शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

गर्भाशय प्रत्यारोपण मातृत्वासाठी नवी आशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 01:16 IST

जगात सुमारे १.५ दशलक्षपेक्षा जास्त महिला गर्भाशयाच्या वंध्यत्वाने ग्रस्त आहेत. काही स्थितीमध्ये मुलींचा गर्भाशयविनाच जन्म होतो किंवा गर्भाशयातील .....

ठळक मुद्देशैलेश पुनतांबेकर यांची माहिती : ‘एमएसआर-२०१७’ वंध्यत्व परिषदेचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जगात सुमारे १.५ दशलक्षपेक्षा जास्त महिला गर्भाशयाच्या वंध्यत्वाने ग्रस्त आहेत. काही स्थितीमध्ये मुलींचा गर्भाशयविनाच जन्म होतो किंवा गर्भाशयातील रक्तस्राव किंवा काही आजाराच्या दोषामुळे गर्भाशय काढण्याची वेळ येते. अशा महिलांसाठी गर्भाशय प्रत्यारोपण मातृत्वासाठी एक नवी आशा आहे, अशी माहिती पुण्यातील प्रसिद्ध स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ डॉ. शैलेश पुनतांबेकर यांनी येथे दिली.महाराष्टÑ चॅप्टर आॅफ इंडियन सोसायटी आॅफ असिस्टेड रिप्रोडक्शन आणि नागपूर आॅब्स्टेस्ट्रीक्स अ‍ॅण्ड गायनाकॉलॉजिकल सोसायटी (एनओजीएस) यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय ‘एमएसआर-२०१७’ वंध्यत्वावर वार्षिक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.रविवारी या परिषदेचा समारोप झाला. यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.डॉ. पुनतांबेकर म्हणाले, देशातले पहिले गर्भाशय प्रत्यारोपण पुण्यात झाले. सोलापुरातील २१ वर्षीय तरुणीच्या शरीरात तिच्याच आईचे गर्भाशय ट्रान्सप्लान्ट करण्यात आले. या प्रत्यारोपणामुळे मातृत्वाची इच्छा ठेवणाºया महिलांसाठी हे एक आशेचे किरण ठरले. असे म्हटले जाते की, ५०० मध्ये एका महिलेला गर्भाशयाचा आजार असतो.अशा महिलांकडे दोन पर्याय असतात एक तर मूल दत्तक घेणे किंवा सरोगेटची (भाड्याने गर्भ) मदत घेणे. परंतु आता गर्भाशय प्रत्यारोपण हा तिसरा पर्याय म्हणून समोर येत आहे. ही खूप किचकट शस्त्रक्रिया आहे, असेही ते म्हणाले.या वार्षिक परिषदेच्या आयोजनासाठी आयोजन अध्यक्ष डॉ. साधना पटवर्धन, सचिव डॉ. चैतन्य शेंबेकर, ‘एनओजीएस’च्या सचिव डॉ. वर्षा ढवळे यांच्यासह इतरही पदाधिकाºयांनी परिश्रम घेतले.आईचे दूध स्टेमसेलचे एक नैसर्गिक स्रोतप्रसिद्ध स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ डॉ. सतीश पत्की म्हणाले, स्टेमसेल म्हणजे मूलपेशी. आईचे दूध हा मूलपेशींचा एक नैसर्गिक स्रोत आहे, हे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. मुलाला जन्म दिल्यानंतर पहिल्या पाच दिवसांत आईच्या दुधात मूलपेशी खूप प्रमाणात म्हणजे एक एम.एल. दुधामध्ये जवळपास ५०-५० हजार मूलपेशी असतात; नंतर मात्र त्याचं प्रमाण कमी कमी होत अगदी ५० किंवा १०० पेशींपर्यंत येतं. थोडक्यात ही नैसर्गिक स्टेमसेल थेरपीच आहे. आईच्या या मूलपेशी बाळाला तोंडावाटे जातात. हा निसर्गानं दिलेला उपचार असल्याने दुसºया मुलाला जरी छातीवर घेतले तर त्याचा तोटा होत नाही. यामुळे प्रत्येक आईने मुलाच्या सुदृढ आरोग्यासाठी योग्य स्तनपान करणे नितांत आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.कृत्रिम गर्भधारणा वैद्यकक्षेत्रासाठी वरदानगायनॉकॉलॉजिकल सोसायटीचे अध्यक्ष व या वार्षिक परिषदेचे आयोजन सचिव डॉ. चैतन्य शेंबेकर म्हणाले, कृत्रिम गर्भधारणा हे वैद्यक क्षेत्रासाठी वरदान असले तरी त्यात काही गुंतागुंत असते. पाश्च्यात्त्य स्त्रीच्या तुलनेत भारतीय महिलांमध्ये रजोनिवृत्तीचा कालावधी सहा वर्षांनी घटला आहे. वैद्यकीय परिभाषेत याला ‘ओव्हरियन एजिंग’ म्हणतात. अशावेळी गर्भधारणेत मोलाची भूमिका बजावणारा पुरुषातील शुक्राणू आणि स्त्रियांतील बीजांडाचे कृत्रिम मिलन घडवून तयार झालेला ‘एम्ब्रिओ’ जतन करता येतो. तो कृत्रिम गर्भधारणेच्यावेळी गर्भपिशवीत सोडताना गर्भपेशी अतिक्रियाशील होण्याची जोखीम असते, असेही ते म्हणाले. डॉ. दीपक मोदी, डॉ.पी.सी. महापात्र, डॉ. प्रदीप कुमार, डॉ. कानन येलीकर यांनीही महत्त्वाच्या विषयावर प्रकाश टाकला.