शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
4
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
5
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
6
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
7
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
8
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
9
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
10
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
11
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
12
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
13
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
14
आता पाहा, मित्र-मित्रच एकमेकांना कापताना दिसतील!
15
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
16
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
17
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
18
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
19
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
20
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात

आदिवासींच्या आरोग्यासाठी स्वतंत्र व्यवस्थेची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 23:11 IST

ग्रामीण व दुर्गम भागात आजही बहुसंख्य डॉक्टर सेवा देण्यास तयार नाहीत. आरोग्याचे शिक्षण देणाऱ्या आणि धोरणे ठरविणाऱ्या बहुतांश संस्था या शहरकेंद्रित झाल्या आहेत. परिणामी, ग्रामीण भागात आज सार्वजनिक आरोग्याची परिस्थिती बिकट झाली आहे. दुसरीकडे वैद्यकीय शिक्षण आणि जमिनीवरची वास्तविकता यात बरेच अंतर निर्माण झाले आहे. ही दरी दूर करायची असेल तर प्रात्यक्षिकावर आधारित वैद्यकीय शिक्षणावर भर दिल्याशिवाय ग्रामीण आरोग्याची बिघडलेली नाडी सुधारता येणे शक्य नाही. विशेषत: आदिवासींच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी स्वतंत्र आरोग्य व्यवस्थेची गरज आहे, असा सूर मेडिकलच्या सामाजिक वैद्यकशास्त्र विभागातर्फे आयोजित प्रकट मुलाखतीतून उमटला.

ठळक मुद्देमेडिकलमध्ये तज्ज्ञांचा सूर : सामाजिक वैद्यकशास्त्र विभागाच्या वतीने चर्चासत्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ग्रामीण व दुर्गम भागात आजही बहुसंख्य डॉक्टर सेवा देण्यास तयार नाहीत. आरोग्याचे शिक्षण देणाऱ्या आणि धोरणे ठरविणाऱ्या बहुतांश संस्था या शहरकेंद्रित झाल्या आहेत. परिणामी, ग्रामीण भागात आज सार्वजनिक आरोग्याची परिस्थिती बिकट झाली आहे. दुसरीकडे वैद्यकीय शिक्षण आणि जमिनीवरची वास्तविकता यात बरेच अंतर निर्माण झाले आहे. ही दरी दूर करायची असेल तर प्रात्यक्षिकावर आधारित वैद्यकीय शिक्षणावर भर दिल्याशिवाय ग्रामीण आरोग्याची बिघडलेली नाडी सुधारता येणे शक्य नाही. विशेषत: आदिवासींच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी स्वतंत्र आरोग्य व्यवस्थेची गरज आहे, असा सूर मेडिकलच्या सामाजिक वैद्यकशास्त्र विभागातर्फे आयोजित प्रकट मुलाखतीतून उमटला.‘राष्ट्रीय डॉक्टर्स डे’निमित्त मेडिकलमध्ये ‘आदिवासींचे आरोग्य’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. सोबतच याच विषयावर ‘सर्च’चे संस्थापक डॉ. अभय बंग, सामाजिक कार्यकर्ते डॉ. रवींद्र कोल्हे, मेळघाट येथील महानचे डॉ. आशिष सातव यांची एकाच व्यासपीठावर संयुक्त मुलाखत ‘पीएसएम’ विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. अविनाश गावंडे यांनी घेतली. त्यावेळी हा सूर उमटला.कार्यक्रमाला वरिष्ठ विशेषज्ञ डॉ. बी.जी. सुभेदार, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, डॉ. तेजस्विनी ठोसर, माजी अधिष्ठाता डॉ. एस. डब्ल्यू. कुळकर्णी, पीएचएफआयचे डॉ. संजय झोडपे उपस्थित होते. या कार्यक्रमात मेडिकलचे माजी अधिष्ठाता डॉ. डी. के. रामदवार यांच्या स्मृतिनिमित्त जनऔषधी विभागाच्या लेक्चर्स हॉलला त्यांचे नाव देण्यात आले. प्रास्ताविक ‘पीएसएम’ विभागप्रमुख डॉ. उदय नारलावार यांनी केले. डॉ. कुळकर्णी यांनी डॉ. रामदवार यांच्या कार्यावर प्रकाश टाकला.आरोग्याचे प्रश्न स्थानिक पातळीवरच सोडवावे लागतात - डॉ. कोल्हेडॉ. रवींद्र कोल्हे म्हणाले की, वैद्यकीय शिक्षण आणि तळागाळातली आरोग्याची गुंतागुंत यात बरेच अंतर असते. ग्रामीण व दुर्गम भागातल्या आजाराला सामाजिक, भौगोलिक, आर्थिक, कौटुंबिकदेखील इतिहास चिकटलेला असतो. ‘इन्टर्नशीप’दरम्यान मेळघाट भागात काम करताना हे प्रकर्षाने जाणवले. त्यामुळे तेथील आरोग्याचे प्रश्नही स्थानिक परिस्थितीची सांगड घालूनच सोडवावे लागतात.आरोग्याच्या सोयीच पोहचायला उशीर-डॉ. सातवडॉ. आशिष सातव म्हणाले, कुपोषण, बालमृत्यू आणि मातामृत्यूमुळे मेळघाट नेहमीच चर्चेत राहिले आहे. आजही मेळघाटात जन्माला येणाऱ्या दर हजार बालकांपैकी ६० बालके उपजत मृत्यूला कवटाळतात. कुपोषणाचा दर १४ टक्के तर तरुणांचा मृत्यूदर हजारी ४०० वर पोहचला आहे. याकडे आरोग्य धोरण ठरविणाऱ्यांचे लक्ष गेलेले नाही. सरासरी लोकसंख्येच्या १० टक्के लोकसंख्या आदिवासी असली तरी यातील ९० टक्क्यांपर्यंत आरोग्याच्या सोयी पोहचत नाही, हे दाहक वास्तव आहे.तळागळात जाऊन प्रात्यक्षिकावर भर द्यायला हवा-डॉ. बंगडॉ. अभय बंग म्हणाले, वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण आणि प्रत्यक्षातील ग्रामीण भागातील आव्हाने, यात बरेच अंतर असते. त्यामुळे आरोग्य शिक्षणाने वर्गाचा उंबरठा ओलांडून तळागळात जाऊन प्रात्यक्षिकावर भर द्यायला हवा.

 

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयdoctorडॉक्टर