शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
2
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
5
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
6
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
7
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
8
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
9
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
10
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
11
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
12
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
13
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
14
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
15
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
16
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
17
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
18
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
19
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
20
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका

समाजात सकारात्मकतेची बीजे पेरण्याची गरज

By admin | Updated: March 29, 2015 02:27 IST

समाजात प्रचंड नकारात्मकता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत सुदृढ समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी समाजात सकारात्मकतेची ...

नागपूर : समाजात प्रचंड नकारात्मकता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत सुदृढ समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी समाजात सकारात्मकतेची बीजे पेरण्याची गरज असून यादृष्टीने साहित्यिकांनी लिखाण करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन महिला क्लबच्या अध्यक्षा विलासिनी नायर यांनी येथे केले. ‘अभिव्यक्ती’ वैदर्भीय लेखिका संस्थेचा ३८ वा वर्धापन दिन शनिवारी विनोबा विचार केंद्र सर्वोदय आश्रम सभागृह धरमपेठ येथे आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. ज्येष्ठ पत्रकार बाळ कुळकर्णी हे अध्यक्षस्थानी होते. नेत्रतज्त्र डॉ. कविता सातव, डॉ लीना रस्तोगी प्रमुख अतिथी होत्या. विलासिनी नायर म्हणाल्या, जगातील प्रत्येक देशाकडून कुठली ना कुठली गोष्ट शिकता येईल. काही देशांकडून उत्तम तंत्रज्ञान शिकता येईल तर काही देशांकडून वेळेचे काटेकोर पालन करणे शिकण्यासारखे आहे. परंतु यासर्वांपेक्षा आपला देश हा मानवता शिकवितो. तेव्हा आपल्या देशातच अनेक चांगल्या गोष्टी असून त्या पुढे आणण्याचे आवाहन त्यांनी केले. बाळ कुळकर्णी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, माणूस तोपर्यंतच जिवंत असतो जोपर्यंत त्याच्यात संवेदनशीलता असते. कारण संवेदना संपली की माणसाचे जगणे काहीच कामाचे नाही. भाषा ही महत्त्वाची नसून भावना महत्त्वाची आहे. त्यामुळे साहित्य हे कोणत्या भाषेतील आहे, यापेक्षा ते शेवटच्या माणसाला काय देत हे अधिक महत्त्वाचे आहे. ज्यांना चांगली मार्केटिंग करता येते ती क्षुल्लक माणसेही मोठी झाली आहेत. परंतु ज्यांची उंची खरच खूप मोठी आहे, ती माणसे मात्र मागे पडत आहेत हे समाजाचे दुर्दैव असल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. अभिव्यक्तीच्या अध्यक्षा सुप्रिया अय्यर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. शुभा साठे यांनी संचालन केले. हेमा नागपूरकर यांनी संस्थेचा अहवाल सादर केला. नंदिनी खडेकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)