शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी 200 कोटींची जमीन 3 कोटीत घेतली" , वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
4
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
5
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
6
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
7
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
8
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
9
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
10
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
11
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
12
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
13
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
14
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
15
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
16
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
17
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
18
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
19
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
20
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ

भारत घडविण्यासाठी नवीन राष्ट्रीय धोरण आवश्यक - उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळणकर

By आनंद डेकाटे | Updated: April 8, 2024 18:40 IST

भारत घडविण्यासाठी नवीन राष्ट्रीय धोरण आवश्यक - उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळणकर

नागपूर : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अनिवार्य असून शंभर टक्के लागू होणार आहे. नवीन पिढी अर्थात भारताला घडविण्यासाठी एनईपी आवश्यक आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळणकर यांनी केले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत स्कूल कनेक्ट २ संपर्क अभियान कार्यशाळा गुरुनानक भवन येथे सोमवारी पार पडली. 

अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे होते. तर गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, लिटूचे संचालक डॉ. राजू मानकर, नागपूर विभागाचे उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. संतोष चव्हाण, कुलसचिव डॉ. राजू हिवसे प्रामुख्याने उपस्थित होते.

डॉ. देवळणकर म्हणाले, बारावीनंतर ४० टक्के विद्यार्थी उच्च शिक्षणात येतात. उर्वरित पदवी, अन्य अभ्यासक्रमास प्रवेश घेतात. पारंपरिक अभ्यासक्रमाबाबत अनास्था असल्याने काही विद्यार्थी प्रवेशच घेत नसतील. उच्च शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या अशा विद्यार्थ्यांना शिक्षणाची रचना बदलली आहे हे सांगण्यासाठी अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतल्यास आता कौशल्य, आवडीचे शिक्षण, मेजर- मायनर, ऑन जॉब ट्रेनिंग, विषय निवडीचे स्वातंत्र्य मिळणार आहे. एनईपीत रोजगाराभिमुख शिक्षण मिळणार असून विद्यार्थ्यांना हे सांगणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

अध्यक्षीय भाषण करताना प्रभारी कुलगुरू डॉ. प्रशान्त बोकारे यांनी बारावीतील सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे, असे सांगितले. उच्च शिक्षणात विद्यार्थ्यांचे एकूण नोंदणी प्रमाण २० टक्क्याने कमी होत आहे. त्यामुळे विद्यापीठांमधून कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम उपलब्ध करून देणे तसेच त्याची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे.

प्रास्ताविक प्र-कलगुरु डॉ. संजय दुधे यांनी केले. डॉ. स्मिता आचार्य यांनी आभार मानले. 

टॅग्स :Educationशिक्षण