शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

मनपा डिम्टसवर मेहरबान का?

By admin | Updated: April 19, 2017 02:35 IST

दिल्ली मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट सिस्टीम (डिम्टस) या शहर बस सेवा चालविणाऱ्या कंपनीला कंत्राटदारांना तिकीट मशीन्स व कंडक्टर्स पुरविणे बंधनकारक आहे.

कंडक्टर्स पुरविले नाही तरी कारवाई नाही! सोपान पांढरीपांडे नागपूर दिल्ली मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट सिस्टीम (डिम्टस) या शहर बस सेवा चालविणाऱ्या कंपनीला कंत्राटदारांना तिकीट मशीन्स व कंडक्टर्स पुरविणे बंधनकारक आहे. पण डिम्टस वारंवार आपली जबाबदारी झटकत आहे. परंतु मनपाने आजवर कुठलीही कारवाई या कंपनीवर केली नाही. डिम्टसवर ही मेहरबानी का असा प्रश्न त्यामुळे उपस्थित झाला आहे. करार काय म्हणतो? मनपा व डिम्टसमधील करारानुसार डिम्टसने जर कंडक्टर उपलब्ध केला नाही तर प्रति कंडक्टर प्रति दिवस ५०० रुपये दंड मनपा करू शकते. असाच ५०० रु. दंड प्रति तिकीट मशीन प्रति दिवस आकारण्याचीही अट करारात आहे. एवढी स्पष्ट अट करारात असतानासुद्धा डिम्टस कंडक्टर्स व तिकीट मशीन्स पुरवत नाही. परिणामी कंत्राटदारांच्या बसेस जागेवर उभ्या आहेत. अनेक रुटवर बसेस धावत नाहीत याशिवाय डिम्टस कंडक्टरांना धड पगारसुद्धा देत नाही. गेल्या महिन्यात याच मुद्यावर कंडक्टरांनी संप केला व नागपूरची सिटी बस सेवा दोन दिवस बंद होती. शेवटी कामगार आयुक्तांच्या मध्यस्थीने संप संपला पण अजूनही बस सेवा सुरळीत झालेली नाही. याबाबतीत डिम्टसचे सीईओ अमित हितकारी यांना संपर्क केला असता आम्ही क्रमश: बस सेवेचा विस्तार करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे सर्व बसेस एकाच दिवसात धावणे शक्य नाही. पुढील सहा महिन्यांत सर्व बसेस धावू लागतील व सर्व काही सुरळीत होईल, असे हितकारी म्हणाले. परंतु सर्व बसेस एकदम चालवायच्या नव्हत्या तर कंत्राटदारांना बसेस उपलब्ध करण्याची सक्ती का केली?गुंतवणुकीवरील व्याजाचे काय? या प्रश्नांवर हितकारी निरुत्तर झाले. मनपा काय म्हणते? करारात दंड करण्याची सोय असतानाही मनपा डिम्टसकडून दंड का वसूल करत नाही? या प्रश्नावर मनपाचे परिवहन व्यवस्थापक शिवाजीराव जगताप म्हणाले आता फक्त ३०-३५ दिवसच बस सेवा सुरू होऊन झाले आहेत. त्यामुळे डिम्टसला अधिक वेळ द्यायला हवा. परंतु दंड वसूल करण्याचे सोडा मनपाने दंडाची साधी नोटीस तरी डिम्टसला का दिली नाही या प्रश्नाचे उत्तर जगताप यांचेकडे नव्हते. चर्चेदरम्यान नागपुरात मुंबई, पुणे, ठाणे या शहरांसारखी सक्षम बस सेवा द्यायची असेल तर एकूण १२०० बसेस लागतील असेही जगताप म्हणाले. परंतु ३०० बसेस पैकी ९५ बसेस उभ्या राहात असतील तर मनपाचे प्रशासन १२०० बसेस समर्थपणे कशा चालवू शकेल असाही प्रश्न उभा रहातो. त्यामुळे मनपा आता तरी डिम्टसवर कारवाई करून उभ्या असलेल्या ९५ बसेस चालत्या करून जनतेला दिलासा देणार का? हा खरा प्रश्न आहे.