शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
5
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
6
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
7
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
8
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
9
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
10
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
11
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
12
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
13
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
14
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
15
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
16
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
17
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
18
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
19
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
20
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

भाच्यांनी केला मामाचा झाेपेत खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:07 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क खापरखेडा : मामेबहिणीसाेबत लग्न लावून देण्यास मामाचा विराेध असल्याने चिडलेल्या भाच्यांची त्यांच्या दाेन मित्रांच्या मदतीने मामाचा ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

खापरखेडा : मामेबहिणीसाेबत लग्न लावून देण्यास मामाचा विराेध असल्याने चिडलेल्या भाच्यांची त्यांच्या दाेन मित्रांच्या मदतीने मामाचा झाेपेत खून केला. यात आराेपींनी त्याच्या छाती व डाेक्यावर टिकासने वार केले. ही घटना खापरखेडा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील पिपळा (डाकबंगला) येथे बुधवारी (दि. ९) मध्यरात्री घडली असून, गुरुवारी (दि. १०) सकाळी उघडकीस आली. यात पाेलिसांनी चाैघांपैकी तिघांना अटक केली.

संताेष गाेकुलनाथ साेलंकी (वय ५२, रा. पिपळा डाकबंगला, ता. सावनेर) असे मृताचे, तर जयपाल चव्हाण (२१), पवन चव्हाण (२३, दाेघेही रा. धापेवाडा, ता. कळमेश्वर), धीरज ऊर्फ दिनेश धुर्वे (रा. हरदाेली) व मनीष बनारसे (रा. हरदाेली) अशी आराेपींची नावे आहेत. जयपाल व पवन संताेषचे भाचे असून, मनीष व धीरज पवनचे मित्र आहेत. संताेष बांधकाम कामगार म्हणून काम करायचा. धापेवाडा येथे त्याची बहीण राहत असल्याने काैटुंबिक वादामुळे त्याची पत्नी दाेन मुली व मुलाला घेऊन काही दिवसांपूर्वी धापेवाडा येथे राहायला गेली. त्यामुळे संताेष घरी एकटाच हाेता. कावीळने आजारी असल्याने त्याच्या घरी गावठी उपचार करणाऱ्यांची ये-जा हाेती.

दरम्यान, गुरुवारी सकाळी उपचार करणाऱ्यांपैकी एकजण त्याच्या घरी गेला असता, त्याचा खून करण्यात आल्याचे उघड झाले. माहिती मिळताच ठाणेदार काळे यांनी घटनास्थळ गाठले. छाती व डाेक्यावर टिकासने वार करून झाेपेतच त्याचा खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनीच स्पष्ट झाले हाेते. पाेलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पाेलीस अधीक्षक राहुल माखनीकर, उपविभागीय पाेलीस अधिकारी मुख्तार बागवान व स्थानिक गुन्हे शाखेच्या पाेलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाचीही मदत घेण्यात आली.

पाेलिसांनी सायंकाळी जयपाल, पवन व धीरजला ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पाेलिसांनी दिली. मनीष पसार असून, त्याला लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे पाेलिसांनी सांगितले. याप्रकरणी खापरखेडा पाेलिसांनी भादंवि ३०२ अन्वये गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला. ही कारवाई ठाणेदार काळे, उपनिरीक्षक अभिषेक अंधारे, उमेश ठाकरे, आशिष भुरे, प्रमोद भोयर, नुमान शेख, अलीम शेख, राजू भोयर यांच्या पथकाने केली.

...

लग्नावरून वाद

संताेषला १८ वर्षांची मुलगी आहे. भाच्यांपैकी एकाची त्याच्या एका मुलीसाेबत लग्न करण्याची इच्छा हाेती. मात्र, संताेषचा लग्नाला विराेध हाेता. त्यामुळे दाेघांच्याही मनात मामाविषयी राग हाेता. याच रागामुळे त्यांनी धीरज व मनीष यांना साेबत घेऊन धापेवाडा येथून माेटारसायकलने पिपळा (डाकबंगला) गाठले. दार आतून बंद असल्याने त्यांनी भिंतीची वीट काढली व हात आत टाकून दाराची कडी उघडली.

....

माेबाईलमुळे बिंग फुटले

खून केल्यानंतर आराेपींनी मनीषच्या माेटारसायकलने पळ काढला. जाताना त्यांनी संताेषचा माेबाईल साेबत नेला. हा माेबाईल बंद करून धापेवाडा शिवारात फेकला. पाेलिसांनी सर्वप्रथम संताेषच्या माेबाईलचे लाेकेशन ट्रेस केले. त्याचे शेवटचे धापेवाडा आढळून येताच पाेलिसांनी चाैकशी केली आणि त्याच्या पत्नीसह नातेवाइकांना विचारपूस करण्यासाठी ताब्यात घेतले. त्यातच जयपाल व पवनने खून केल्याचे कबुल केले व मित्रांची नावे सांगितली.