शहरं
Join us  
Trending Stories
1
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
2
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
3
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
4
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
5
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
6
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
7
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
8
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बंगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
9
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
10
चांदी झाली 'सोनेरी'! २ लाख रुपये किलोचा टप्पा पार, पण गुंतवणुकीपूर्वी 'हा' भयानक इतिहास वाचा
11
इम्रान खानचा काटा काढायला असीम मुनीरचा खतरनाक प्लॅन; देशद्रोहाचा खटला चालवला जाणार?
12
मनरेगाचं नाव बदलणार, मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता; जाणून घ्या, काय असणार नवं नाव?
13
John Cena Last Match: अवघ्या WWE चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू तरळणार...! जॉन सीना निवृत्त होतोय, रविवारी शेवटचा सामना....
14
HDFC Bank UPI Downtime: HDFC बँकेची UPI सेवा दोन दिवस ४ तासांसाठी राहणार बंद, पाहा कधी आणि कोणत्या वेळी राहणार बंद
15
T20 Cricket: टी-२० क्रिकेटमध्ये भारताने कोणत्या संघाविरुद्ध गमावले सर्वाधिक सामने? वाचा
16
'मंत्र्यावर बिबटे सोडा', उद्या पाकिस्तानातील लोक मंत्री म्हणून येतील', सुधीर मुनगंटीवारांचा विधानसभेत पारा चढला!
17
"फेमस व्हायचंय..."; एडल्ट स्टार होण्याचं भलतंच वेड, व्हायरल केला पत्नीसोबतचा खासगी व्हिडीओ
18
Travel : मनालीपासून २० किलोमीटरवर आहे स्वर्गासारखे सुंदर दिसणारे 'हे' ठिकाण! हिमवृष्टी बघून प्रेमात पडाल
19
“कुणबी प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, GR काढून ३ महिने झाले, पण…”; मनोज जरांगे सरकारवर नाराज
20
SMAT 2025 : टीम इंडियातून बाहेर काढलं त्यानं हॅटट्रिकसह पुण्याचं मैदान गाजवलं, पण... (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात फूटपाथवर व्यवसाय करणाऱ्या ९० टक्के महिला ‘सॅनिटरी नॅपकिन्स’पासून दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 12:44 IST

रस्त्याच्या कडेला विविध वस्तूंची विक्री करून उदरनिर्वाह करणारी अनेक कुटुंबे नागपूरच्या फूटपाथवर दिसून येतात. मात्र या कुटुंबातील ९० टक्के महिला आजही ‘सॅनिटरी नॅपकिन्स’पासून दूरच असून अंधश्रद्धेपोटी त्या यांचा वापर टाळत आहेत.

ठळक मुद्देपांढऱ्या कापडाबाबत अंधश्रद्धेचा पगडा

मेघा तिवारी ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रस्त्याच्या कडेला विविध वस्तूंची विक्री करून उदरनिर्वाह करणारी अनेक कुटुंबे नागपूरच्या फूटपाथवर दिसून येतात. मात्र या कुटुंबातील महिलांच्या आरोग्याकडे समाज व प्रशासनाचे दुर्लक्षच होत असल्याचे चित्र आहे. येथील ९० टक्के महिला आजही ‘सॅनिटरी नॅपकिन्स’पासून दूरच असून अंधश्रद्धेपोटी त्या यांचा वापर टाळत आहेत. त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी फारसा पुढाकार नसल्याने नवीन पिढीदेखील याच मार्गाने जात असल्याचे वास्तव आहे.‘लोकमत’ने शहरातील महाराज बाग मार्ग, सीताबर्डी, शंकरनगर, रेल्वेस्थानक यासारख्या विविध भागात ‘फूटपाथ’वर राहणाऱ्या महिलांकडून मासिक पाळीदरम्यानच्या आव्हानांबाबत जाणून घेतले. अवघ्या १९ व्या वर्षी २ मुलांची आई झालेल्या सीमाला (नाव बदललेले) यासंदर्भात विचारणा केली असता तिने धक्कादायकच माहिती दिली. ‘मी माझ्या अवघ्या आयुष्यात मासिक पाळीदरम्यान कधीही ‘सॅनिटरी नॅपकिन’चा उपयोग केलेला नाही. या काळात कपडा वापरण्यावरच आमचा भर असतो. ‘पॅड’ वापरणे हे आमच्या संस्कृतीचा भाग नाही. जी देवता कधीही पांढरे वस्त्र परिधान करत नाही, तिच्यावर आमची श्रद्धा आहे. त्यामुळे पांढऱ्या रंगाचे ‘सॅनिटरी नॅपकिन’ वापरणे म्हणजे आमच्या श्रद्धेवरच आघात करण्यासारखे आहे’, असे तिने सांगितले.२०१५-१६ च्या ‘नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे’नुसार ४८.५ टक्के (ग्रामीण भाग) व ७७.५ टक्के (शहरी भाग) भारतीय महिला ‘सॅनिटरी नॅपकिन्स’चा उपयोग करतात. मात्र रस्त्यांवर राहणाऱ्या महिलांमध्ये हे प्रमाण अतिशय अत्यल्प आहे.

चक्क नागनदीत कपड्याची विल्हेवाटमासिक पाळीत वापरलेल्या कपड्याची विल्हेवाट लावण्याची या महिलांची तऱ्हा तर अतिशय अयोग्य आहे. ज्या महिला ‘सॅनिटरी नॅपकिन्स’ वापरतात त्या त्यांची विल्हेवाट नागनदीमध्ये करतात. तर कपडेदेखील तेथेच फेकण्यात येतात, अशी माहिती एका महिलेने दिली.

अस्वच्छ कपड्याचा उपयोग धोकादायकबहुतांश महिलांकडून मासिक पाळीदरम्यान अस्वच्छ कपड्याचा वापर करण्यात येतो. मात्र हा कपडाच आरोग्यासाठी सर्वात धोकादायक ठरु शकतो. मात्र याचीदेखील जाणीव या महिलांना नाही. आपली अंतर्वस्त्रे कपड्याची बनलेली असतात. जर ती धोकादायक नाही, तर मग त्यांचा मासिक पाळीदरम्यान उपयोग अयोग्य कसा, असा प्रश्न एका महिलेने उपस्थित केला. मात्र या कपड्यांमुळे जंतूसंसर्ग होण्याचा मोठा धोका असतो. यातून गंभीर आजार होऊ शकतात. जर योग्य स्वच्छता ठेवली नाही, तर कर्करोगदेखील होण्याची शक्यता असते, अशी माहिती वंध्यत्व तज्ज्ञ डॉ.शिवांगी जहागीरदार यांनी दिली.

टॅग्स :Healthआरोग्य