शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

‘आपली बस’ मध्ये दिवसाला नऊ हजार फुकटे प्रवासी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 23:45 IST

महापालिकेच्या ‘आपली बस’ला गेल्या वर्षभरात ४८ कोटी ८२ हजार १७८ रुपयांचा तोटा झाला आहे. तोटा कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा दावा परिवहन विभागाकडून केला जातो. परंतु शहर बसने दररोज प्रवास करणाऱ्या १ लाख ७७ हजार प्रवाशांपैकी ४ ते ६ टक्के म्हणजेच ८ ते ९ हजार प्रवासी विना तिकीट प्रवास करतात. यामुळे परिवहन विभागाला वर्षाला कोट्यवधींचा फटका बसत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे

ठळक मुद्देमनपाचे कसे वाढणार उत्पन्न : वर्षभरात ४८ कोटींचा तोटा

लोकमत न्युज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या ‘आपली बस’ला गेल्या वर्षभरात ४८ कोटी ८२ हजार १७८ रुपयांचा तोटा झाला आहे. तोटा कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा दावा परिवहन विभागाकडून केला जातो. परंतु शहर बसने दररोज प्रवास करणाऱ्या १ लाख ७७ हजार प्रवाशांपैकी ४ ते ६ टक्के म्हणजेच ८ ते ९ हजार प्रवासी विना तिकीट प्रवास करतात. यामुळे परिवहन विभागाला वर्षाला कोट्यवधींचा फटका बसत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. याला वेळीच आळा न बसल्यास परिवहन विभागाच्या तोट्यात आणखी भर पडणार आहे.वंश निमय यांच्याकडे शहर बसची जबाबदारी असताना दररोज १ लाख ६० हजार प्रवासी प्रवास करीत होते. आता ही जबाबदारी तीन आॅपरेटरकडे दिलेली आहे. मात्र प्रवाशांची संख्या १.७७ लाखांवर गेली आहे. यात फारशी वाढ झालेली नाही. प्रवाशांची संख्या चार लाखांवर गेली तरच परिवहन सेवा ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर चालविणे शक्य होईल. अशी माहिती परिवहन समितीचे उपसभापती प्रवीण भिसीकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी नितीश ग्वालबंशी व नितीन साठवणे उपस्थित होते.नागपूर शहरात ३५३ बसेस धावतात. डिसेंबर २०१६ पासून ‘ट्रायलरन’ व त्यानंतर १ मार्च २०१७ पासून पूर्णपणे शहर बस सेवा सुरू झाली. जानेवारी २०१८ रेडबसच्या माध्यमातून ५३ कोटी ९७ लाख ४ हजार २८४ रुपयाचे उत्पन्न झाले . तर या कालावधीत आॅपरेटरला १०१ कोटी ९७ लाख ८६ हजार ४६५ रुपयांचे भुगतान करण्यात आले आहे. म्हणजेच परिवहन विभागाला ४८.८२ कोटींचा तोटा झाला आहे. सर्व बसचे व्यवस्थापन व नियंत्रणाची जबाबदारी डिम्ट्स या आॅपरेटरकडे सोपविण्यात आली आहे़ मात्र या कंपनीचे नियंत्रण नसल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाBus Driverबसचालक