शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
2
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
3
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
4
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
5
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
6
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
7
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
8
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
9
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
10
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
11
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
12
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
13
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
14
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
15
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
16
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
17
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
18
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
19
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
20
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;

उपाययोजनांसाठी नवा आराखडा  : नागपूर मनपा आयुक्तांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 00:08 IST

नागपूर शहरात शुक्रवारी मुसळधार पावसामुळे शहरात पुराची परिस्थिती निर्माण झाली होती. ३७ चौक व प्रमुख रस्त्यांसह २०० हून अधिक वस्त्यात पाणी साचले. सहा तासात विक्रमी २६३ मि.मी. पाऊ स पडल्याने ही परिस्थिती निर्माण झाली. असे असले तरी याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी तातडीच्या व कायमस्वरुपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने विस्तृत आराखडा तयार करण्याचे निर्देश महापालिकेच्या मुख्य अभियंत्यांना दिले आहे. शहरातील दहा झोनची दोन अभियंत्यांवर जबाबदारी सोपविली असून याबाबतचा अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश महापालिका आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी शनिवारी दिले.

ठळक मुद्दे पाणी साचण्यावर तातडीच्या व कायमस्वरुपी उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहरात शुक्रवारी मुसळधार पावसामुळे शहरात पुराची परिस्थिती निर्माण झाली होती. ३७ चौक व प्रमुख रस्त्यांसह २०० हून अधिक वस्त्यात पाणी साचले. सहा तासात विक्रमी २६३ मि.मी. पाऊ स पडल्याने ही परिस्थिती निर्माण झाली. असे असले तरी याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी तातडीच्या व कायमस्वरुपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने विस्तृत आराखडा तयार करण्याचे निर्देश महापालिकेच्या मुख्य अभियंत्यांना दिले आहे. शहरातील दहा झोनची दोन अभियंत्यांवर जबाबदारी सोपविली असून याबाबतचा अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश महापालिका आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी शनिवारी दिले.पावसाचे पाणी साचणारी शहरातील ६६ ठिकाणे आहेत. यामागील कारणांचा शोध घेऊन त्यावर तातडीच्या कायमस्वरुपी उपाययोजना करण्यात येईल. याबाबतचा अहवाल प्राप्त होताच उपायोजना हाती घेतल्या जातील . पुराच्या पाण्यात अडकलेल्या ७०० पेक्षा अधिक लोकांना अग्निशमन विभाग व एनडीआरएफच्या पथकांनी सुरक्षिपणे बाहेर काढल्याची माहिती वीरेंद्र सिंह यांनी शनिवारी दिली.शुक्र वारी रात्री १२ वाजेपर्यत शहरातील पूरग्रस्त व पाणी साचलेल्या भागाची पाहणी केली. अपर आयुक्त रवींद्र कुंभारे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी रात्री उशिरापर्यत कार्यालयात होते. वेळोवेळी परिस्थितीचा आढावा घेतला जात होता. संकटग्रस्तांनी मदतीसाठी संपर्क साधताच तातडीने उपलब्ध करण्याचे मदत व बचाव पथकाला निर्देश दिले जात होते.शुक्रवारी शहरातील २७ ठिकाणी पाणी साचले होते.मेडिकल चौक, पडोळे हॉस्पिटल जवळील चौकात पाणी साचण्याची समस्या उद्भवते. तसेच काही वस्त्यातही अशीच समस्या निर्माण होते. यावर तातडीच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. तुंबलेली गटारे व पावसाळी नाल्यात साचलेला गाळ व कचरा काढण्याचे निर्देश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहे. पुन्हा मुसळधार पाऊ स पडल्यास आपत्ती निवारण विभागाला सज्ज राहण्याच्या सूचना केल्याची माहिती वीरेंद्र सिंह यांनी दिली.पावसाळा संपताच नाल्या सफाईगटारे व पावसाळी नाल्या साफ करण्याला बराच कालावधी लागतो. याचा विचार करता पावसाळा संपताच आॅक्टोबर महिन्यात गटारे व नाल्या सफाईच्या कामाला सुरूवात करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. पाणी साचण्याची समस्या उद्भवलेल्या भागासह शहराच्या सर्वच झोनमध्ये ही मोहीम राबविली जाणार आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाcommissionerआयुक्त