शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

अंबाझरी तलाव बंधाऱ्याच्या सुरक्षेबाबत हलगर्जीपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 12:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहराचा ऐतिहासिक ठेवा असलेल्या अंबाझरी तलावाचा बंधारा ढासळण्याच्या स्थितीत आला आहे. प्रकरणाची गंभीरता पाहता ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहराचा ऐतिहासिक ठेवा असलेल्या अंबाझरी तलावाचा बंधारा ढासळण्याच्या स्थितीत आला आहे. प्रकरणाची गंभीरता पाहता महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने कठोर पावले उचलण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले आहे. यासंदर्भात नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या अध्यक्षतेत एक समिती गठित करण्यात आली आहे. ढासळण्याच्या स्थितीत पोहोचलेल्या अंबाझरी तलावाच्या बंधाऱ्याचे काम त्वरित सुरू करण्यात यावे, असा आदेश समितीला देण्यात आला आहे. प्राधिकरणाने सुनावणीदरम्यान मनपाच्या उदासीन व हलगर्जीपणाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली.

गुरुवारी प्राधिकरणाचे सदस्य बॅ. विनोद तिवारी, एस.डी. कुलकर्णी व एस.टी. सांगळे यांनी हा निर्णय सुनावला. १८७० मध्ये तयार करण्यात आलेल्या अंबाझरी तलावाचे पाणी ‘लिक’ होत असल्याबाबत जल अभ्यासक प्रवीण महाजन यांनी ‘सोशल मीडिया’वर अनेक छायाचित्रांसह लेख ‘पोस्ट’ केला होता. यावर प्राधिकरणाने स्वत:हून दखल घेत याचिका दाखल केली होती. मनपासमवेत सर्व प्रतिवादींना नोटीस जारी केली होती. ७ डिसेंबर रोजी प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान मनपाने प्राधिकरणाच्या अधिकार क्षेत्रावर आपत्ती दर्शविली होती. प्राधिकरणाला या प्रकरणात स्वत: दखल घेण्याचा अधिकार नाही, असेदेखील म्हटले होते. प्राधिकरणाने मनपाच्या हरकतींचे खंडन करीत प्रकरणाची सुनावणी केली व १० डिसेंबर रोजी निर्णय सुनावला. बंधाऱ्याची सुरक्षा व अतिक्रमणासंदर्भात अहवाल तयार करण्याचा निर्णयात आदेश देण्यात आला. समितीला प्रत्येक महिन्यात समीक्षा बैठक घेण्यास सांगण्यात आले आहे. पहिली बैठक २० डिसेंबर रोजी बोलविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

...तर नागपूर बुडेल

अंबाझरी तलाव खूप जुना आहे. मनपाने या तलावाच्या सुरक्षेसंदर्भात सुरुवातीपासूनच उदासीनता दाखविली. १९९३ साली अखेरची दुरुस्ती करण्यात आली होती. त्यानंतर तलावाची उपेक्षा होत आहे. काळानुरूप बंधारा कमकुवत होत आहे. जर वेळेत तलावाच्या बंधाऱ्याची डागडुजी झाली नाही तर हा बंधारा ढासळू शकतो. जर असे झाले तर नागपुरातील अनेक वस्त्या बुडतील.

या होत्या मागण्या

- अंबाझरी तलावाचा बंधारा व ‘स्पील वे’ची तातडीने डागडुजी व्हावी.

- तलावाच्या जवळपास मातीच्या बंधाऱ्याची डागडुजी व्हावी.

- तलाव परिसरात लावलेल्या स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला दुसरीकडे स्थानांतरित करावे.

- तलावाच्या सभोवताल असलेले अतिक्रमण हटविण्यात यावे.

- तलावात मिसळणारे सांडपाणी थांबविण्यात यावे.

- ‘एमआयडीसी’च्या उद्योगांमधून निघणाऱ्या घाणेरड्या पाण्याचा निचरा थांबावा.

प्रगतीचा वेग वाढेल, संकट टळेल

‘लोकमत’ने या मुद्याला प्रामुख्याने समोर आणले होते, सोबतच नागरिकांचेदेखील लक्ष आकर्षित केले होते. प्राधिकरणाने ‘लोकमत’च्या वृत्तांचीदेखील दखल घेतली. यामुळे नागपूरची वेगाने प्रगती होईल व शहरावरील संकटदेखील दूर होईल, असे महाजन यांनी सांगितले.

टॅग्स :Ambazari Lakeअंबाझरी तलाव