शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

समाजात सकारात्मकतेची बीजे पेरण्याची गरज

By admin | Updated: March 29, 2015 02:27 IST

समाजात प्रचंड नकारात्मकता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत सुदृढ समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी समाजात सकारात्मकतेची ...

नागपूर : समाजात प्रचंड नकारात्मकता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत सुदृढ समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी समाजात सकारात्मकतेची बीजे पेरण्याची गरज असून यादृष्टीने साहित्यिकांनी लिखाण करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन महिला क्लबच्या अध्यक्षा विलासिनी नायर यांनी येथे केले. ‘अभिव्यक्ती’ वैदर्भीय लेखिका संस्थेचा ३८ वा वर्धापन दिन शनिवारी विनोबा विचार केंद्र सर्वोदय आश्रम सभागृह धरमपेठ येथे आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. ज्येष्ठ पत्रकार बाळ कुळकर्णी हे अध्यक्षस्थानी होते. नेत्रतज्त्र डॉ. कविता सातव, डॉ लीना रस्तोगी प्रमुख अतिथी होत्या. विलासिनी नायर म्हणाल्या, जगातील प्रत्येक देशाकडून कुठली ना कुठली गोष्ट शिकता येईल. काही देशांकडून उत्तम तंत्रज्ञान शिकता येईल तर काही देशांकडून वेळेचे काटेकोर पालन करणे शिकण्यासारखे आहे. परंतु यासर्वांपेक्षा आपला देश हा मानवता शिकवितो. तेव्हा आपल्या देशातच अनेक चांगल्या गोष्टी असून त्या पुढे आणण्याचे आवाहन त्यांनी केले. बाळ कुळकर्णी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, माणूस तोपर्यंतच जिवंत असतो जोपर्यंत त्याच्यात संवेदनशीलता असते. कारण संवेदना संपली की माणसाचे जगणे काहीच कामाचे नाही. भाषा ही महत्त्वाची नसून भावना महत्त्वाची आहे. त्यामुळे साहित्य हे कोणत्या भाषेतील आहे, यापेक्षा ते शेवटच्या माणसाला काय देत हे अधिक महत्त्वाचे आहे. ज्यांना चांगली मार्केटिंग करता येते ती क्षुल्लक माणसेही मोठी झाली आहेत. परंतु ज्यांची उंची खरच खूप मोठी आहे, ती माणसे मात्र मागे पडत आहेत हे समाजाचे दुर्दैव असल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. अभिव्यक्तीच्या अध्यक्षा सुप्रिया अय्यर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. शुभा साठे यांनी संचालन केले. हेमा नागपूरकर यांनी संस्थेचा अहवाल सादर केला. नंदिनी खडेकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)