शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

अंबाझरी तलाव बंधाऱ्याच्या सुरक्षेबाबत हलगर्जीपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 12:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहराचा ऐतिहासिक ठेवा असलेल्या अंबाझरी तलावाचा बंधारा ढासळण्याच्या स्थितीत आला आहे. प्रकरणाची गंभीरता पाहता ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहराचा ऐतिहासिक ठेवा असलेल्या अंबाझरी तलावाचा बंधारा ढासळण्याच्या स्थितीत आला आहे. प्रकरणाची गंभीरता पाहता महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने कठोर पावले उचलण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले आहे. यासंदर्भात नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या अध्यक्षतेत एक समिती गठित करण्यात आली आहे. ढासळण्याच्या स्थितीत पोहोचलेल्या अंबाझरी तलावाच्या बंधाऱ्याचे काम त्वरित सुरू करण्यात यावे, असा आदेश समितीला देण्यात आला आहे. प्राधिकरणाने सुनावणीदरम्यान मनपाच्या उदासीन व हलगर्जीपणाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली.

गुरुवारी प्राधिकरणाचे सदस्य बॅ. विनोद तिवारी, एस.डी. कुलकर्णी व एस.टी. सांगळे यांनी हा निर्णय सुनावला. १८७० मध्ये तयार करण्यात आलेल्या अंबाझरी तलावाचे पाणी ‘लिक’ होत असल्याबाबत जल अभ्यासक प्रवीण महाजन यांनी ‘सोशल मीडिया’वर अनेक छायाचित्रांसह लेख ‘पोस्ट’ केला होता. यावर प्राधिकरणाने स्वत:हून दखल घेत याचिका दाखल केली होती. मनपासमवेत सर्व प्रतिवादींना नोटीस जारी केली होती. ७ डिसेंबर रोजी प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान मनपाने प्राधिकरणाच्या अधिकार क्षेत्रावर आपत्ती दर्शविली होती. प्राधिकरणाला या प्रकरणात स्वत: दखल घेण्याचा अधिकार नाही, असेदेखील म्हटले होते. प्राधिकरणाने मनपाच्या हरकतींचे खंडन करीत प्रकरणाची सुनावणी केली व १० डिसेंबर रोजी निर्णय सुनावला. बंधाऱ्याची सुरक्षा व अतिक्रमणासंदर्भात अहवाल तयार करण्याचा निर्णयात आदेश देण्यात आला. समितीला प्रत्येक महिन्यात समीक्षा बैठक घेण्यास सांगण्यात आले आहे. पहिली बैठक २० डिसेंबर रोजी बोलविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

...तर नागपूर बुडेल

अंबाझरी तलाव खूप जुना आहे. मनपाने या तलावाच्या सुरक्षेसंदर्भात सुरुवातीपासूनच उदासीनता दाखविली. १९९३ साली अखेरची दुरुस्ती करण्यात आली होती. त्यानंतर तलावाची उपेक्षा होत आहे. काळानुरूप बंधारा कमकुवत होत आहे. जर वेळेत तलावाच्या बंधाऱ्याची डागडुजी झाली नाही तर हा बंधारा ढासळू शकतो. जर असे झाले तर नागपुरातील अनेक वस्त्या बुडतील.

या होत्या मागण्या

- अंबाझरी तलावाचा बंधारा व ‘स्पील वे’ची तातडीने डागडुजी व्हावी.

- तलावाच्या जवळपास मातीच्या बंधाऱ्याची डागडुजी व्हावी.

- तलाव परिसरात लावलेल्या स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला दुसरीकडे स्थानांतरित करावे.

- तलावाच्या सभोवताल असलेले अतिक्रमण हटविण्यात यावे.

- तलावात मिसळणारे सांडपाणी थांबविण्यात यावे.

- ‘एमआयडीसी’च्या उद्योगांमधून निघणाऱ्या घाणेरड्या पाण्याचा निचरा थांबावा.

प्रगतीचा वेग वाढेल, संकट टळेल

‘लोकमत’ने या मुद्याला प्रामुख्याने समोर आणले होते, सोबतच नागरिकांचेदेखील लक्ष आकर्षित केले होते. प्राधिकरणाने ‘लोकमत’च्या वृत्तांचीदेखील दखल घेतली. यामुळे नागपूरची वेगाने प्रगती होईल व शहरावरील संकटदेखील दूर होईल, असे महाजन यांनी सांगितले.

टॅग्स :Ambazari Lakeअंबाझरी तलाव