शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे 
3
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
4
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
5
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
6
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
7
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
8
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
9
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
10
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
11
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
12
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
13
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
14
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
15
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
16
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
17
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
18
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
19
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
20
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू

कर्करोग नियंत्रणासाठी संशोधन होणे आवश्यक

By admin | Updated: June 5, 2017 02:03 IST

कर्करोगाच्या रुग्णांमध्ये होत असलेली वाढ ही निश्चितच चिंताजनक आहे. जागृती आणि अत्याधुनिक उपचार पद्धतीमुळे कर्करोगावर मात केली जाऊ शकते.

देवेंद्र फडणवीस : कर्करोग इस्पितळाचे उद्घाटनलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कर्करोगाच्या रुग्णांमध्ये होत असलेली वाढ ही निश्चितच चिंताजनक आहे. जागृती आणि अत्याधुनिक उपचार पद्धतीमुळे कर्करोगावर मात केली जाऊ शकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कर्करोगाच्या नियंत्रणासाठी त्या दिशेने मौलिक संशोधन होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कामठी मार्ग येथील ‘एचसीजी-एनसीएचआरआय’च्या (हेल्थ केअर ग्लोबल-नागपूर कॅन्सर हॉस्पिटल अ‍ॅन्ड रिसर्च इन्स्टिट्यूट)अत्याधुनिक कर्करोग इस्पितळाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. रविवारी झालेल्या या कार्यक्रमाला खा. अजय संचेती, खा. डॉ. विकास महात्मे, आ. डॉ. मिलिंद माने, महापौर नंदा जिचकार, ‘एचसीजी एनसीएचआरआय’चे अध्यक्ष डॉ. बी. एस. अजयकुमार, डॉ. अजय मेहता, डॉ. सुचित्रा मेहता, डॉ. दिनेश माधवन् इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते.प्रदूषण आणि तंबाखू सेवनामुळे कर्करोग रुग्णांच्या प्रमाणात वाढ होत आहे. नागपुरात नव्याने उभारलेल्या रुग्णालयामुळे रुग्णांना अत्याधुनिक उपचार मिळतील. रुग्णालयातील अत्याधुनिक उपचार पद्धतीमुळे अचूक निदानासोबतच योग्य उपचार होणे शक्य होणार आहे. या रुग्णालयामुळे नागपूर आणि प्रामुख्याने मध्य भारतात कर्करोगावर संशोधन आणि उपचार उपलब्ध झाल्यामुळे कॅन्सर पीडितांना इतर ठिकाणी उपचाराला जाण्याची गरज राहिलेली नाही, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. कर्करोगाने ग्रस्त रुग्णांचे व कुटुंबीयांचे मनोधैर्य टिकवून ठेवण्यासाठी समाजानेदेखील पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. आंतरराष्ट्रीय ‘कॅन्सर सर्व्हायव्हल डे’च्या निमित्ताने कर्करोगाशी लढा देणारे मनीष बत्रा, अर्चना दास, गीता माथूर, डॉ. निर्मला वझे, डॉ. सुनंदा सोनालीकर, सुलक्षण सचदेव, आशिष गजभिये यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. श्वेता शेलगावकर यांनी संचालन केले तर डॉ. सुचित्रा मेहता यांनी आभार मानले.इतर जिल्ह्यातही कर्करोग इस्पितळकर्करोगामध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. यावरील उपचार महागडे आहेत. रुग्णांना योग्य उपचार मिळावा यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. त्यासाठी नागपूरच्याच धर्तीवर राज्यातील इतर जिल्ह्यातही कर्करोग इस्पितळ उभारण्याचा मानस मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.