शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

नीटचा गाेंधळ कायम, सरकारी मेडिकल काॅलेजचा मार्ग ६३० च्या खालील विद्यार्थ्यांसाठी कठीण

By निशांत वानखेडे | Updated: June 10, 2024 16:43 IST

नीटच्या निकालाविराेधात विद्यार्थी व पालकांनी सर्वाेच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

नागपूर : नीट निकालावरून देशभरात सध्या गाेंधळ सुरू आहे. त्यामुळे वैद्यकीय पदवी प्रवेश प्रक्रियेवर अनिश्चिततेचे सावट पसरले आहे. अशात विद्यार्थ्यांवर दडपण वाढले आहे. भरघाेष निकाल लागल्याने ६३० च्या खाली गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाचा मार्ग कठीण जाणार असल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रयत्नांची पराकाष्टा करून ६०० च्या आसपास गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना निराशा येण्याची भीती आहे.

नीटच्या निकालाविराेधात विद्यार्थी व पालकांनी सर्वाेच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ६७ विद्यार्थ्यांना पहिली रॅंक मिळणे, एकाच केंद्रावरील ६ विद्यार्थ्यांना ७२० पैकी ७२० गुण मिळणे आणि एनटीए’द्वारे १५६३ विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देणे वादाच्या भाेवऱ्यात सापडले आहे. हे प्रकरण निस्तरल्यानंतर प्रवेशाचा प्रश्न निर्माण हाेण्याची चिन्हे दिसून येत आहेत.देशभरात एमबीबीएस पदवी अभ्यासक्रमाच्या ४५ हजार जागा आहेत. गेल्या वर्षी ५८७ ते ५८० गुणांपर्यंत या जागा भरल्या गेल्या हाेत्या. यंदा भरघाेष गुण मिळाल्याने कट ऑफ पाॅइंट ३० ते ४० गुणांनी वर जाण्याची, म्हणजे ६३० गुणांवर जाण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ६२० पर्यंत गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही ५० हजाराच्या वरची ऑल इंडिया रॅंक मिळाली आहे. विशेष म्हणजे ६७ विद्यार्थ्यांना १०० टक्के पर्सेंटाईल असल्याने दिल्लीच्या ‘एम्स’मध्ये ७२० च्या खालील ग्रेस गुणांमुळे ७१९ गुण घेणाऱ्यांनाही प्रवेश मिळणे अशक्य झाले आहे. त्यामुळे एम्समध्ये प्रवेशाचे स्वप्न पाहणाऱ्यांची निराशा हाेऊ शकते. नागपूरचा वेद शेंडे, शुभान सेनगुप्ता हे विद्यार्थी यात पात्र ठरतील, हे विशेष. आता निकालाचा गाेंधळ दूर हाेण्याची व प्रवेश प्रक्रिया सुरू हाेण्याची प्रतीक्षा आहे.

महाराष्ट्रात स्थिती चांगली

महाराष्ट्रात ३८ वैद्यकीय महाविद्यालये आहेत व त्यात ५१०० जागा आहेत. खाजगी महाविद्यालयात ९००० च्यावर जागा आहेत. सरकारी महाविद्यालयातील ८५ टक्के जागा स्थानिक विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात सरकारी महाविद्यालयाचे प्रवेश कमी कटऑफवरही हाेण्याची शक्यता आहे. विशेषत: आरक्षित प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना लाभ मिळू शकताे. कमी वैद्यकीय महाविद्यालये असलेल्या बिहारसारख्या राज्यात प्रवेशाची मारामारी हाेण्याची शक्यता नीट समुपदेशक आर्यन नायडू यांनी व्यक्त केली. शिवाय महाराष्ट्रात नीट परीक्षेदरम्यान गाेंधळाची घटना नसल्याने येथील विद्यार्थ्यांना ग्रेस गुणांचा लाभ मिळाला नाही.

टॅग्स :Studentविद्यार्थीMedicalवैद्यकीय