शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

राज्यात ‘पॉयझन कंट्रोल सेंटर’ची गरज; लक्षणांवरून उपचार धोकादायक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 10:26 IST

Nagpur News महाराष्ट्रात ‘पॉयझन कंट्रोल सेंटर’ नाही. परिणामी, विषाचा प्रकार, तीव्रता, गंभीरता, त्याचे निदानपासून ते उपचाराची माहिती तातडीने मिळत नाही.

ठळक मुद्देमेयो, मेडिकलमध्ये वर्षाला १५० वर विषबाधेचे रुग्ण

सुमेध वाघमारे

 लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : शेतीसाठीच नव्हे तर घराघरांमध्ये कीटकांना अटकाव करण्यासाठी कीटकनाशकांसह इतरही रसायनांचा वापर वाढला आहे. रोज नवनवे जहाल विष बाजारात उपलब्ध होऊ लागले आहेत. याचे घातक परिणामही समोर येत आहेत. नागपूरच्या मेयो, मेडिकलमध्ये वर्षाला विषबाधेचे १५०वर रुग्ण येतात. असे असतानाही, महाराष्ट्रात ‘पॉयझन कंट्रोल सेंटर’ नाही. परिणामी, विषाचा प्रकार, तीव्रता, गंभीरता, त्याचे निदानपासून ते उपचाराची माहिती तातडीने मिळत नाही. रुग्णांच्या लक्षणावरून डॉक्टर उपचार करीत असल्याने अनेक रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याचे वास्तव आहे.

राज्यात सर्वत्र शेतीचे उत्पादन वाढविण्यापासून ते टिकविण्यासाठी रसायनांचा वापर वाढला आहे. फळे पिकविण्यासाठी ‘कार्बाईड’ सारख्या रसायनांचा सर्रास वापर होत आहे. घरांमध्ये धान्याचा साठा करताना कीड लागू नये म्हणूनही रसायन वापरले जात आहे. उंदीर, डास व कीटक मारण्यासाठीही विषाचा प्रयोग वाढला आहे. दिवसभरात माणूस नकळत विषाच्या संपर्कात येतो. याशिवाय कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांचे प्रमाणही मोठे आहे. मेयो व मेडिकलमध्ये आठवड्याभरात विषबाधेचे तीन ते चार तरी रुग्ण येतात. परंतु ‘पॉयझन कंट्रोल सेंटर’ नसल्याने अशा रुग्णांवर उपचार करणे डॉक्टरांना कठीण जाते. पोटात गेलेले विष नेमके कोणते, त्याची लक्षणे, तीव्रता, त्याचे रिअ‍ॅक्शन, निदान कसे करावे, कुठले उपचार आहेत, उपलब्ध अ‍ॅण्टिबायोटिक आदींची माहिती डॉक्टरांना मिळत नाही. विष घेतलेल्या रुग्णांच्या बाह्य लक्षणावरून जसे तोंडातून उग्र वास, डोळ्याचा बाहुलीचा आकार बदलणे, तोंडातून फेस निघणे सोबतच रुग्णाच्या नातेवाईकाने दिलेल्या माहितीवरून उपचाराची दीशा ठरवली जाते. परंतु रुग्ण वाढत असल्याने उपचाराच्या या पद्धतीसोबतच आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे गरजेचे झाले आहे.

-तामिळनाडू व केरळमध्येच केंद्र

शवविच्छेदन करताना मृताच्या मृत्यूच्या नेमक्या कारणाचा अहवाल दिला जातो. यात मृताने विष घेतल्याची तीव्रता आणि त्या विषात असलेले घटक स्पष्ट केले जाते. मात्र हेच जिवंतपणी होत नाही. कारण यासाठी लागणारी यंत्रणा महाराष्ट्रातील कोणत्याही शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपलब्ध नाही. भारतात केवळ तामिळनाडू आणि केरळमध्ये ‘पॉयझन कंट्रोल सेंटर’ म्हणून स्वतंत्र विभाग आहे. परंतु राज्यात विषबाधेचे रुग्ण वाढत असताना या केंद्राच्या उभारणी गरजेचे झाले आहे.

-विष नियंत्रण केंद्र आवश्यक

शासकीय रुग्णालयांत विष नियंत्रण केंद्र असणे महत्त्वाचे झाले आहे. या केंद्रासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची गरज नाही. गरज आहे ते आधुनिक उपकरण, तंत्रज्ञ आणि प्रयोगशाळेची. शासनाने यात पुढाकार घ्यायला हवा.

-डॉ. प्रशांत पाटील

प्रमुख, औषधवैद्यकशास्त्र विभाग

टॅग्स :Healthआरोग्य