शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

राज्यात ‘पॉयझन कंट्रोल सेंटर’ची गरज; लक्षणांवरून उपचार धोकादायक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 10:26 IST

Nagpur News महाराष्ट्रात ‘पॉयझन कंट्रोल सेंटर’ नाही. परिणामी, विषाचा प्रकार, तीव्रता, गंभीरता, त्याचे निदानपासून ते उपचाराची माहिती तातडीने मिळत नाही.

ठळक मुद्देमेयो, मेडिकलमध्ये वर्षाला १५० वर विषबाधेचे रुग्ण

सुमेध वाघमारे

 लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : शेतीसाठीच नव्हे तर घराघरांमध्ये कीटकांना अटकाव करण्यासाठी कीटकनाशकांसह इतरही रसायनांचा वापर वाढला आहे. रोज नवनवे जहाल विष बाजारात उपलब्ध होऊ लागले आहेत. याचे घातक परिणामही समोर येत आहेत. नागपूरच्या मेयो, मेडिकलमध्ये वर्षाला विषबाधेचे १५०वर रुग्ण येतात. असे असतानाही, महाराष्ट्रात ‘पॉयझन कंट्रोल सेंटर’ नाही. परिणामी, विषाचा प्रकार, तीव्रता, गंभीरता, त्याचे निदानपासून ते उपचाराची माहिती तातडीने मिळत नाही. रुग्णांच्या लक्षणावरून डॉक्टर उपचार करीत असल्याने अनेक रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याचे वास्तव आहे.

राज्यात सर्वत्र शेतीचे उत्पादन वाढविण्यापासून ते टिकविण्यासाठी रसायनांचा वापर वाढला आहे. फळे पिकविण्यासाठी ‘कार्बाईड’ सारख्या रसायनांचा सर्रास वापर होत आहे. घरांमध्ये धान्याचा साठा करताना कीड लागू नये म्हणूनही रसायन वापरले जात आहे. उंदीर, डास व कीटक मारण्यासाठीही विषाचा प्रयोग वाढला आहे. दिवसभरात माणूस नकळत विषाच्या संपर्कात येतो. याशिवाय कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांचे प्रमाणही मोठे आहे. मेयो व मेडिकलमध्ये आठवड्याभरात विषबाधेचे तीन ते चार तरी रुग्ण येतात. परंतु ‘पॉयझन कंट्रोल सेंटर’ नसल्याने अशा रुग्णांवर उपचार करणे डॉक्टरांना कठीण जाते. पोटात गेलेले विष नेमके कोणते, त्याची लक्षणे, तीव्रता, त्याचे रिअ‍ॅक्शन, निदान कसे करावे, कुठले उपचार आहेत, उपलब्ध अ‍ॅण्टिबायोटिक आदींची माहिती डॉक्टरांना मिळत नाही. विष घेतलेल्या रुग्णांच्या बाह्य लक्षणावरून जसे तोंडातून उग्र वास, डोळ्याचा बाहुलीचा आकार बदलणे, तोंडातून फेस निघणे सोबतच रुग्णाच्या नातेवाईकाने दिलेल्या माहितीवरून उपचाराची दीशा ठरवली जाते. परंतु रुग्ण वाढत असल्याने उपचाराच्या या पद्धतीसोबतच आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे गरजेचे झाले आहे.

-तामिळनाडू व केरळमध्येच केंद्र

शवविच्छेदन करताना मृताच्या मृत्यूच्या नेमक्या कारणाचा अहवाल दिला जातो. यात मृताने विष घेतल्याची तीव्रता आणि त्या विषात असलेले घटक स्पष्ट केले जाते. मात्र हेच जिवंतपणी होत नाही. कारण यासाठी लागणारी यंत्रणा महाराष्ट्रातील कोणत्याही शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपलब्ध नाही. भारतात केवळ तामिळनाडू आणि केरळमध्ये ‘पॉयझन कंट्रोल सेंटर’ म्हणून स्वतंत्र विभाग आहे. परंतु राज्यात विषबाधेचे रुग्ण वाढत असताना या केंद्राच्या उभारणी गरजेचे झाले आहे.

-विष नियंत्रण केंद्र आवश्यक

शासकीय रुग्णालयांत विष नियंत्रण केंद्र असणे महत्त्वाचे झाले आहे. या केंद्रासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची गरज नाही. गरज आहे ते आधुनिक उपकरण, तंत्रज्ञ आणि प्रयोगशाळेची. शासनाने यात पुढाकार घ्यायला हवा.

-डॉ. प्रशांत पाटील

प्रमुख, औषधवैद्यकशास्त्र विभाग

टॅग्स :Healthआरोग्य