शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

कर्करोगावर नव्या पद्धतीने निदानाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:26 IST

नागपूर : कर्करोगाचे पहिल्या टप्प्यातच निदान झाल्यास उपचारातील यशाचा टक्का वाढतो. यासाठी नव्या निदान पद्धतची निर्मिती करणे गरजेचे आहे, ...

नागपूर : कर्करोगाचे पहिल्या टप्प्यातच निदान झाल्यास उपचारातील यशाचा टक्का वाढतो. यासाठी नव्या निदान पद्धतची निर्मिती करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले.

राष्ट्रसंत तुकडोजी प्रादेशिक कर्करोग रुग्णालय व संशोधन केंद्र येथे ‘न्यू इलेक्ट्रा वर्सा एचडी’ लिनिअर एक्सिलेटर या अद्ययावत रेडिएशन यंत्राचे गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पशुसंवर्धन विकास मंत्री सुनील केदार, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार उपस्थित होते.

या रुग्णालयात जेवढी यंत्रसामुग्री आहे त्याच्या हाताळणीसाठी ‘एमएसएमई’मार्फत प्रशिक्षण अभ्यासक्रम राबवावेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना रोजगार मिळेल आणि केंद्रालाही लाभ होईल, असे गडकरींनी यावेळी सुचविले. कर्करोगाच्या रुग्णांसाठी रुग्णालयाने घेतलेल्या पुढाकाराचे सुनील केदार यांनी कौतुक केले.

रेडिओलॉजी विभागाचे डॉ. करतार सिंग यांनी यंत्राची माहिती दिली. कार्यक्रमाला अशोक कृपलानी, डॉ. बी. के. शर्मा, डॉ. करतार सिंग, रणधीर जवेरी, अवतराम चावला, अनिल मालविया आदी उपस्थित होते.