शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

स्मार्ट जिल्हा म्हणून नागपूरची राज्यात नवी ओळख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 20:15 IST

शेती क्षेत्राच्या शाश्वत विकासाला सर्वोच्च प्राधान्य देताना रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, रोजगार व आरोग्य आदी मूलभूत सुविधा निर्माण करून नागपूर शहर व जिल्हा राज्यात विकासाच्या सर्वच क्षेत्रात अग्रेसर राहून स्मार्ट जिल्हा म्हणून ओळख निर्माण करण्यात येईल अशी ग्वाही पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी येथे दिली.

ठळक मुद्देचंद्रशेखर बावनकुळे : महाराष्ट्र राज्याचा ५८ वा वर्धापनदिन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेती क्षेत्राच्या शाश्वत विकासाला सर्वोच्च प्राधान्य देताना रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, रोजगार व आरोग्य आदी मूलभूत सुविधा निर्माण करून नागपूर शहर व जिल्हा राज्यात विकासाच्या सर्वच क्षेत्रात अग्रेसर राहून स्मार्ट जिल्हा म्हणून ओळख निर्माण करण्यात येईल अशी ग्वाही पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी येथे दिली.महाराष्ट्र राज्याच्या ५८ व्या वर्धापन दिनानिमित्त कस्तूरचंद पार्क येथे मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर, आमदार डॉ. मिलिंद माने, विभागीय आयुक्त अनुप कुमार, पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे उपस्थित होते.प्रारंभी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी परेडचे निरीक्षण केले. यावेळी पोलीस दलातर्फे परेड कमांडर परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक विशाल ढोणे यांनी मानवंदना दिली.पालकमंत्री बावनकुळे म्हणाले, केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत नागपूर शहराची निवड झाली असून १००२ कोटीचे प्रकल्प प्रस्तावित आहेत. संपूर्ण शहरात सीसीटीव्ही कॅमेरे, कंट्रोल अ‍ॅण्ड कमांड सेंटर, स्मार्ट घनकचरा व्यवस्थापन असे सहा प्रकल्पही प्रस्तावित आहेत. नागपूर सेफ आणि स्मार्ट सिटी प्रकल्प राबविण्यात येत आहे. सर्वांसाठी घरे हे स्वप्न साकारण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घर बांधणीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्यात येत आहे.बॉक्स..उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा गौरवयावेळी पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पोलीस सेवेत उत्कृष्ट कामगिरी करणाºया पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना सन्मान चिन्ह व प्रशस्ती पत्र देऊन गौरव करण्यात आला, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेंतर्गत शहीद जवानांच्या वीर पत्नीस राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने आजीवन मोफत प्रवास सवलत योजनेचे स्मार्ट कार्ड अनुराधा एस.देव, प्रीतम हरबंस कौर, स्मिता शशीकांत जुनघरे यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आले. आदर्श तलाठी पुरस्कार सुनील सीताराम मोवाडे भिवापूर तहसील यांना रोख पाच हजार व प्रशस्तीपत्र देण्यात आले, भारत स्काऊट गाईड जिल्हा कार्यालयाच्यावतीने मिठी मनोज राठी, गार्गी राहुल कुलकर्णी, निधी विजय भोयर, श्रावणी लक्ष्मीकांत पाटील यांना राष्ट्रीय स्तरावरील सुवर्णबाण पुरस्कार पालकमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आले. 

टॅग्स :Maharashtra Dayमहाराष्ट्र दिनnagpurनागपूर