शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

ब्राह्मणांविरुद्धच्या वक्तव्याने नितीन राऊत अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 00:48 IST

नागरिकत्व संशोधन कायद्यावरून ब्राह्मण समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांच्याविरोधात ब्राह्मण समाजामध्ये तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्देब्राह्मण सेनेची कारवाईची मागणी : राज्यपालांकडे केली तक्रार

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : नागरिकत्व संशोधन कायद्यावरून ब्राह्मण समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांच्याविरोधात ब्राह्मण समाजामध्ये तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे. राऊत यांनी एकतर समाजाची जाहीर माफी मागावी किंवा त्यांना मंत्रिपदावरून हटविण्यात यावे, अशी मागणी ब्राह्मण सेनेतर्फे शनिवारी पत्रपरिषदेत करण्यात आली.८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त फुले-शाहू-आंबेडकर विचार संवर्धन समितीच्यावतीने इंदोरा मैदानात झालेल्या नागरी सत्कार कार्यक्रमात राऊत यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. नागरिकत्व संशोधन कायदा करून नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी आम्हाला कागदपत्र मागितले जात आहेत. ‘जे स्वत: परदेशातून आले आहेत, ते बामन आम्हाला अक्कल शिकवतील काय,’ अशा शब्दात राऊत यांनी टीका केली होती. त्यांच्या भाषणाचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातील ब्राह्मण समाजाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. एकीकडे परशुराम सेवा संघ महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित देशपांडे यांनीही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे तक्रार केली आहे तर नागपुरात ब्राह्मण सेना फाऊंडेशनचे अध्यक्ष मनीष त्रिवेदी यांनी राऊत यांच्या वक्तव्याबाबत निषेध व्यक्त केला. ब्राह्मण समाजाच्या विविध संघटना आमच्यासोबत असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, संविधानिक पदावर विराजमान असलेल्या पालकमंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेताना कोणत्याही जातीधर्माचा अनादर करणार नाही, सर्व लोकांना समान वागणूक देईल, अशी शपथ घेतली आहे. अशावेळी या जबाबदार पदावर विराजमान असलेल्या व्यक्तिकडून एका समाजाबाबत द्वेष बाळगणे योग्य नाही. सीएए, एनआरसी लागू करणे हा सरकारचा निर्णय आहे, तो ब्राह्मण समाज किंवा कोणत्याही वर्गविशेषाचा निर्णय नाही. अशावेळी सरकारवर आक्षेप घेण्याऐवजी ब्राह्मण समाजाला दोष देणे कितपत योग्य आहे, असा सवाल त्रिवेदी यांनी उपस्थित केला. त्यांच्याविरोधात लवकरच पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात येईल. त्यांनी माफी मागितली नाही किंवा त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर ब्राह्मण संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा मनीष त्रिवेदी यांनी दिला. पत्रपरिषदेत ब्राह्मण महासंघाचे सचिव पं. त्रिलोकनाथ सिंधरा, फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष प्रतीक त्रिवेदी, विदर्भ अध्यक्ष ज्योती अरविंद अवस्थी, राजस्थानी गौड ब्राह्मण समितीचे विक्रम शर्मा आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nitin Rautनितीन राऊत