसरात तणावाची परिस्थितीही असल्याने पोलिसांचे सहकार्य घेण्यात आले. प्रवर्तन विभागाचे सहायक आयुक्त अशोक पाटील व प्रवर्तन निरीक्षक संजय कांबळे यांच्या नेतृत्वात नितीन मंथनवार, जमशेद अली, संजय शिंगणे आदींचा कारवाई पथकात समावेश होता.ही तर २० टक्केच कारवाईअतिविशेष व्यक्तींच्या निवासस्थानाची सुरक्षा लक्षात घेता, विविध विभागांच्या कमिटीने सर्वेक्षणाच्या आधारे दिलेल्या सुरक्षा आॅडिटमध्ये धोकादायक ठरणाºया अनेक गोष्टी अधोरेखित केल्या होत्या. यात राजभवनच्या गेटजवळ सदर भागातील हनुमान मंदिराच्या पुजाºयाने केलेले अतिक्रमण, मुस्लीम लायब्ररीच्या मागील बांधकाम, मनपाचे बंद पडलेले नगरभूमापन कार्यालय तसेच सुरक्षा भिंतीला लागून असलेली पक्की घरे आदींचा उल्लेख धोकादायक अतिक्रमण म्हणून अहवालात केला होता. मनपाचे पथक मात्र प्रसाधनगृह आणि झोपड्या पाडून दोन तासात परत फिरले. ही केवळ २० टक्के कारवाई आहे. त्यामुळे ही सुरुवात म्हणावी की केवळ दाखविण्यासाठी ही कारवाई केली गेली, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणnagpurनागपूर