शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण रक्षणासाठी लोकचळवळीची गरज : महापौर नंदा जिचकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 21:36 IST

वाढते प्रदूषण व तापमान यामुळे सारेच जग चिंतेत आहे. पर्यावरण रक्षणासाठी जागतिक स्तरावर पावले उचलली जात आहेत. नागपूरची ओळख ‘ग्रीन सिटी’ म्हणून असली तरी येथे पर्यावरण रक्षणासाठी लोकचळवळीची गरज असल्याचे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी बुधवारी केले.

ठळक मुद्देमनपा-ग्रीन व्हिजीलतर्फे चर्चासत्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाढते प्रदूषण व तापमान यामुळे सारेच जग चिंतेत आहे. पर्यावरण रक्षणासाठी जागतिक स्तरावर पावले उचलली जात आहेत. नागपूरची ओळख ‘ग्रीन सिटी’ म्हणून असली तरी येथे पर्यावरण रक्षणासाठी लोकचळवळीची गरज असल्याचे प्रतिपादन महापौरनंदा जिचकार यांनी बुधवारी केले.पर्यावरण दिनानिमित्त महापालिका व ग्रीन व्हिजील फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राजे रघुजी भोसले नगरभवन येथे मनपा शाळांतील विद्यार्थ्यांसाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमात महापौर बोलत होत्या. यावेळी उपमहापौर दीपराज पार्डीकर, माजी महापौर प्रवीण दटके, गांधीबाग झोनचे सहायक आयुक्त अशोक पाटील, सहायक शिक्षणाधिकारी कुसुम चाफलेकर, ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तुभ चॅटर्जी, टीम लीडर सुरभी जैस्वाल आदी उपस्थित होते.महापालिका ग्रीन व्हिजीलच्या सहकार्याने पर्यावरण रक्षणात जनजागृतीचे कार्य करीत आहे. नागपूर शहरातील प्रत्येक झाड वाचविण्याची भूमिका मनपाची आहे. यासाठी विद्यार्थ्यांसह सर्व नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन करून महापौरांनी पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा देत जनजागृतीसाठी योगदान देण्याचे आवाहन केले.सन १९७२ मध्ये स्टॉकहोम कॉन्फरन्सदरम्यान ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरले. १९७४ साली पहिल्यांदा पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला. प्रत्येक वर्षी एका थीम आधारित पर्यावरण दिवस साजरा करण्यात येतो. यावर्षी ‘बीट एअर पोल्युशन’ ही थीम असून त्यावर आधारित मार्गदर्शन चर्चासत्रात करण्यात आले. नदी-तलावातील वाढते प्रदूषण, स्वच्छ भारत अभियान, ऊर्जा बचत, हरित संकल्प, नैसर्गिक संपदेचे संरक्षण आदी विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांना लहान-लहान नाटकांच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. प्रश्नोत्तराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये विषयाबद्दलच्या विचारांचे आदानप्रदान केले. यावेळी उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांनी प्रदूषण थांबविण्याची आणि नैसर्गिक संपदेचे संरक्षण करण्याची शपथ घेतली.संचालन शुभांगी पोहरे यांनी तर प्रास्ताविक शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहायक शिक्षणाधिकारी कुसुम चाफलेकर, सुरभी जैस्वाल, मेहुल कोसुरकर, कल्याणी वैद्य, दिगांबर नागपुरे, कार्तिकी कावळे, नम्रता झवेरी, रजत जैस्वाल, रुचि सोनी, दादाराव मोहोड, इंद्रायणी ठाकरे, चिन्मय धिमान, अभिषेक वैद्य, कुणाल बोरकर, ईशा सगदेव, गौतमी ठाकरे आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाला मनपा शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी निर्माण केलेल्या खताच्या पिशव्या भेटमनपाच्या लालबहादुर शास्त्री माध्यमिक शाळा व डॉ. राम मनोहर लोहिया माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक संतोष विश्वकर्मा आणि संजय पुंड यांच्या मार्गदर्शनात शाळा परिसरात कचऱ्यापासून खतनिर्मिती केली. या खताच्या पिशव्या महापौर व अन्य मान्यवरांना भेट दिल्या.

 

टॅग्स :environmentवातावरणNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाNanda Jichakarनंदा जिचकारMayorमहापौर