शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

आरटीई प्रवेशाच्या नवीन नियमाला हायकोर्टात आव्हान

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: April 24, 2024 18:32 IST

Nagpur : राज्य सरकारला नोटीस जारी; ८ मेपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश

नागपूर : सरकारी व अनुदानित शाळांपासून एक किलोमीटर परिसरात कार्यरत असलेल्या स्वयंअर्थसहाय्यित खासगी शाळांना आरटीई प्रवेशातून सूट देण्याच्या नवीन नियमाला मुंबईउच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. न्यायमूर्तिद्वय नितीन सांबरे व अभय मंत्री यांनी बुधवारी या प्रकरणावरील सुनावणीनंतर शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे सचिव, उपसचिव व आयुक्त यांना नोटीस बजावून ८ मेपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.

नवीन नियमाविरुद्ध शिक्षण हक्क कार्यकर्ते वैभव एडके, राहुल शेंडे, वैभव कांबळे व अनिकेत कुत्तरमारे यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. मोफत व सक्तीचे शिक्षण नियमानुसार वंचित, दुर्बल आणि सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास घटकांतील विद्यार्थ्यांसाठी स्वयंअर्थसहाय्यित खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखिव ठेवल्या जातात. या जागांवर प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क सरकारद्वारे अदा केले जाते.

जुन्या नियमानुसार, विद्यार्थ्यांच्या घरापासून एक किलोमीटर परिसरात असलेल्या स्वयंअर्थसहाय्यित खासगी शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत तर, तीन किलोमीटर परिसरात असलेल्या स्वयंअर्थसहाय्यित खासगी शाळांमध्ये इयत्ता सहावी ते आठवीपर्यंत आरटीई प्रवेश दिले जात होते. दरम्यान, आरटीई प्रवेश शिक्षण शुल्काची थकबाकी सतत वाढत गेल्यामुळे सरकारने या शैक्षणिक सत्रापासून वरीलप्रमाणे नवीन नियम लागू केला आहे. हा नियम गरजू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणारा आहे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. या नियमामुळे सधन श्रेणीतील मुलांसाठी इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळा व गरजू मुलांसाठी शासकीय शाळा अशी वर्गवारी तयार होईल. यापूर्वी हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, उत्तर प्रदेश इत्यादी राज्यांतील समान वादग्रस्त नियम रद्द केले गेले आहेत. परिणामी, हा नियमही रद्द करण्यात यावा, असे देखील याचिकाकर्त्यांनी नमूद केले आहे. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. जयना कोठारी व ॲड. दीपक चटप यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूरMumbaiमुंबईRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ता