शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
2
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
3
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
4
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
5
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
6
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
7
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
8
Vaishno Devi Yatra: भयंकर घटनेनंतर वैष्णो देवी यात्रेला पुन्हा सुरूवात; ३४ भाविकांचा झाला होता मृत्यू
9
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
10
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?
11
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
12
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
13
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
14
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
15
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
16
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
17
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
18
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
19
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
20
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार

नव्या धोरणाने शिक्षणात लवचिकता आणण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 11:09 IST

आवड असलेल्या विषयात अभ्यास आणि संशोधनाची सोय नव्या शिक्षण धोरणातून करण्यात येत आहे. नव्या धोरणाने शिक्षणात लवचिकता आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे प्रतिपादन पद्मविभूषण डॉ. के. कस्तुरीरंगन यांनी केले.

ठळक मुद्देवनराईचा मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार प्रदान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वर्तमान शिक्षण हे थराथराने रचलेले, स्तरीकृत असल्यासारखे आहे. १५ वर्षापर्यंत प्राथमिक-माध्यमिक शिक्षण, नंतर चार वर्ष पदवी, पुढे मास्टर्स आणि पीएच.डी. विद्यापीठाच्या, महाविद्यालयांच्या शिक्षणात संशोधनाला वाव न मिळणे ही गंभीर समस्या आहे. त्यामुळे भविष्याचा विचार करणारे शिक्षणाचे धोरणच नसल्यासारखे वाटते. यापेक्षा एखादवेळी विद्यार्थ्याने घेतलेला विषय नकोसा वाटल्यास तो सोडून आवड असलेल्या विषयात अभ्यास आणि संशोधनाची सोय नव्या शिक्षण धोरणातून करण्यात येत आहे. नव्या धोरणाने शिक्षणात लवचिकता आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे प्रतिपादन पद्मविभूषण डॉ. के. कस्तुरीरंगन यांनी केले.भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)चे माजी चेअरमन आणि केंद्र शासनाच्या नवे शिक्षण धोरणा करणाऱ्या समितीचे अध्यक्ष डॉ. कस्तुरीरंगन यांना वनराई फाऊंडेशनतर्फे देण्यात येणाऱ्या यंदाच्या डॉ. मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्काराने गौरविण्यात आले. गुरुवारी नीरी येथील सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. याप्रसंगी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री राजेंद्र मुळक, डॉ. वेदप्रकाश मिश्रा, नीरीचे संचालक डॉ. राकेश कुमार, माजी संचालक डॉ. एस. आर. वटे, वनराई फाऊंडेशनचे विश्वस्त गिरीश गांधी, फाऊंडेशनचे सचिव किशोर धारिया प्रामुुख्याने उपस्थित होते. त्यांनी यावेळी नीरी आणि वनराईच्या कार्याचे कौतुक केले. डॉ. विक्रम साराभाई, डॉ. सतीश धवन आणि डॉ. यु.आर. राव यांच्या मार्गदर्शनातून दिशा मिळाल्याची भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. नीरीचे संचालक डॉ. राकेश कुमार यांनी कार्याविषयी माहिती दिली. संचालन रेखा घिया-दंडिगे यांनी केले.

राजकीय नेतृत्वामुळे शिक्षण व विज्ञान अपयशी : पृथ्वीराज चव्हाणयुपीए शासनाच्या काळात विज्ञान व संशोधनासाठी एक टक्का बजेट ठेवले होते. आपले पंतप्रधान दरवर्षी इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये जाऊन हे बजेट २ टक्के करण्याचे वक्तव्य करतात, त्यांना टाळ्याही मिळतात पण दुर्दैवाची बाब म्हणजे हेच बजेट एकवरून ०.६ टक्केवर पोहचले आहे. चीन यापेक्षा कितीतरी पट समोर आहे. यामुळे भारताचा विज्ञान-तंत्रज्ञान व संशोधनासह गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा डोलारा कोसळल्याची टीका त्यांनी केली. भारतामध्ये प्रचंड क्षमता असूनही राजकीय नेतृत्वामुळे रोजगार निर्मिती, विकास दर वाढविण्यात अपयशी ठरलो आहोत, अशी टीका करीत त्यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र