शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

भारत घडविण्यासाठी नवीन राष्ट्रीय धोरण आवश्यक - उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळणकर

By आनंद डेकाटे | Updated: April 8, 2024 18:40 IST

भारत घडविण्यासाठी नवीन राष्ट्रीय धोरण आवश्यक - उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळणकर

नागपूर : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अनिवार्य असून शंभर टक्के लागू होणार आहे. नवीन पिढी अर्थात भारताला घडविण्यासाठी एनईपी आवश्यक आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळणकर यांनी केले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत स्कूल कनेक्ट २ संपर्क अभियान कार्यशाळा गुरुनानक भवन येथे सोमवारी पार पडली. 

अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे होते. तर गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, लिटूचे संचालक डॉ. राजू मानकर, नागपूर विभागाचे उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. संतोष चव्हाण, कुलसचिव डॉ. राजू हिवसे प्रामुख्याने उपस्थित होते.

डॉ. देवळणकर म्हणाले, बारावीनंतर ४० टक्के विद्यार्थी उच्च शिक्षणात येतात. उर्वरित पदवी, अन्य अभ्यासक्रमास प्रवेश घेतात. पारंपरिक अभ्यासक्रमाबाबत अनास्था असल्याने काही विद्यार्थी प्रवेशच घेत नसतील. उच्च शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या अशा विद्यार्थ्यांना शिक्षणाची रचना बदलली आहे हे सांगण्यासाठी अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतल्यास आता कौशल्य, आवडीचे शिक्षण, मेजर- मायनर, ऑन जॉब ट्रेनिंग, विषय निवडीचे स्वातंत्र्य मिळणार आहे. एनईपीत रोजगाराभिमुख शिक्षण मिळणार असून विद्यार्थ्यांना हे सांगणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

अध्यक्षीय भाषण करताना प्रभारी कुलगुरू डॉ. प्रशान्त बोकारे यांनी बारावीतील सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे, असे सांगितले. उच्च शिक्षणात विद्यार्थ्यांचे एकूण नोंदणी प्रमाण २० टक्क्याने कमी होत आहे. त्यामुळे विद्यापीठांमधून कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम उपलब्ध करून देणे तसेच त्याची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे.

प्रास्ताविक प्र-कलगुरु डॉ. संजय दुधे यांनी केले. डॉ. स्मिता आचार्य यांनी आभार मानले. 

टॅग्स :Educationशिक्षण