शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

मनपा अर्थसंकल्पाला मोठी कात्री लागणार! नवीन आयुक्त सादर करणार सुधारित अर्थसंकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 00:40 IST

अर्थसंकल्पातील प्रस्तावित अंदाजानुसार महापालिकेच्या तिजोरीत महसूल जमा होण्याची शक्यता नसल्याचे कारण देत आयुक्तांनी स्थायी समितीच्या बजेटला २५ टक्के कात्री लावली आहे.

ठळक मुद्देकरवसुली उद्दिष्ट अवघड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अर्थसंकल्पातील प्रस्तावित अंदाजानुसार महापालिकेच्या तिजोरीत महसूल जमा होण्याची शक्यता नसल्याचे कारण देत आयुक्तांनी स्थायी समितीच्या बजेटला २५ टक्के कात्री लावली आहे. परंतु अर्थसंकल्पात अपेक्षित ३१९७ कोटींच्या तुलनेत २२ जानेवारीपर्यंत महापालिकेच्या तिजोरीत १६६६ कोटींचाच महसूल जमा झाला आहे. पुढील ६६ दिवसात उर्वरित १५३१ कोटींचा महसूल जमा होण्याची शक्यता नाही. मार्च २०२० अखेरपर्यंत फार तर २१०० ते २२०० कोटीपर्यत हा आकडा जाण्याची शक्यता विचारात घेता नवीन आयुक्तांकडून २०१९-२० या वर्षाच्या सुधारित अर्थसंकल्पात मोठी कात्री लावली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.महापालिका आयुक्तपदी तुकाराम मुंढे रुजू होत आहेत. ते शुक्रवारी वा सोमवारी पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. शिस्तप्रिय व कर्तव्यनिष्ठ म्हणून ओळखले जाणारे मुुंढे महापालिकेचे वास्तव उत्पन्न विचारात घेऊ न सुधारित अर्थसंकल्प सादर करतील, अशी महापालिका वर्तुळात चर्चा आहे.मिळालेल्या माहितीनुसार स्थायी समितीने वित्त वर्षात ५०० कोटींच्या विकास कामांचे कार्यादेश, निविदा, प्रशासकीय मंजुरी दिलेली आहे. खर्चाला २५ टक्के कात्री लावल्याने १२५ कोटींची कामे प्रभावित होण्याची शक्यता आहे . त्यात पुन्हा कात्री वाढली तर स्थायी समितीने जी कामे मंजूर केली आहेत त्यावर परिणाम होईल. उल्लेखनीय म्हणजे फिक्स प्रायोरिटी, दुर्बल घटक व दिव्यांगांसाठी आरक्षित निधी वगळता अन्य बाबीतील निधीला कात्री लावण्यात आली आहे. ज्या शिर्षकात ७५ टक्के कामे मंजूर करण्यात आली आहे अशा शिर्षकात नवीन कामे घेता येणार नाही. ज्या शिर्षकात ७५ टक्केहून अधिक रकमेच्या कामांना मंजुरी देण्यात आलेली आहे अशा कामांना ब्रेक लावले आहे. स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी वर्ष २०१९-२० या वर्षाचा ३१९७.६० कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. परंतु मावळत्या वर्षाच्या अखेरच्या दिवशी आयुक्तांनी कपातीचे पत्र जारी केल्याने अर्थसंकल्पाला २५ टक्के कात्री लावली. वित्त वर्ष अखेरीस महापालिका तिजोरीत फार तर २२०० कोटींचा निधी जमा होईल,असा प्रशासनाचा अंदाज असल्यने कात्रीत वाढ होण्याची शक्यता आहे.वसुलीच्या दिवसात उत्पन्नात घटजानेवारी ते मार्च हे तीन महिने कर वसुलीचे असतात. आर्थिक वर्ष संपण्याला ६६ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. वसुलीच्या दृष्टीने या कालावधीत विशेष प्रयत्न होणे अपेक्षित आहे. डिसेंबर महिन्यात मालमत्ता करापासून ४५ कोटी आले होते. मात्र कर्मचारी नसल्याने व डिमांड वाटपाचा घोळ झाल्याने २३ जानेवारीपर्यंत २० कोटी जमा झाले. अखेरच्या तीन महिन्यात वसुली अपेक्षित असताना जानेवारीत कर वसुलीत झालेली घट हा शुभ संकेत नाही.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाBudgetअर्थसंकल्प