शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
2
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
3
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
4
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
5
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
6
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
7
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
8
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
9
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
10
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
11
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
12
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
13
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
14
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
15
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
16
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
17
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
18
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
19
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
20
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो

सामान्यांच्या स्वप्नांचे नवे 'हीरो'! यूपीएससी परीक्षेत विदर्भातील तब्बल २२ ताऱ्यांनी उजळवले आकाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 11:11 IST

Nagpur : मातृभाषेतून शिक्षण अन् झेडपीची शाळा

राजेश शेगोकारनागपूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाचा परवा निकाल लागला अन् विदर्भातील तब्बल २२ ताऱ्यांनी यूपीएससीचे आकाश उजळवून टाकले. यामधील एक- दोघे सोडले, तर सर्व गुणवंत हे सर्वसामान्य घरातील. गडचिरोलीच्या अल्पशिक्षित शेतमजुराचा मुलगा शुभम तलावी, अमरावतीच्या शेतकऱ्याची मुलगी नम्रता ठाकरे, इलेक्ट्रिशियनची कन्या भाग्यश्री नयकाळे, मेळघाटातील ऑटोचालकाचा मुलगा शिवांग तिवारी, वयाच्या २८ व्या वर्षी यशस्वी ठरलेला रजत पत्रे, यवतमाळची अदिबा अनम अश्फाक अहमद, इतकेच नव्हे, तर नैराश्य न येऊ देता पाचव्या प्रयत्नात यश गाठणारा गोंदियाचा सचिन बिसेन असो, की चौथ्या प्रयत्नात गुणवंत ठरलेली सावी बालकुंडे असो, त्यांचा संघर्ष, त्यांची जिद्द आणि अपयशावर मात करीत मिळवलेले हे यश पुढच्या पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.

कोणत्याही कोचिंग क्लासची चकाकी नाही, शहरातील स्पर्धात्मक वातावरण नाही, तरीही या ग्रामीण भागातील मुलांनी यूपीएससी परीक्षेत आपली वेगळी ओळख निर्माण केली. सामान्य कुटुंबांतील गरिबी, साधेपणा आणि संघर्ष यांच्या सावलीत वाढलेली एक पिढी आता देशाच्या प्रशासनात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. ही केवळ यशाची कहाणी नाही, तर एका संधीचीही आहे. हातावर पोट घेऊन धडपडणाऱ्या घरात, प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न डोळ्यांत ठेवणाऱ्या या मुलांना कुटुंबाने संधी दिली अन् या मुलांनी तिचे सोने केले. त्यामुळेच यशामागे संपूर्ण कुटुंबाचा एक प्रवास आहे.

यामधील अनेक मुलांनी तिसऱ्या ते पाचव्या प्रयत्नात यश गाठले आहे. पहिल्या वा दुसऱ्या प्रयत्नात अपयश आल्यावर नैराश्याने ग्रासलेल्या अनेकांसाठी या गुणवंतांचे यश हे दीपस्तंभ ठरले आहे. जिद्द व ध्येयाप्रति असलेली निष्ठा प्रखर असेल, तर कुठल्याही नैराश्यावर मात करता येते, हा मोठा धडा या यशामधून स्पष्टपणे अधोरेखित झाला आहे. शिवाय कोणत्याही पालकांनी 'पॅरेन्टिंग कोर्स' न करता केवळ ममत्वाने, समजूतदारपणाने आणि खंबीरतेने आपल्या लेकरांच्या पाठीशी उभे राहणे ही बाब या भरारीचा पाया ठरली, याचीही नोंद इतर पालकांनी घेणे गरजेचे आहे.

कधीकाळी प्रशासकीय सेवा म्हणजे फक्त मोठ्या घरातल्या मुलांची मक्तेदारी, असा दृढ समज होता; पण आता या नव्या पिढीने तो समज चुकीचा ठरवला आहे. प्रशासकीय सेवा आता या पिढीच्या वयोगटाच्या कवेत आली असून, डोळ्यांत नवी स्वप्ने पाहणारी ठरली आहे. या विद्यार्थ्यांची कहाणी ही केवळ वैयक्तिक यशाची नाही, तर ती आहे दुसऱ्या पिढीला उमगणाऱ्या शक्यतांची. त्यांनी सिद्ध केले आहे की, परिस्थिती काहीही असो, जर मनात निर्धार असेल, तर कोणतीही उंची गाठता येते. त्यामुळेच ही गुणवंत मुले केवळ त्यांच्या आई- वडिलांची शान नाहीत, तर ती बनली आहेत सामान्यांच्या स्वप्नांचे नवे हीरो.

मातृभाषेतून शिक्षण अन् झेडपीची शाळागावाच्या मातीमध्ये खेळणारी, अंगणात अभ्यास करणारी; मात्र मोठी स्वप्ने पाहणारी ही मुले आता देशाच्या प्रशासकीय सेवेतील मजबूत खांब बनली आहेत. यामधील २० टक्के विद्यार्थ्यांच्या प्रवासाची सुरुवात झाली, ती जिल्हा परिषदेच्या एका साध्या, मातीच्या गंधाने भरलेल्या वर्गखोलीतून. या विद्यार्थ्यांनी मातृभाषेतून शिक्षण घेतले. इंग्रजी न येणे ही अडचण नव्हती, उलट आपल्या भाषेतून शिकताना त्यांनी विषय समजून घेतले, विचार स्वच्छ केले आणि आत्मविश्वासाने स्पर्धा परीक्षांना सामोरे गेले व यशस्वी झाले. कोणतीही सुविधायुक्त शाळा नसतानाही, त्यांची मेहनत, चिकाटी आणि आई- वडिलांची साथ यांनी मिळून हा विजयाचा पाया रचला.

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगNagpur Aakashvaniनागपूर आकाशवाणी केंद्र