शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
5
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
6
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
7
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
8
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
9
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
10
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
11
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
12
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
13
‘गँग्ज ऑफ उल्हासनगर’पुढे पोलिसांचे सपशेल लोटांगण; आरोपीची पीडित मुलीच्या घरासमोर मिरवणूक
14
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
15
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
16
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
17
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
18
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
19
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
20
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...

नव्या रेल्वेगाड्या हव्यात

By admin | Updated: July 5, 2014 02:12 IST

रेल्वेचा अर्थसंकल्प जाहीर होण्यास अवघा चार दिवसांचा कालावधी उरला आहे.

नागपूर : रेल्वेचा अर्थसंकल्प जाहीर होण्यास अवघा चार दिवसांचा कालावधी उरला आहे. दरवर्षी रेल्वे अर्थसंकल्पाबाबत नागपूरकर आणि वैदर्भीयांच्या अनेक अपेक्षा असतात. परंतु प्रत्येक वेळी त्यांचा अपेक्षांचा भंग होतो. त्यामुळे आगामी रेल्वे अर्थसंकल्पात तरी नागपूरला नव्या गाड्या आणि रखडलेले प्रकल्प पूर्ण व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.रेल्वे अर्थसंकल्पात दरवर्षी विदर्भाच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात येतो. विदर्भात अनेक प्रकल्पांची घोषणा तर अर्थसंकल्पात होते. परंतु जाहीर केलेले प्रकल्प निधीअभावी वर्षानुवर्षे रखडत ठेवण्यात येतात. मागील अनेक वर्षांपासून नागपूर-दिल्ली दुरांतो एक्स्प्रेसची मागणी होत आहे. नागपुरातून अनेक राजकीय कार्यकर्ते, व्यापारी आपल्या कामानिमित्त दिल्लीला जातात. त्यामुळे त्यांच्यासाठी थेट गाडी सुरू करण्याची मागणी आहे. परंतु अद्याप या मागणीची दखल रेल्वे मंत्रालयाने घेतली नाही. याशिवाय नागपूरवरून पुणे आणि महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या फार मोठी आहे. या मार्गावरील रेल्वेगाड्या नेहमीच हाऊसफुल्ल असल्याची स्थिती असते. त्यामुळे या मार्गावर आणखी रेल्वेगाड्या सुरू करून नागपूर-पुणे एक्स्प्रेस, पुणे गरीबरथ डेली करण्याची गरज आहे. याशिवाय नागपूर शहरातून तीर्थस्थळांना जोडणाऱ्या थेट रेल्वेगाड्या सुरू करण्याची गरज आहे. याशिवाय नागपूर-लखनौ, नागपूर-मद्रास, नागपूर-हावडा येथेही थेट रेल्वेगाड्या सुरू करण्याची गरज आहे. नागपूर हे देशाच्या केंद्रस्थानी असून नागपूरचा झपाट्याने विकास होत आहे. त्यामुळे नागपूर शहरातून सर्व दिशांना जाणाऱ्या थेट रेल्वेगाड्या सुरू करणे महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीने या अर्थसंकल्पात घोषणा होण्याची अपेक्षा वर्तवण्यात येत आहे. (प्रतिनिधी)