शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

देशात अल्पसंख्यांक या संकल्पनेचा पुनर्विचार करण्याची गरज - सरकार्यवाह होसबळे 

By योगेश पांडे | Updated: March 17, 2024 19:06 IST

देशातील अल्पसंख्यांक या संकल्पनेचाच पुनर्विचार करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी केले.

नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच अल्पसंख्यांकांच्या राजकारणाच्या विरोधात राहिला आहे. देश हा सगळ्या लोकांचाच आहे. देशातील अल्पसंख्यांक या संकल्पनेचाच पुनर्विचार करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या समारोपाच्या दिवशी आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.

रविवारी होसबळे यांची संघाच्या सरकार्यवाह पदी फेरनिवड झाली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. देशातील हिंदू कोड बिलामध्ये समाविष्ट असलेल्या सर्वांचे संघ संघटन करतो. अल्पसंख्यांक पद्धती आणि विचार काही दशकांपासून सुरू आहे. देशात मुस्लिम व ख्रिश्चन समुदायातील लोकांना अल्पसंख्यांक समजले जाते. त्यातील अनेक जण संघात येतात. मात्र आम्ही त्यांना ते आमच्याकडे येतात असे म्हणून शोपीस बनवून दाखवू इच्छित नाही. राष्ट्रीयतेने ते हिंदूच आहेत, असे सरकार्यवाह म्हणाले. यावेळी संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर, सह-प्रचार प्रमुख नरेंद्र कुमार आणि आलोक कुमार उपस्थित होते.

केंद्र सरकारच्या पाठीवर शाबासकीची थापगेल्या १० वर्षात भारतात झालेल्या बदलांचे जगभरातील २५ अर्थतज्ज्ञांनी कौतुक केले आहे. येत्या निवडणुकीत जनताही मतांच्या माध्यमातून सरकारच्या कामाचा आढावा घेणार आहे. गेल्या १० वर्षांत विविध क्षेत्रात चांगले काम झाले आहे. यासोबतच देशाचा मानही वाढला आहे. जनतेच्या मनात केंद्राविषयी काय मत आहे हे ४ जून रोजी समोर येईलच, असे प्रतिपादन करत सरकार्यवाहांनी केंद्र सरकारला शाबासकीची थापच दिली.

देशात समान नागरी कायदा व्हावाचसंघ समान नागरी कायद्याच्या बाजूनेच आहे. देशात समान नागरी कायदा व्हावा यासाठी अखिल भारतीय कार्यकारिणी मंडळात प्रस्ताव मांडला होता. उत्तरांखड राज्याने यात पुढाकार घेतला आहे. तेथील अनुभवानंतर हळूहळू संपूर्ण देशात हा कायदा लागू व्हायला हवा. उत्तराधिकार, दत्तक घेणे, विवाह आणि इतर मुद्द्यांवर चर्चा करणे आवश्यक आहे आणि नंतर ते पुढे जाऊ शकतात असे सरकार्यवाह म्हणाले.

संघ सदैव महिलांच्या पाठीशीमहिलांकडे केवळ देवी आणि दासी म्हणून पाहणे पूर्णपणे अन्यायकारक आहे. महिला प्रत्येक क्षेत्रात आपली क्षमता सिद्ध करत आहेत. अशा कुशल महिलांच्या पाठीशी संघ नेहमीच उभा राहिला आहे आणि भविष्यातही अशा कुशल महिलांच्या पाठीशी उभा राहणार असल्याचे होसबळे यांनी स्पष्ट केले.

‘इलेक्टोरल बॉंड’ हा एक 'प्रयोग’‘इलेक्टोरल बॉंड’बाबत संघाने अद्यापही बैठकीत चर्चा केलेली नाही. सध्या तरी हा एक प्रयोग आहे. तो किती फायदेशीर आणि प्रभावी ठरला हे कालांतराने कळेल. इलेक्टोरल बॉंड आजच आले आहे आहे असे नाही. यापुर्वीही अशी योजना करण्यात आली होती. जेव्हा जेव्हा काही बदल होतात तेव्हा प्रश्न उपस्थित होतात. ईव्हीएम आल्यावरदेखील प्रश्न उपस्थित झाले होते. नवीन गोष्टी आल्या की लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. पण ही नवी व्यवस्था किती फायदेशीर आणि परिणामकारक होती हे वेळ आल्यावर कळेल. त्यामुळे ते प्रयोगासाठी सोडले पाहिजे, अशी भूमिका सरकार्यवाहांनी मांडली.

टॅग्स :nagpurनागपूरRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ