शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सामान्यांच्या स्वप्नांचे नवे 'हीरो'! यूपीएससी परीक्षेत विदर्भातील तब्बल २२ ताऱ्यांनी उजळवले आकाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 11:11 IST

Nagpur : मातृभाषेतून शिक्षण अन् झेडपीची शाळा

राजेश शेगोकारनागपूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाचा परवा निकाल लागला अन् विदर्भातील तब्बल २२ ताऱ्यांनी यूपीएससीचे आकाश उजळवून टाकले. यामधील एक- दोघे सोडले, तर सर्व गुणवंत हे सर्वसामान्य घरातील. गडचिरोलीच्या अल्पशिक्षित शेतमजुराचा मुलगा शुभम तलावी, अमरावतीच्या शेतकऱ्याची मुलगी नम्रता ठाकरे, इलेक्ट्रिशियनची कन्या भाग्यश्री नयकाळे, मेळघाटातील ऑटोचालकाचा मुलगा शिवांग तिवारी, वयाच्या २८ व्या वर्षी यशस्वी ठरलेला रजत पत्रे, यवतमाळची अदिबा अनम अश्फाक अहमद, इतकेच नव्हे, तर नैराश्य न येऊ देता पाचव्या प्रयत्नात यश गाठणारा गोंदियाचा सचिन बिसेन असो, की चौथ्या प्रयत्नात गुणवंत ठरलेली सावी बालकुंडे असो, त्यांचा संघर्ष, त्यांची जिद्द आणि अपयशावर मात करीत मिळवलेले हे यश पुढच्या पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.

कोणत्याही कोचिंग क्लासची चकाकी नाही, शहरातील स्पर्धात्मक वातावरण नाही, तरीही या ग्रामीण भागातील मुलांनी यूपीएससी परीक्षेत आपली वेगळी ओळख निर्माण केली. सामान्य कुटुंबांतील गरिबी, साधेपणा आणि संघर्ष यांच्या सावलीत वाढलेली एक पिढी आता देशाच्या प्रशासनात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. ही केवळ यशाची कहाणी नाही, तर एका संधीचीही आहे. हातावर पोट घेऊन धडपडणाऱ्या घरात, प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न डोळ्यांत ठेवणाऱ्या या मुलांना कुटुंबाने संधी दिली अन् या मुलांनी तिचे सोने केले. त्यामुळेच यशामागे संपूर्ण कुटुंबाचा एक प्रवास आहे.

यामधील अनेक मुलांनी तिसऱ्या ते पाचव्या प्रयत्नात यश गाठले आहे. पहिल्या वा दुसऱ्या प्रयत्नात अपयश आल्यावर नैराश्याने ग्रासलेल्या अनेकांसाठी या गुणवंतांचे यश हे दीपस्तंभ ठरले आहे. जिद्द व ध्येयाप्रति असलेली निष्ठा प्रखर असेल, तर कुठल्याही नैराश्यावर मात करता येते, हा मोठा धडा या यशामधून स्पष्टपणे अधोरेखित झाला आहे. शिवाय कोणत्याही पालकांनी 'पॅरेन्टिंग कोर्स' न करता केवळ ममत्वाने, समजूतदारपणाने आणि खंबीरतेने आपल्या लेकरांच्या पाठीशी उभे राहणे ही बाब या भरारीचा पाया ठरली, याचीही नोंद इतर पालकांनी घेणे गरजेचे आहे.

कधीकाळी प्रशासकीय सेवा म्हणजे फक्त मोठ्या घरातल्या मुलांची मक्तेदारी, असा दृढ समज होता; पण आता या नव्या पिढीने तो समज चुकीचा ठरवला आहे. प्रशासकीय सेवा आता या पिढीच्या वयोगटाच्या कवेत आली असून, डोळ्यांत नवी स्वप्ने पाहणारी ठरली आहे. या विद्यार्थ्यांची कहाणी ही केवळ वैयक्तिक यशाची नाही, तर ती आहे दुसऱ्या पिढीला उमगणाऱ्या शक्यतांची. त्यांनी सिद्ध केले आहे की, परिस्थिती काहीही असो, जर मनात निर्धार असेल, तर कोणतीही उंची गाठता येते. त्यामुळेच ही गुणवंत मुले केवळ त्यांच्या आई- वडिलांची शान नाहीत, तर ती बनली आहेत सामान्यांच्या स्वप्नांचे नवे हीरो.

मातृभाषेतून शिक्षण अन् झेडपीची शाळागावाच्या मातीमध्ये खेळणारी, अंगणात अभ्यास करणारी; मात्र मोठी स्वप्ने पाहणारी ही मुले आता देशाच्या प्रशासकीय सेवेतील मजबूत खांब बनली आहेत. यामधील २० टक्के विद्यार्थ्यांच्या प्रवासाची सुरुवात झाली, ती जिल्हा परिषदेच्या एका साध्या, मातीच्या गंधाने भरलेल्या वर्गखोलीतून. या विद्यार्थ्यांनी मातृभाषेतून शिक्षण घेतले. इंग्रजी न येणे ही अडचण नव्हती, उलट आपल्या भाषेतून शिकताना त्यांनी विषय समजून घेतले, विचार स्वच्छ केले आणि आत्मविश्वासाने स्पर्धा परीक्षांना सामोरे गेले व यशस्वी झाले. कोणतीही सुविधायुक्त शाळा नसतानाही, त्यांची मेहनत, चिकाटी आणि आई- वडिलांची साथ यांनी मिळून हा विजयाचा पाया रचला.

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगNagpur Aakashvaniनागपूर आकाशवाणी केंद्र