शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

सामान्यांच्या स्वप्नांचे नवे 'हीरो'! यूपीएससी परीक्षेत विदर्भातील तब्बल २२ ताऱ्यांनी उजळवले आकाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 11:11 IST

Nagpur : मातृभाषेतून शिक्षण अन् झेडपीची शाळा

राजेश शेगोकारनागपूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाचा परवा निकाल लागला अन् विदर्भातील तब्बल २२ ताऱ्यांनी यूपीएससीचे आकाश उजळवून टाकले. यामधील एक- दोघे सोडले, तर सर्व गुणवंत हे सर्वसामान्य घरातील. गडचिरोलीच्या अल्पशिक्षित शेतमजुराचा मुलगा शुभम तलावी, अमरावतीच्या शेतकऱ्याची मुलगी नम्रता ठाकरे, इलेक्ट्रिशियनची कन्या भाग्यश्री नयकाळे, मेळघाटातील ऑटोचालकाचा मुलगा शिवांग तिवारी, वयाच्या २८ व्या वर्षी यशस्वी ठरलेला रजत पत्रे, यवतमाळची अदिबा अनम अश्फाक अहमद, इतकेच नव्हे, तर नैराश्य न येऊ देता पाचव्या प्रयत्नात यश गाठणारा गोंदियाचा सचिन बिसेन असो, की चौथ्या प्रयत्नात गुणवंत ठरलेली सावी बालकुंडे असो, त्यांचा संघर्ष, त्यांची जिद्द आणि अपयशावर मात करीत मिळवलेले हे यश पुढच्या पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.

कोणत्याही कोचिंग क्लासची चकाकी नाही, शहरातील स्पर्धात्मक वातावरण नाही, तरीही या ग्रामीण भागातील मुलांनी यूपीएससी परीक्षेत आपली वेगळी ओळख निर्माण केली. सामान्य कुटुंबांतील गरिबी, साधेपणा आणि संघर्ष यांच्या सावलीत वाढलेली एक पिढी आता देशाच्या प्रशासनात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. ही केवळ यशाची कहाणी नाही, तर एका संधीचीही आहे. हातावर पोट घेऊन धडपडणाऱ्या घरात, प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न डोळ्यांत ठेवणाऱ्या या मुलांना कुटुंबाने संधी दिली अन् या मुलांनी तिचे सोने केले. त्यामुळेच यशामागे संपूर्ण कुटुंबाचा एक प्रवास आहे.

यामधील अनेक मुलांनी तिसऱ्या ते पाचव्या प्रयत्नात यश गाठले आहे. पहिल्या वा दुसऱ्या प्रयत्नात अपयश आल्यावर नैराश्याने ग्रासलेल्या अनेकांसाठी या गुणवंतांचे यश हे दीपस्तंभ ठरले आहे. जिद्द व ध्येयाप्रति असलेली निष्ठा प्रखर असेल, तर कुठल्याही नैराश्यावर मात करता येते, हा मोठा धडा या यशामधून स्पष्टपणे अधोरेखित झाला आहे. शिवाय कोणत्याही पालकांनी 'पॅरेन्टिंग कोर्स' न करता केवळ ममत्वाने, समजूतदारपणाने आणि खंबीरतेने आपल्या लेकरांच्या पाठीशी उभे राहणे ही बाब या भरारीचा पाया ठरली, याचीही नोंद इतर पालकांनी घेणे गरजेचे आहे.

कधीकाळी प्रशासकीय सेवा म्हणजे फक्त मोठ्या घरातल्या मुलांची मक्तेदारी, असा दृढ समज होता; पण आता या नव्या पिढीने तो समज चुकीचा ठरवला आहे. प्रशासकीय सेवा आता या पिढीच्या वयोगटाच्या कवेत आली असून, डोळ्यांत नवी स्वप्ने पाहणारी ठरली आहे. या विद्यार्थ्यांची कहाणी ही केवळ वैयक्तिक यशाची नाही, तर ती आहे दुसऱ्या पिढीला उमगणाऱ्या शक्यतांची. त्यांनी सिद्ध केले आहे की, परिस्थिती काहीही असो, जर मनात निर्धार असेल, तर कोणतीही उंची गाठता येते. त्यामुळेच ही गुणवंत मुले केवळ त्यांच्या आई- वडिलांची शान नाहीत, तर ती बनली आहेत सामान्यांच्या स्वप्नांचे नवे हीरो.

मातृभाषेतून शिक्षण अन् झेडपीची शाळागावाच्या मातीमध्ये खेळणारी, अंगणात अभ्यास करणारी; मात्र मोठी स्वप्ने पाहणारी ही मुले आता देशाच्या प्रशासकीय सेवेतील मजबूत खांब बनली आहेत. यामधील २० टक्के विद्यार्थ्यांच्या प्रवासाची सुरुवात झाली, ती जिल्हा परिषदेच्या एका साध्या, मातीच्या गंधाने भरलेल्या वर्गखोलीतून. या विद्यार्थ्यांनी मातृभाषेतून शिक्षण घेतले. इंग्रजी न येणे ही अडचण नव्हती, उलट आपल्या भाषेतून शिकताना त्यांनी विषय समजून घेतले, विचार स्वच्छ केले आणि आत्मविश्वासाने स्पर्धा परीक्षांना सामोरे गेले व यशस्वी झाले. कोणतीही सुविधायुक्त शाळा नसतानाही, त्यांची मेहनत, चिकाटी आणि आई- वडिलांची साथ यांनी मिळून हा विजयाचा पाया रचला.

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगNagpur Aakashvaniनागपूर आकाशवाणी केंद्र