शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

समाजाला चालत्या-बोलत्या आदर्शांची आवश्यकता : वेदप्रकाश मिश्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 00:46 IST

समाजाला ज्यांनी प्रेरित आणि दिग्दर्शित करण्याचे कार्य केले, ते रोलमॉडेल असतात. समाज कधीही काल्पनिकता, अंदाज किंवा आकलनाच्या आधारे चालत नाही तर नीतीमत्तेच्या आदर्शावर चालतो. समाजाला अशा चालत्या-बोलत्या आदर्शांची गरज आहे, असे मत कृष्णा इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस, कराडचे कुलगुरू डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देसारडा, दुपारे व शेख यांना स्मिता स्मृती पुरस्कार प्रदान

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : समाजाला ज्यांनी प्रेरित आणि दिग्दर्शित करण्याचे कार्य केले, ते रोलमॉडेल असतात. समाज कधीही काल्पनिकता, अंदाज किंवा आकलनाच्या आधारे चालत नाही तर नीतीमत्तेच्या आदर्शावर चालतो. समाजाला अशा चालत्या-बोलत्या आदर्शांची गरज आहे, असे मत कृष्णा इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस, कराडचे कुलगुरू डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी व्यक्त केले.विदर्भ गौरव प्रतिष्ठानतर्फे अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या ३२ व्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणाऱ्या स्मिता स्मृती पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर माजी खासदार दत्ता मेघे, सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश विकास शिरपूरकर, कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबुराव तिडके प्रामुख्याने उपस्थित होते. बाबुराव धनवटे सभागृह, शंकरनगर येथे पार पडलेल्या या सोहळ्यात सुजोग चिकित्सक डॉ. आशा सारडा, ज्येष्ठ नाट्य लेखक व दिग्दर्शक प्रभाकर दुपारे तसेच नाट्यलेखक व दिग्दर्शक सलीम शेख यांना यावर्षीच्या स्मिता स्मृती पुरस्काराने गौरविण्यात आले. डॉ. मिश्रा पुढे म्हणाले, पद्मश्री स्मिता पाटील या रंगभूमी, नाट्यभूमी आणि सामजिक क्षेत्रातील उत्कट संवदेनशीलतेचे प्रतीक आहे. कला ही केवळ मनोरंजनासाठी नसून मानवी अंतर्मनाच्या संवेदनांना स्पर्श करणारी असते. ती जीवनाचा परमोच्च आनंद देणारी असल्याचे मनोगत त्यांनी व्यक्तकेले.वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी बोलताना दत्ता मेघे म्हणाले, सार्वजनिक जीवनात सामाजिक जाणिवा ठेवून माणस जपणे व सामाजिक कार्यासाठी त्यांची निवड करणे हेसुध्दा मोठ्या जोखमीचे काम असून गिरीश गांधी ते करीत असल्याचे कौतुक त्यांनी केले. न्या. सिरपूरकर म्हणाले, कला हीे सर्जनशील असते, ज्यातून नवीन काही निर्माण होते. स्मिता ही अशीच सर्जनशील व संवेदनशील अभिनेत्री होती. पुरस्कारप्राप्त सत्कारमूर्ती असेच नाविन्य निर्माण करणारे सर्जनशील व्यक्तिमत्त्व असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.यावेळी सन्मानाला उत्तर देताना प्रभाकर दुपारे यांनी, आमच्या कलेचा हेतू मनोरंजनापेक्षा समाजपरिवर्तनाचा अधिक असल्याची भावना व्यक्त केली. नाटकाच्या माध्यमातून पुरोगामी विचाराची प्रेरणा निर्माण व्हावी व सामाजिक जाणिवा पेटून उठाव्या हा उद्देश असल्याचे ते म्हणाले. विदर्भात पथनाट्याला सुरुवात केली तेव्हा लोक त्यावेळी तिरस्कार करायचे. मात्र आम्ही मागे हटलो नाही. आज हे पथनाट्य परिवर्तनाचे प्रतीक ठरल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले. यावेळी सलीम शेख यांनी मनोगत व्यक्त करताना, मागील २० वर्षांपासून सोबतीने काम करणारे कलावंत आणि तंत्रज्ञ आणि मार्गदर्शक, बातम्यातून विषय देणारे पत्रकार, अनिल चनाखेकर, राजाराम दीक्षित वाचनालयाचे किशोर बांधवकर, पातूरकर, गुरुतुल्य नीलकांत कुलसंगे व पत्नी नलिनी यांची साथ लाभल्याची भावना व्यक्त केली. डॉ. आशा सारडा यांनी सुजोग चिकित्सेद्वारे औषधोपचाराशिवाय रुग्णाला आराम मिळतो. त्यामुळे या पॅथीचे हॉस्पिटल व महाविद्यालय सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली. संचालन डॉ. प्रदीप विटाळकर यांनी केले.

टॅग्स :Smita Patilस्मिता पाटीलcultureसांस्कृतिक