शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

समाजात सकारात्मकतेची बीजे पेरण्याची गरज

By admin | Updated: March 29, 2015 02:27 IST

समाजात प्रचंड नकारात्मकता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत सुदृढ समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी समाजात सकारात्मकतेची ...

नागपूर : समाजात प्रचंड नकारात्मकता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत सुदृढ समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी समाजात सकारात्मकतेची बीजे पेरण्याची गरज असून यादृष्टीने साहित्यिकांनी लिखाण करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन महिला क्लबच्या अध्यक्षा विलासिनी नायर यांनी येथे केले. ‘अभिव्यक्ती’ वैदर्भीय लेखिका संस्थेचा ३८ वा वर्धापन दिन शनिवारी विनोबा विचार केंद्र सर्वोदय आश्रम सभागृह धरमपेठ येथे आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. ज्येष्ठ पत्रकार बाळ कुळकर्णी हे अध्यक्षस्थानी होते. नेत्रतज्त्र डॉ. कविता सातव, डॉ लीना रस्तोगी प्रमुख अतिथी होत्या. विलासिनी नायर म्हणाल्या, जगातील प्रत्येक देशाकडून कुठली ना कुठली गोष्ट शिकता येईल. काही देशांकडून उत्तम तंत्रज्ञान शिकता येईल तर काही देशांकडून वेळेचे काटेकोर पालन करणे शिकण्यासारखे आहे. परंतु यासर्वांपेक्षा आपला देश हा मानवता शिकवितो. तेव्हा आपल्या देशातच अनेक चांगल्या गोष्टी असून त्या पुढे आणण्याचे आवाहन त्यांनी केले. बाळ कुळकर्णी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, माणूस तोपर्यंतच जिवंत असतो जोपर्यंत त्याच्यात संवेदनशीलता असते. कारण संवेदना संपली की माणसाचे जगणे काहीच कामाचे नाही. भाषा ही महत्त्वाची नसून भावना महत्त्वाची आहे. त्यामुळे साहित्य हे कोणत्या भाषेतील आहे, यापेक्षा ते शेवटच्या माणसाला काय देत हे अधिक महत्त्वाचे आहे. ज्यांना चांगली मार्केटिंग करता येते ती क्षुल्लक माणसेही मोठी झाली आहेत. परंतु ज्यांची उंची खरच खूप मोठी आहे, ती माणसे मात्र मागे पडत आहेत हे समाजाचे दुर्दैव असल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. अभिव्यक्तीच्या अध्यक्षा सुप्रिया अय्यर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. शुभा साठे यांनी संचालन केले. हेमा नागपूरकर यांनी संस्थेचा अहवाल सादर केला. नंदिनी खडेकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)