शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
4
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
5
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
6
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
7
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
8
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
9
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
10
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
11
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
12
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
13
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
14
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
15
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
16
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
17
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
18
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
19
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
20
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...

ब्राह्मणांविरुद्धच्या वक्तव्याने नितीन राऊत अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 00:48 IST

नागरिकत्व संशोधन कायद्यावरून ब्राह्मण समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांच्याविरोधात ब्राह्मण समाजामध्ये तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्देब्राह्मण सेनेची कारवाईची मागणी : राज्यपालांकडे केली तक्रार

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : नागरिकत्व संशोधन कायद्यावरून ब्राह्मण समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांच्याविरोधात ब्राह्मण समाजामध्ये तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे. राऊत यांनी एकतर समाजाची जाहीर माफी मागावी किंवा त्यांना मंत्रिपदावरून हटविण्यात यावे, अशी मागणी ब्राह्मण सेनेतर्फे शनिवारी पत्रपरिषदेत करण्यात आली.८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त फुले-शाहू-आंबेडकर विचार संवर्धन समितीच्यावतीने इंदोरा मैदानात झालेल्या नागरी सत्कार कार्यक्रमात राऊत यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. नागरिकत्व संशोधन कायदा करून नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी आम्हाला कागदपत्र मागितले जात आहेत. ‘जे स्वत: परदेशातून आले आहेत, ते बामन आम्हाला अक्कल शिकवतील काय,’ अशा शब्दात राऊत यांनी टीका केली होती. त्यांच्या भाषणाचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातील ब्राह्मण समाजाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. एकीकडे परशुराम सेवा संघ महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित देशपांडे यांनीही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे तक्रार केली आहे तर नागपुरात ब्राह्मण सेना फाऊंडेशनचे अध्यक्ष मनीष त्रिवेदी यांनी राऊत यांच्या वक्तव्याबाबत निषेध व्यक्त केला. ब्राह्मण समाजाच्या विविध संघटना आमच्यासोबत असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, संविधानिक पदावर विराजमान असलेल्या पालकमंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेताना कोणत्याही जातीधर्माचा अनादर करणार नाही, सर्व लोकांना समान वागणूक देईल, अशी शपथ घेतली आहे. अशावेळी या जबाबदार पदावर विराजमान असलेल्या व्यक्तिकडून एका समाजाबाबत द्वेष बाळगणे योग्य नाही. सीएए, एनआरसी लागू करणे हा सरकारचा निर्णय आहे, तो ब्राह्मण समाज किंवा कोणत्याही वर्गविशेषाचा निर्णय नाही. अशावेळी सरकारवर आक्षेप घेण्याऐवजी ब्राह्मण समाजाला दोष देणे कितपत योग्य आहे, असा सवाल त्रिवेदी यांनी उपस्थित केला. त्यांच्याविरोधात लवकरच पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात येईल. त्यांनी माफी मागितली नाही किंवा त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर ब्राह्मण संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा मनीष त्रिवेदी यांनी दिला. पत्रपरिषदेत ब्राह्मण महासंघाचे सचिव पं. त्रिलोकनाथ सिंधरा, फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष प्रतीक त्रिवेदी, विदर्भ अध्यक्ष ज्योती अरविंद अवस्थी, राजस्थानी गौड ब्राह्मण समितीचे विक्रम शर्मा आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nitin Rautनितीन राऊत