शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

नीती आयोगाने समजून घेतली २४ बाय ७

By admin | Updated: April 17, 2017 02:49 IST

सीईओ अमिताभ कांत यांची गिट्टीखदानला भेट : नागरिकांशी साधला संवाद नागपूर : महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी २४ बाय ७ पाणीपुरवठा योजनेची माहिती जाणून घेण्यासाठी नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी

सीईओ अमिताभ कांत यांची गिट्टीखदानला भेट : नागरिकांशी साधला संवाद नागपूर : महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी २४ बाय ७ पाणीपुरवठा योजनेची माहिती जाणून घेण्यासाठी नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ)अमिताभ कांत यांनी रविवारी गिट्टीखदान परिसरातील दशरथनगरला भेट दिली. तसेच जलसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी थेट नागरिकांशी संवाद साधला. आयुक्त श्रावण हार्डीकर, नीती आयोगाचे सल्लागार आलोककुमार, ओसीडब्ल्यूचे प्रवर्तक अरुण लखानी यावेळी उपस्थित होते. दशरथनगर हा २५० ते ३०० घरांचा परिसर आहे. दोन वर्षांपूर्वी ३०-३५ घरांमागे एक सार्वजनिक नळ अशी येथील परिस्थिती होती. पाणीटंचाईमुळे लोकांची भांडणे व्हायची. तसेच दूषित पाण्याची समस्याही गंभीर होती. यामुळे नागरिक त्रस्त होते. परंतु २०१४ साली २४ बाय ७ योजनच्या माध्यमातून या भागात नवीन पाईप लाईन टाकण्यात आली. नळजोडण्या बदलण्यात आल्या. सन २०१५ मधे परिस्थिती बदलण्यास सुरुवात झाली. नागरिकांना २४ तास पाणी मिळू लागले. यामुळे येथील नागरिकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडून आला. अमिताभ कांत यांच्यासमोर नागरिकांनी बदललेल्या परिस्थितीची माहिती दिली. पाण्याची समस्या सुटल्याचे त्यांनी सांगितले. महापालिका ओसीडब्ल्यूच्या सहकार्याने झोपडपट्टी विकास प्रकल्प राबवित आहे. या वस्त्यात आरोग्यविषयक, शिक्षणासंबंधी, महिला सक्षमीकरण आणि उपजीविकेसंबंधी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती नागरिकांनी दिली. महापालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया आणि पुनर्वापर प्रकल्पाचीही माहिती देण्यात आली. अमिताभ कांत यांनी या दोन्ही योजनेपासून प्रभावित झाल्याचे टिष्ट्वट केले. दोन स्वतंत्र टिष्ट्वटमधून त्यांनी दोन्ही प्रकल्पाची प्रशंसा केली. नीती आयोगाच्या अधिकाऱ्यांनी थेट नागरिकांशी संवाद साधल्याने योजनेची व्यापकता वाढविण्यास मदत होईल, असा विश्वास श्रावण हार्डीकर यांनी व्यक्त केला. नीती आयोगाच्या सर्वोच्च अधिकाऱ्यांनी नागपूरच्या वस्त्यांमध्ये रणरणत्या उन्हात येणे यातून दिसून येणारी संवेदनशीलता आणि समावेशकता प्रशसंनीय असल्याचे मत अरुण लखानी यांनी व्यक्त केले.(प्रतिनिधी)