शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण देशासाठी घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 20:59 IST

केंद्र सरकारचे प्रस्तावित नवीन शिक्षण धोरण हे देशाला पुढे नेण्याऐवजी मागे नेण्याचा प्रयत्न होय. केवळ शिक्षणच नव्हे तर विद्या, धन, सत्ता आणि शस्त्र या कवचकुंडल्यांपासून बहुजन समाजाला वंचित ठेवून त्यांना पुन्हा गुलामगिरीच्या खाईत लोटण्याचे हे षड्यंत्र असून केंद्र सरकारचे नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण हे बहुजनांसाठीच नव्हे तर देशासाठी घातक आहे, असा एकसूर आमदार निवास येथे आयोजित विविध संघटनांच्या बैठकीत निघाला.

ठळक मुद्देबहुजनांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न : विविध संघटनांचा बैठकीत एकसूर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र सरकारचे प्रस्तावित नवीन शिक्षण धोरण हे देशाला पुढे नेण्याऐवजी मागे नेण्याचा प्रयत्न होय. केवळ शिक्षणच नव्हे तर विद्या, धन, सत्ता आणि शस्त्र या कवचकुंडल्यांपासून बहुजन समाजाला वंचित ठेवून त्यांना पुन्हा गुलामगिरीच्या खाईत लोटण्याचे हे षड्यंत्र असून केंद्र सरकारचे नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण हे बहुजनांसाठीच नव्हे तर देशासाठी घातक आहे, असा एकसूर आमदार निवास येथे आयोजित विविध संघटनांच्या बैठकीत निघाला.बुद्धविहार समन्वय समितीच्या माध्यमातून सोमवारी सायंकाळी आमदार निवास सभागृहात केंद्र सरकारचे प्रस्तावित नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०१९ यावर चर्चा करण्यासाठी गोलमेज परिषद बोलावण्यात आली होती. संविधानाचे अभ्यासक व विश्लेषक देवीदास घोडेस्वार हे अध्यक्षस्थानी होते. केंद्र सरकारचे राष्ट्रीय शिक्षण धोरणात देशाला प्रगतीकडे नेण्याची दृष्टीच नाही, उलट भारताला पुन्हा गुलामगिरीच्या काळात नेण्याचा प्रयत्न दिसून येतो. इतकेच नव्हे तर या धोरणात संविधानिक तरतुदींचीही अवहेलना करण्यात आल्याचा मुद्दा मांडण्यात आला. हे शिक्षण धोरण म्हणजे ज्यांची आर्थिक क्षमता आहे, त्यांनीच उच्च शिक्षण घ्यावे आणि गरीब, आर्थिकदृष्ट्या कमजोर वर्गाने जेमतेम कामापुरते शिक्षण घ्यावे, अशी व्यवस्था निर्माण करण्यासाठी राबवण्यात येणारे आहे. तेव्हा हे धोरण कुठल्याही परिस्थितीत लागू होऊ नये, यासाठी लोकलढा उभारावा, असे आवाहनही बैठकीत करण्यात आले.अशोक सरस्वती यांनी भूमिका विशद केली. कुलदीप रामटेके यांनी या धोरणाची संक्षिप्त माहिती दिली. देवीदास घोडेस्वार यांनी सविस्तरपणे धोरणावर प्रकाश टाकत ते कसे घातक आहे, याचा ऊहापोह केला. बैठकीत दिनेश अंडरसहारे, बबन चहांदे, कवी भोला सरवर, अशोक कोठारे, सत्यजित चंद्रिकापुरे, उत्तमप्रकाश सहारे, ज्ञानेश्वर पिल्लेवान, देवाराम शामकुवर, नामदेव भागवतकर, हरिश्चंद्र सुखदेवे, विद्याभूषण रावत, डॉ. सतीश शंभरकर आदींसह विविध सामाजिक, राजकीय व धार्मिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनकेंद्र सरकारचे नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण २०१९ ची कुठल्याही परिस्थितीत अंमलबजावणी करण्यात येऊ नये, या मागणीसाठी पंतप्रधान, राष्ट्रपतींसह व सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले जाईल. यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकऱ्यांमार्फत हे निवेदन पाठवले जाईल, असा निर्णय यावेळी घेण्यात आला.

 

टॅग्स :Educationशिक्षणMLA Hostelआमदार निवास