शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
5
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
6
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
7
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
8
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
9
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
10
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
11
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
12
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
13
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
14
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
15
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
17
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
18
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
19
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

उपाययोजनांसाठी नवा आराखडा  : नागपूर मनपा आयुक्तांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 00:08 IST

नागपूर शहरात शुक्रवारी मुसळधार पावसामुळे शहरात पुराची परिस्थिती निर्माण झाली होती. ३७ चौक व प्रमुख रस्त्यांसह २०० हून अधिक वस्त्यात पाणी साचले. सहा तासात विक्रमी २६३ मि.मी. पाऊ स पडल्याने ही परिस्थिती निर्माण झाली. असे असले तरी याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी तातडीच्या व कायमस्वरुपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने विस्तृत आराखडा तयार करण्याचे निर्देश महापालिकेच्या मुख्य अभियंत्यांना दिले आहे. शहरातील दहा झोनची दोन अभियंत्यांवर जबाबदारी सोपविली असून याबाबतचा अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश महापालिका आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी शनिवारी दिले.

ठळक मुद्दे पाणी साचण्यावर तातडीच्या व कायमस्वरुपी उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहरात शुक्रवारी मुसळधार पावसामुळे शहरात पुराची परिस्थिती निर्माण झाली होती. ३७ चौक व प्रमुख रस्त्यांसह २०० हून अधिक वस्त्यात पाणी साचले. सहा तासात विक्रमी २६३ मि.मी. पाऊ स पडल्याने ही परिस्थिती निर्माण झाली. असे असले तरी याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी तातडीच्या व कायमस्वरुपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने विस्तृत आराखडा तयार करण्याचे निर्देश महापालिकेच्या मुख्य अभियंत्यांना दिले आहे. शहरातील दहा झोनची दोन अभियंत्यांवर जबाबदारी सोपविली असून याबाबतचा अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश महापालिका आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी शनिवारी दिले.पावसाचे पाणी साचणारी शहरातील ६६ ठिकाणे आहेत. यामागील कारणांचा शोध घेऊन त्यावर तातडीच्या कायमस्वरुपी उपाययोजना करण्यात येईल. याबाबतचा अहवाल प्राप्त होताच उपायोजना हाती घेतल्या जातील . पुराच्या पाण्यात अडकलेल्या ७०० पेक्षा अधिक लोकांना अग्निशमन विभाग व एनडीआरएफच्या पथकांनी सुरक्षिपणे बाहेर काढल्याची माहिती वीरेंद्र सिंह यांनी शनिवारी दिली.शुक्र वारी रात्री १२ वाजेपर्यत शहरातील पूरग्रस्त व पाणी साचलेल्या भागाची पाहणी केली. अपर आयुक्त रवींद्र कुंभारे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी रात्री उशिरापर्यत कार्यालयात होते. वेळोवेळी परिस्थितीचा आढावा घेतला जात होता. संकटग्रस्तांनी मदतीसाठी संपर्क साधताच तातडीने उपलब्ध करण्याचे मदत व बचाव पथकाला निर्देश दिले जात होते.शुक्रवारी शहरातील २७ ठिकाणी पाणी साचले होते.मेडिकल चौक, पडोळे हॉस्पिटल जवळील चौकात पाणी साचण्याची समस्या उद्भवते. तसेच काही वस्त्यातही अशीच समस्या निर्माण होते. यावर तातडीच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. तुंबलेली गटारे व पावसाळी नाल्यात साचलेला गाळ व कचरा काढण्याचे निर्देश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहे. पुन्हा मुसळधार पाऊ स पडल्यास आपत्ती निवारण विभागाला सज्ज राहण्याच्या सूचना केल्याची माहिती वीरेंद्र सिंह यांनी दिली.पावसाळा संपताच नाल्या सफाईगटारे व पावसाळी नाल्या साफ करण्याला बराच कालावधी लागतो. याचा विचार करता पावसाळा संपताच आॅक्टोबर महिन्यात गटारे व नाल्या सफाईच्या कामाला सुरूवात करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. पाणी साचण्याची समस्या उद्भवलेल्या भागासह शहराच्या सर्वच झोनमध्ये ही मोहीम राबविली जाणार आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाcommissionerआयुक्त